शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

मुंबई मोर्चात कोल्हापूरचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:38 IST

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एक मराठा... लाख मराठा... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... कोपर्डीतील दुर्दैवी लेकीला न्याय मिळालाच पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाज बुधवारी मराठा क्रांती महामोर्चासाठी आझाद मैदानावर एकवटला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, साताºयासह बेळगाव, सीमाभागातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एक मराठा... लाख मराठा... मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे... कोपर्डीतील दुर्दैवी लेकीला न्याय मिळालाच पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाज बुधवारी मराठा क्रांती महामोर्चासाठी आझाद मैदानावर एकवटला. यामध्ये कोल्हापूर, सांगली, साताºयासह बेळगाव, सीमाभागातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने पोवाडा सादर करून मोर्चेकºयांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.टी.) ते आझाद मैदान असा रोड शो करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला.सळसळता उत्साह प्रत्येक मराठा बांधवाच्या चेहºयावर (बुधवारी) मोर्चासाठी येताना दिसत होता. या मोर्चासाठी गेल्या चार दिवसांपासून मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने मुंबईला येत होते. मंगळवारी रात्रीपासूनच मराठा बांधव खासगी वाहनांसह रेल्वेने मुंबईत दाखल झाले.भायखळा येथील जिजामाता पार्क येथून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सी.एस.टी. ते आझाद मैदानापर्यंत कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत व त्यांचे सहकारी संजय गुरव, संभाजी पाटील, सुदर्शन ढाले, आदींनी ढोलकी, डफ, तुणतुण्याच्या साथीने रोड शो करीत मोर्चेकºयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या ‘जाग सरकारा जाग... मराठा क्रांतीची पेटली ही आग’ या पोवाड्याने सर्वांचे लक्ष वेधले.मोर्चासाठी कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील मराठा बांधव खासगी वाहने, एस.टी.बस, आरामबस, रेल्वेने मंगळवारी मध्यरात्रीपासून दाखल होत होते. वाशी परिसरातील ए.पी.एस.सी. मार्केट येथे कोल्हापूरच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यासह भिवंडी परिसरात वाहने लावून मराठा बांधव लोकल ट्रेनने सी.एस.टी.कडे येत होते. हजारो लोक बुधवारी सकाळपर्यंत मोर्चासाठी दाखल झाले.मोर्चाच्या नियोजनासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापुरातून सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीचे सदस्य मुंबईत तळ ठोकून आहेत. त्याचबरोबर मराठा मावळेही या ठिकाणी आले आहेत. मोर्चावेळी या मावळ्यांनी नेटके नियोजन करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला. कोल्हापूरचा मराठा मोर्चा यशस्वी पार पाडून योग्य नियोजन केल्याने कोल्हापुरातील नियोजनातील टीमला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या अनुभवाचा या मोर्चावेळी चांगलाच उपयोग झाल्याचे दिसून आले.बेळगाव-खानापूर येथील तीन हजारांहून अधिक मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले. बेळगावचे आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी पांढºया टोप्या परिधान केल्या होत्या. त्यावर ‘बेळगाव कुणाचे? तर महाराष्ट्राचे’ असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे सीमाभागातील मराठा बांधवांचा हा आवाज या ठिकाणी घुमल्याचे दिसून आले.मराठा क्रांती महामोर्चासाठी मुंबईतील आझाद मैदानावर कोल्हापूर, सांगली, साताºयासह बेळगाव, सीमाभागातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले. कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत यांच्या पथकाने पोवाडा सादर करून मोर्चेकºयांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.टी.) ते आझाद मैदान असा रोड शो करून कोल्हापूरचा आवाज बुलंद केला. दोनवडे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील इयत्ता चौथीत शिकणाºया सई पुंडलिक पाटील या चिमुरड्या रणरागिणीने मुंबईच्या मोर्चात आपल्या आक्रमक शैलीने सर्वांची मने जिंकली. आता मराठाच मराठ्यांना वाचवेल, यासाठी सर्वांनी एकत्रित राहिले पाहिजे, असे आवाहन तिने केले.मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरातील मराठा मावळ्यांचे हात राबले. यामध्ये संदीप पाटील, उमेश पोवार, खजिल पार्टे, धैर्यशील देसाई, हृषीकेश देसाई, स्वप्निल पाटील, हृषीकेश पाटील, प्रतीक गायकवाड, अमोल गायकवाड, यांच्यासह पाचशेहून अधिक मराठा मावळे कार्यरत होते. त्यांच्याकडे आझाद मैदान येथील नियोजनाची जबाबदारी होती. ती त्यांनी चोखपणे पार पाडली.मोर्चातील कोल्हापूरमोर्चासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे दिलीप पाटील, प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, दिलीप देसाई, शाहीर दिलीप सावंत, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, राजू लिंंग्रस, सचिन तोडकर, चंद्रकांत जाधव, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, राजू बाबदार, बाबासो गायकवाड, पै. विष्णू जोशीकर, गजानन तोडकर, बाळासाहेब मुधोळकर, विनायक फाळके, माणिक मुळीक, नाना जाधव, मनोज जाधव, गायत्री राऊत, आदी हिरिरीने सहभागी झाले होते.आम्ही आलोय मुंबईला ।आम्ही आलोय मुंबईला।आमचा हक्क मागायला।जागं कराय सरकारला ।।भगवा झेंडा खांद्यालाभाजी भाकरी कमरेला।आरक्षण विना आजमाघार नाही गावालाआम्ही आलोय मुंबईला ।आम्ही आलोय मुंबईला।आमचा हक्क मागायला ।जागं कराय सरकारला।।शेतकरी ओसाड माळालापाणी नाही शेताला।गाव सोडला कोसालामरन तुमच्या दाराला ।।आम्ही आलोय मुंबईला ।आम्ही आलोय मुंबईला।आमचा हक्क मागायला ।जागं कराय सरकारला ।।- शाहीर दिलीप सावंत