शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद घाटगे यांचा न्यायरक्षक पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

कोल्हापूर : नीतिमत्तेवर कायदे तयार केले आहेत, किंबहुना नीतिमत्तेपासून काहीजण दूर गेल्यानेच कायद्यांची निर्मिती करावी लागली, असे प्रतिपादन निवृत्त ...

कोल्हापूर : नीतिमत्तेवर कायदे तयार केले आहेत, किंबहुना नीतिमत्तेपासून काहीजण दूर गेल्यानेच कायद्यांची निर्मिती करावी लागली, असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. कुलकर्णी यांनी शनिवारी येथे केले. धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विवेकानंद घाटगे यांना नीतिप्रज्ञ न्यायरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शाहू स्मारक भवानात ॲड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

एस. पी. कुलकर्णी म्हणाले, न्याय व्यवस्था, वकील आणि पक्षकार यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असते. पक्षकाराला न्याय मिळाला पाहिजे. प्रवाहाविरुद्ध जे लढतात त्यांना यातना सोसाव्या लागतात. यामध्ये जे डगमगत नाहीत तेच खरे समाजसेवक ठरतात. ॲड. घाटगे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ॲड. महादेवराव आडगुळे, अनिल म्हमाने, प्रा. करुणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ॲड. प्रशांत चिटणीस, चिंतामणी कांबळे, अकबर मकानदार, डॉ. दयानंद ठाणेकर, मंदार पाटील, आदी उपस्थित होते.

चौक़ट

‘कोर्टाची पायरी शहाण्याने चढू नये’ असे म्हणणे चुकीचे आहे. कोर्टाची पायरी चढल्याशिवाय न्याय मिळत नाही. सर्व पर्याय संपल्याने लोक कोर्टात दाद मागण्यासाठी येतात. त्यांना न्याय मिळवून देणे वकिलांचे आणि न्यायव्यवस्थेचे कर्तव्य असते, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.