शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

विशाळगडावरील आंदोलन : पर्यटकांना मद्यपानापासून रोखण्याचे प्रयत्नदारूबंदीसाठी महिला सरसावल्या

By admin | Updated: July 27, 2014 23:05 IST

गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट

राजू कांबळे - मलकापूर , सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर दारूबंदीसाठी मोलमजुरी करणाऱ्या रणरागिनी पुढे आल्या आहेत. गेली तीन महिने पर्यटकांजवळची दारू पकडून नष्ट केली जात आहे. त्यांना सामाजिक संघटनांच्या पाठबळाची गरज आहे. शाहुवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जिल्हा पोलिस प्रमुखांकडे न्याय मागणार असल्याचे वैशाली कांबळे यांनी सांगितले. कोल्हापूरच्या शिवशक्ती प्रतिष्ठानने या महिलांना पावसाळी रेनकोट, चप्पलांच्या जोडी, औषधोपचार पेटी आदी वस्तू भेट दिल्या आहेत. किल्ले विशाळगडावर दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाणाला सर्व धर्मांचे लोक भेट देतात. मात्र येथे गडाला भेट देण्याच्या नावाखाली मद्यपान केले जाते. गेल्या सहा महिन्यापासून गजापूर येथील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी संघटीत होऊन दारूबंदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गजापूर-विशाळगड येथील पर्यटकांची दारू पकडून नष्ट केली जाते. पोलिसांत तक्रार दिली जाते. मात्र या महिलांना येथील दारू विक्रेत्याकडून धमक्या मिळत आहेत. शाहूवाडी पोलिस सहकार्य करीत नाहीत. तरीही या महिलांनी दारूबंदीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या दारूमुळे गजापूर येथील ५०तरुणांनी आपला जीव गमावला आहे. पर्यटकांच्या दारुचा येथील समाजजीवनावर परिणाम होत आहे. काहीही झाले तरी विशाळगडावर दारूबंदी करणार असा निर्धार या महिलांनी केला. आहे. दारूबंदी साठी प्रयत्न करणाऱ्या या महिलांना जिल्ह्यातील सामाजिक संघटना यांनी पाठबळ देणे गरजेचे आहे. मोलमजुरी करून आम्ही सामाजिक बांधीलकी म्हणून हे काम हाती घेतली आहे. दारूमुळे कुटुंबे उद्धवस्त होत आहेत याची झळ आम्हाला देखील बसली आहे. दररोज गडावर हमाली करतो या कामातून वेळ काढून आम्ही पर्यटकांजवळची दारू नष्ट करतो प्रसंगी आम्हाला शिवीगाळ, हाणामारी देखील होते. असे वैशाली कांबळे यांनी सांगितले. दारूबंदीसाठी वैशाली कांबळे, सुशिला कांबळे, शिला कांबळे, कोंडाबाई कांबळे, आवडाबाई कांबळे, तानाबाई कांबळे, या महिला दारूबंदीसाठी पुढे सरसावल्या आहेत.