शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

दूधगंगा, वारणेतून विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे. सर्वच धरणातून कमी अधिक ...

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरला असलातरी अधूनमधून येणाऱ्या जोरदार सरीमुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढच होत चालली आहे. सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे नद्या अजूनही इशारा पातळीवरुनच वाहत असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीवर २४ तासात अवघ्या दीड फुटाची घट झाली आहे. वारणा, दूधगंगा, चिकोत्रा धरणातून गुरुवारी विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वारणा धरण ९१ टक्के भरल्याने ७ हजार ९८० वर असलेला विसर्ग १४ हजार ९८० क्यूसेसने वाढवण्यात आला आहे. दूधगंगा धरणाचा साठाही ८४ टक्केवर गेल्याने तेथून ३६०० क्यूसेस विसर्ग वाढवण्यात आला आहे. चिकोत्रा धरणही ९४ टक्के भरल्याने ५६० क्यूसेस पाण्याचा विसर्ग गुरुवारी संध्याकाळी सुरू करण्यात आला. धरणातून वाढवलेल्या विसर्गाने वारणा व दूधगंगा, वेदगंगेत जास्तीचे पाणी येऊन महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून विद्युत विमोचकातून विसर्ग कायम आहे. शंभर टक्के भरलेल्या कडवी धरणातून विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाण्याला उतार कमी झाला असून अजूनही पाणीपातळी ३९ फूट या इशारा पातळीच्याही वर आहे.

आठवडाभर पावसाचा लहरीपणा

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. अधूनमधून एखाद दुसरी सर येत होती, त्यात फारसा जोर नव्हता. पुणे वेधशाळेनेे आज शुक्रवारी आणि उद्या शनिवारी रेड अलर्ट जारी केला असलातरी बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा झारखंड, राजस्थानकडे सरकल्याने दक्षिण भारतात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही. ६ व ७ ऑगस्टला पाऊस परतेल, पुन्हा आठवडाभर ओढ घेईल, असा सुधारित अंदाज आहे.

नदीकाठाला दुर्गंधी

पावसाची उघडझाप सुरू असल्याने महापूर ओसरण्यास वेळ लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या अजूनही इशारा पातळीच्या वरच वाहत आहेत. दिवसाला एक फुटभरच पाणी कमी होत आहे. त्यात धरणातील विसर्गामुळे बऱ्यापैकी पाणी स्थिर राहिल्याचे दिसत आहे. पिके कुजत असल्याने नदीकाठाला आता दुर्गंधी सुटली आहे.

कोल्हापूर ते रत्नागिरी मार्ग बंदच

गुरुवारी संध्याकाळपर्यंत अजूनही ३७ बंधारे पाण्याखाली असून यावरून होणारी वाहतूक अन्य मार्गे सुरू आहे. कोल्हापूर - रत्नागिरी मार्ग अजूनही बंदच आहे.

धरणातील पाणीसाठा (टक्केवारीमध्ये)

राधानगरी ९९, तुळशी ९२, वारणा ९३ , दूधगंगा ८४, कासारी ८१, आंबेओहोळ ८८, कुंभी ८४, पाटगाव ९१, चिकोत्रा ९४, जंगमहट्टी ९८, कडवी, चित्री, घटप्रभा, जांबरे, कोदे १०० टक्के

पाण्याखालील बंधारे

पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे,

तुळशी: बीड, आरे, बाचणी

वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी

कुंभी: कळे, वेतवडे

कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे

कडवी: सरुड पाटणे

वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली

दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली