शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कन्यागतच्या कामात ‘डांबर घोटाळा’

By admin | Updated: May 24, 2016 00:58 IST

‘आंदोलन अंकुश’चा आरोप : तीन ते चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार; ठेकेदारांची पाठराखण

जयसिंगपूर : नृसिंहवाडी येथे भरणाऱ्या कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यात विविध कामे सुरू आहेत. त्यापैकी रस्त्याच्या कामात ढपला पाडण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे़ मंजूर दरसूचीप्रमाणे डांबराचा दर न घेता जादा दर डांबरासाठी वापरण्यात आल्यामुळे सुमारे तीन ते चार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला़ते पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात कन्यागत महापर्वकाळ अंतर्गत जिल्हा परिषद विभागाकडून २२ कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजूर झाली असून, ती सुरू आहेत़ सन २०१५-१६ सालच्या दरसूचीप्रमाणे १ मे २०१६ रोजी डांबराचा दर ३२ हजार ५२२ रुपये प्रतिटन होता़ तथापि, दरसूचीत याच पॅकिंग डांबराचा दर ४७ हजार १४ रुपये प्रतिटन व बल्कचा दर ४३ हजार ८३८ रुपये प्रतिटन मंजूर निविदा दरात समाविष्ट केला आहे़ यामुळे सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदारांना अतिरिक्त प्रतिटन ११ ते १३ हजार रुपये जादा दिले जात आहेत़ डांबराचे प्रमाण व दरातील तफावत पाहता तीन ते चार कोटी रुपयांचा गैरकारभार होणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे़ याशिवाय २०१५-१६ च्या दरसूचीत सीलबंद डांबराचा दर प्रतिटन ४७ हजार रुपये धरण्यात आला असून, या कामाची बिले बनविताना हा दर धरला गेला तर सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गैरकारभार होण्याची शक्यता आहे़ याप्रश्नी दोन महिन्यांपूर्वी जि़ प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन वस्तुस्थिती समजावून दिली होती़ मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप अंकुश आंदोलनतर्फे करण्यात आला़ सध्या आमदार फंडदेखील जिल्हा परिषदेकडे जात आहे़ जि़ पक़डे तांत्रिक अधिकारीच फक्त असल्यामुळे दर्जाचा प्रश्न उद्भवणार आहे़ यावेळी दिलीप माणगावे, वसंतराव राणे-संकपाळ, अभिजित पाटील, प्रभाकर बंडगर, सत्यजित सोमण, विकास कांबळे, संदीप चौगुले, आदी पदाधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)प्रसंगी न्यायालयात जाऊडांबरातील दराच्या तफावतीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या वर्षीच्या कामातील बिलातून फरकाची रक्कम ठेकेदारांकडून वसूल केली आहे़ ही वस्तुस्थिती असताना जि़ प़च्या बांधकाम विभागाकडून ठेकेदारांची पाठराखण केली जात आहे़ त्यामुळे जनतेच्या पैशाची राजरोसपणे होणारी लूट थांबविण्याची गरज असून, प्रशासकीय यंत्रणा जर लक्ष घालणार नसेल, तर आम्ही प्रसंगी न्यायालयात जाण्यास देखील मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आंदोलन अंकुशने दिला आहे.