शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवती ग्रामस्थांकडून उल्लंघन, गावात काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे ...

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना येवती (करवीर) येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊनचा फज्जा उडवीत वाजतगाजत मिरवणूक काढत विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, अशा वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता येवती ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत गावातील मंदिरात विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गावातील गल्लीमधून रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या टाकून गावातून हरिनामाच्या गजर करीत सवाद्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये महिला, लहान मुली, शाळकरी मुले व वृद्ध, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक हजर होते. मूर्ती प्रतिष्ठापना, मूर्तीस अभिषेक व इतर धार्मिक विधी, असा हा कार्यक्रम झाला.

याप्रकरणी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील, उपसरपंच संतोष केरबा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मिलनसिंह पाटील, वर्षा विक्रम पाटील, धनाजी विठ्ठल पाटील, माधुरी शरद आळवेकर, साधना निवास सुतार, संग्राम कुंडलिक गुरव, धनाजी विठ्ठल पाटील, दीपाली कैलास शेळके यासह मिलनसिंह पाटील, मल्हार पाटील, गौतम पाटील, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, शंकर गुरव, अनिल नाळे, रंगराव पाटील, बाबूराव पाटील, विष्णू पाटील, प्रदीप पाटील आदींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. जरग यांनी दिली असून, अधिक तपास इस्पुर्ली पोलीस करीत आहेत.

कोरोना ग्राम दक्षता समितीच नॉटरिचेबल :

या घटनेची माहिती घेण्यासाठी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही, तसेच ग्रामसेवकांचाही फोन बंद होता. पोलीस पाटलांनाही याबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट :

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कोल्हापूर गारगोटी रोडवर इस्पुर्ली हद्दीमध्ये अनेक ठिकाणी तपासणी करतात. गावोगावी पाहणी करतात; पण पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या एवढ्या मोठ्या नियोजित कार्यक्रमाची माहिती त्यांना कशी नव्हती. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, असे प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवरून उपस्थित होत आहेत.