शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

येवती ग्रामस्थांकडून उल्लंघन, गावात काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे ...

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना येवती (करवीर) येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊनचा फज्जा उडवीत वाजतगाजत मिरवणूक काढत विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, अशा वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता येवती ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत गावातील मंदिरात विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गावातील गल्लीमधून रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या टाकून गावातून हरिनामाच्या गजर करीत सवाद्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये महिला, लहान मुली, शाळकरी मुले व वृद्ध, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक हजर होते. मूर्ती प्रतिष्ठापना, मूर्तीस अभिषेक व इतर धार्मिक विधी, असा हा कार्यक्रम झाला.

याप्रकरणी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील, उपसरपंच संतोष केरबा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मिलनसिंह पाटील, वर्षा विक्रम पाटील, धनाजी विठ्ठल पाटील, माधुरी शरद आळवेकर, साधना निवास सुतार, संग्राम कुंडलिक गुरव, धनाजी विठ्ठल पाटील, दीपाली कैलास शेळके यासह मिलनसिंह पाटील, मल्हार पाटील, गौतम पाटील, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, शंकर गुरव, अनिल नाळे, रंगराव पाटील, बाबूराव पाटील, विष्णू पाटील, प्रदीप पाटील आदींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. जरग यांनी दिली असून, अधिक तपास इस्पुर्ली पोलीस करीत आहेत.

कोरोना ग्राम दक्षता समितीच नॉटरिचेबल :

या घटनेची माहिती घेण्यासाठी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही, तसेच ग्रामसेवकांचाही फोन बंद होता. पोलीस पाटलांनाही याबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट :

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कोल्हापूर गारगोटी रोडवर इस्पुर्ली हद्दीमध्ये अनेक ठिकाणी तपासणी करतात. गावोगावी पाहणी करतात; पण पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या एवढ्या मोठ्या नियोजित कार्यक्रमाची माहिती त्यांना कशी नव्हती. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, असे प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवरून उपस्थित होत आहेत.