शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

येवती ग्रामस्थांकडून उल्लंघन, गावात काढली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:25 IST

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे ...

दिंडनेर्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना करत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना येवती (करवीर) येथील ग्रामस्थांनी लॉकडाऊनचा फज्जा उडवीत वाजतगाजत मिरवणूक काढत विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. याप्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह सर्व सदस्य, अशा वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना संचारबंदीची तमा न बाळगता येवती ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत गावातील मंदिरात विठ्ठल- रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गावातील गल्लीमधून रांगोळी काढून फुलांच्या पायघड्या टाकून गावातून हरिनामाच्या गजर करीत सवाद्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये महिला, लहान मुली, शाळकरी मुले व वृद्ध, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील लोक हजर होते. मूर्ती प्रतिष्ठापना, मूर्तीस अभिषेक व इतर धार्मिक विधी, असा हा कार्यक्रम झाला.

याप्रकरणी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील, उपसरपंच संतोष केरबा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संगीता मिलनसिंह पाटील, वर्षा विक्रम पाटील, धनाजी विठ्ठल पाटील, माधुरी शरद आळवेकर, साधना निवास सुतार, संग्राम कुंडलिक गुरव, धनाजी विठ्ठल पाटील, दीपाली कैलास शेळके यासह मिलनसिंह पाटील, मल्हार पाटील, गौतम पाटील, बाळासाहेब पाटील, सुहास पाटील, शंकर गुरव, अनिल नाळे, रंगराव पाटील, बाबूराव पाटील, विष्णू पाटील, प्रदीप पाटील आदींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल आर.पी. जरग यांनी दिली असून, अधिक तपास इस्पुर्ली पोलीस करीत आहेत.

कोरोना ग्राम दक्षता समितीच नॉटरिचेबल :

या घटनेची माहिती घेण्यासाठी सरपंच वीरधवल किरणसिंह पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही, तसेच ग्रामसेवकांचाही फोन बंद होता. पोलीस पाटलांनाही याबाबत काही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट :

लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कोल्हापूर गारगोटी रोडवर इस्पुर्ली हद्दीमध्ये अनेक ठिकाणी तपासणी करतात. गावोगावी पाहणी करतात; पण पोलीस स्टेशनपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या एवढ्या मोठ्या नियोजित कार्यक्रमाची माहिती त्यांना कशी नव्हती. त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते का, असे प्रश्न पोलिसांच्या भूमिकेवरून उपस्थित होत आहेत.