शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे भले; हप्त्याएवढीही भरपाई नाही

अशोक डोंबाळे - सांगली --विमा कंपन्यांच्या जाचक नियमांमुळे अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शासनाने विमा कंपन्यांशी करार करताना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचेच हित पाहिल्याचे विमा कंपन्यांच्या भरपाईवरून स्पष्ट होत आहे. खरीप २०१४ या हंगामामधील शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपयांचा विमा हप्ता भरून पिकांचा विमा उतरला होता. या पिकांचे ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. नैसर्गिक आपत्तीमुळे १८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दोन कोटी ६८ लाख सहा हजार ४० रूपयांची भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना तर विमा हप्त्यापेक्षाही कमी भरपाई मिळाल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये व नगदी पिकांच्या उत्पादनावर खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने खरीप २०१४ पासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील हवामानावर आधारीत पिक विमा योजना सुरु केली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद या चार पिकांची निवड केली होती. या पिकांचे तीन कारणामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी असे ठरले आहे. त्यानुसार विमा कंपनी, शासनाने प्रत्येक मंडलस्तरावर वेदर स्टेशन बसविली आहेत. दहा ते बारा गावांचे एक मंडल असल्यामुळे वेदर स्टेशन बसविलेल्या ठिकाणी पाऊस झाला नाही. उर्वरित गावामध्ये पाऊस झाला तरीही तो तेथे नोंदविला जात नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. वायफळे येथील शेतकऱ्यांनी दोन लाख ८० हजार रूपये विमा हप्ता भरला होता. येथे पाऊसच न झाल्यामुळे खरीप ज्वारी, उडीद पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ठोस भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेने विमा कंपनीकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला. केवळ ८० हजार रूपये त्यंना मिळाले. म्हणजे भरलेली रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. वायफळे येथीलच महादेव पाटील या शेतकऱ्याने उडीद पिकासाठी हेक्टरी शेतकरी हिस्सा म्हणून ६१६ रूपये आणि शासनाने २०५ रूपये विमा हप्ता भरला होता. विमा कंपनीकडून हेक्टरी अकराशे रूपये भरपाई मिळाली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांच्या पदरात बियाणांची रक्कमही पडली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ज्वारीचे नुकसान व भरपाईतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईक़महांकाळ२०६९.३३२५ लाख ७४ हजारपाच लाख ७३ हजारकडेगाव२९३.२३दोन लाख ९० हजारएक लाख एक हजारखानापूर१०५३.१५१३ लाख १० हजारसात लाख ९४ हजारमिरज१२.४८१२ हजारसात हजारशिराळा१३.४६१० हजार१६ हजारतासगाव३८५.५६चार लाख ८० १८ हजारवाळवा११.५८१२ हजार१८ हजारबाजरीचे नुकसान आणि भरपाईची रक्कमतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईआटपाडी२०८८.५३१९ लाख ६९ हजार ९० लाख ५२ हजारजत५५४२.७९५१ लाख ४१ हजार२३ लाख ३ हजारक़महांकाळ२००२.२९१८ लाख ८६ हजार००००खानापूर११७.०१७० हजार११ हजारमिरज३४.१९२२ हजार५४ हजारत्रुटींमुळे होते शेतकऱ्यांचे नुकसानविमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अपुरा पाऊस, पावसातील खंड आणि अति पाऊस या तीन घटकांमुळे पिकांचे नुकसान झाले तरच त्यांना भरपाई मिळणार होती. हवामान यंत्रे बसविण्यातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली होती. या विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०१४ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार २७४ शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपये विमा रक्कम भरून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद पिकांचा विमा उतरला होता. या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. विमा मंजूर करण्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना अपेक्षित भरपाई मिळाली नाही.