शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

विम्यानेही झिडकारले शेतकऱ्यांना

By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे भले; हप्त्याएवढीही भरपाई नाही

अशोक डोंबाळे - सांगली --विमा कंपन्यांच्या जाचक नियमांमुळे अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शासनाने विमा कंपन्यांशी करार करताना शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचेच हित पाहिल्याचे विमा कंपन्यांच्या भरपाईवरून स्पष्ट होत आहे. खरीप २०१४ या हंगामामधील शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपयांचा विमा हप्ता भरून पिकांचा विमा उतरला होता. या पिकांचे ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. नैसर्गिक आपत्तीमुळे १८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना दोन कोटी ६८ लाख सहा हजार ४० रूपयांची भरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना तर विमा हप्त्यापेक्षाही कमी भरपाई मिळाल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये व नगदी पिकांच्या उत्पादनावर खरीप हंगामात हवामानाच्या विविध घटकांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने खरीप २०१४ पासून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील हवामानावर आधारीत पिक विमा योजना सुरु केली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद या चार पिकांची निवड केली होती. या पिकांचे तीन कारणामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी भरपाई द्यावी असे ठरले आहे. त्यानुसार विमा कंपनी, शासनाने प्रत्येक मंडलस्तरावर वेदर स्टेशन बसविली आहेत. दहा ते बारा गावांचे एक मंडल असल्यामुळे वेदर स्टेशन बसविलेल्या ठिकाणी पाऊस झाला नाही. उर्वरित गावामध्ये पाऊस झाला तरीही तो तेथे नोंदविला जात नाही. यामुळे तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाईपासून वंचित राहावे लागत आहे. वायफळे येथील शेतकऱ्यांनी दोन लाख ८० हजार रूपये विमा हप्ता भरला होता. येथे पाऊसच न झाल्यामुळे खरीप ज्वारी, उडीद पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून ठोस भरपाई मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेने विमा कंपनीकडून आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्काच बसला. केवळ ८० हजार रूपये त्यंना मिळाले. म्हणजे भरलेली रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही. वायफळे येथीलच महादेव पाटील या शेतकऱ्याने उडीद पिकासाठी हेक्टरी शेतकरी हिस्सा म्हणून ६१६ रूपये आणि शासनाने २०५ रूपये विमा हप्ता भरला होता. विमा कंपनीकडून हेक्टरी अकराशे रूपये भरपाई मिळाली आहे. या रकमेतून शेतकऱ्यांच्या पदरात बियाणांची रक्कमही पडली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.ज्वारीचे नुकसान व भरपाईतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईक़महांकाळ२०६९.३३२५ लाख ७४ हजारपाच लाख ७३ हजारकडेगाव२९३.२३दोन लाख ९० हजारएक लाख एक हजारखानापूर१०५३.१५१३ लाख १० हजारसात लाख ९४ हजारमिरज१२.४८१२ हजारसात हजारशिराळा१३.४६१० हजार१६ हजारतासगाव३८५.५६चार लाख ८० १८ हजारवाळवा११.५८१२ हजार१८ हजारबाजरीचे नुकसान आणि भरपाईची रक्कमतालुकाक्षेत्र हेक्टरभरलेली रक्कममिळालेली भरपाईआटपाडी२०८८.५३१९ लाख ६९ हजार ९० लाख ५२ हजारजत५५४२.७९५१ लाख ४१ हजार२३ लाख ३ हजारक़महांकाळ२००२.२९१८ लाख ८६ हजार००००खानापूर११७.०१७० हजार११ हजारमिरज३४.१९२२ हजार५४ हजारत्रुटींमुळे होते शेतकऱ्यांचे नुकसानविमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे अपुरा पाऊस, पावसातील खंड आणि अति पाऊस या तीन घटकांमुळे पिकांचे नुकसान झाले तरच त्यांना भरपाई मिळणार होती. हवामान यंत्रे बसविण्यातील त्रुटीमुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. सांगली जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड केली होती. या विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०१४ मध्ये जिल्ह्यातील ४० हजार २७४ शेतकऱ्यांनी एक कोटी ८६ लाख ३२ हजार ४३ रूपये विमा रक्कम भरून ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद पिकांचा विमा उतरला होता. या शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ४३ कोटी ३० लाख १६ हजार ९७० रूपयांचे विमा संरक्षण होते. विमा मंजूर करण्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये नुकसान होऊनही त्यांना अपेक्षित भरपाई मिळाली नाही.