शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपद आरक्षण सोडतीवरून ग्रामस्थ उद्रेकाच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST

कोल्हापूर: गावात सरपंचपद निवडीवरून टोकाची ईर्षा नको म्हणून ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतच मतदानानंतर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे; पण ...

कोल्हापूर: गावात सरपंचपद निवडीवरून टोकाची ईर्षा नको म्हणून ग्रामविकास विभागाने आरक्षण सोडतच मतदानानंतर घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे; पण रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिनचेहऱ्याच्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदासाठी गृहीत धरून निवडणुका होणार असल्याने एका प्रभागात दिसणारी चुरस आता सर्वच प्रभागात होणार आहेत. त्यामुळे कोणताही चेहरा न देता निवडणुका होत असल्याने ग्रामस्थही सरपंच म्हणून कोणाला निवडायचे या संभ्रमावस्थेत आहेत. या निर्णयावरून ग्रामस्थांमध्ये उद्रेकाची भावना असून, निर्णयाच्या फेरविचारासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मंत्री यांना निवेदने देण्याबरोबरच न्यायालयात देखील जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत मतदानानंतर घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावरून ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत मतदानापुर्वीच घेतली जात असताना त्याच व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या ग्रामपंचायतींनाच वेगळा न्याय का, अशी विचारणा होऊ लागली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक प्रभाग हा सरपंच पदासाठीच गृहीत धरून जोडण्या लावाव्या लागणार असल्याने कारभाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत निघणार होती; पण अचानक सरकारने आपला निर्णय मागे घेत १५ जानेवारीला मतदान झाल्यानंतरच ही सोडत काढण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागे सरपंचपद आरक्षण जाहीर झाले की गावात टोकाची ईर्षा निर्माण होते, पैशांचाही चुराडा होतो, असे स्पष्टीकरण ग्रामविकास खात्यानेच दिले आहे. ही ईर्षा टाळण्यासाठीच सरकारने हा मध्यममार्ग काढला असल्याचेही विभागाचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीसाठी सरपंच हे पूर्वी सदस्यांमधूनच निवडले जात होते; पण भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला. यामुळे गावागावांत सरपंचपदाची निवडणूक ही आमदारकीला लाजवेल अशा पद्धतीने लढवली गेली. शिवाय बहुमत एकाकडे, तर सरपंचपद विरोधी गटाकडे असाही गुंता तयार झाला. यातून अविश्वास ठरावासह वादाचे प्रसंगही वाढले. अखेर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्या आल्या त्यांनी सर्वप्रथम थेट जनतेतून सरपंच निवडीचा आदेशच रद्दबातल ठरवला. याला सरपंच संघटनेने विरोध केला तरी शासन निर्णयावर ठाम राहिले. पूर्वीप्रमाणे सदस्यांतूनच सरपंच निवडण्याचा निर्णय घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

पूर्वीच्या प्रथेप्रमाणे निवडणुकीआधी आरक्षण साेडतीचा कार्यक्रमही जाहीर केला; पण अचानक हा कार्यक्रम महिनाभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. सरपंचपदाचे आरक्षण डोळ्यासमोर ठेवून संभाव्य कारभाऱ्यांनी जोडण्याही लावण्यास सुरुवात केली होती; पण या सर्वांवर महिनाभरासाठी पाणी फिरले आहे. आता या सर्वांना सर्वच प्रभागांत घाम गाळावा लागणार आहे. यातून निवडून आलेल्यांपैकी एकजण गावचा सरपंच होणार असल्याने प्रत्येक प्रभाग हा सरंपचपदाचाच समजून जोडण्या लावाव्या लागणार आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला, त्यालाच हरताळ फासला जाणार आहे.

प्रतिक्रिया

सरकारने घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे पुनर्विचाराची मागणी करणार आहोत. सरपंच पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाताना प्रचंड अनिश्चितता असून, इच्छुकांचा खर्च आणि मनस्ताप वाढणार आहे. हा निर्णय मागे घेऊन सरकारने पुढील नामुष्की टाळावी.

राणीताई पाटील, सरपंच परिषद महिला आघाडी राज्याध्यक्ष