शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनीच ‘चर्चेतून तोडगा’ काढावा !

By admin | Updated: February 20, 2016 00:43 IST

‘इंचनाळ’ महालक्ष्मी यात्रा : तारखांचा घोळ सुरूच, ‘एकी’ची गरज, सलोखा अबाधित राखावा

राम मगदूम - गडहिंग्लज --इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या पंचवार्षिक यात्रेबाबत दोन मतप्रवाह आहेत. यात्रेच्या तारखांबाबत एकमत न झाल्यामुळेच प्रांताधिकाऱ्यांनी सर्वांच्या सोयीच्या तारखांचा कौल ग्रामस्थांच्या मतदानातून घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, मतदानाला विरोध दर्शवितानाच महिलांनी तिसऱ्याच तारखा सुचविल्या आहेत. तारखांचा घोळ सुरूच असल्यामुळे गावातील ‘सलोखा’ आणि ‘बंधूभाव’ अबाधित राहण्यासाठी गावकऱ्यांनीच चर्चेतून तोडगा काढण्याची गरज आहे.‘इंचनाळ’ हे हिरण्यकेशी नदीच्या तीरावर वसलेले गडहिंग्लज तालुक्यातील चारहजार वस्तीचे गाव. चित्री प्रकल्प होण्याआधी वर्षातील सहा महिने हिरण्यकेशी कोरडीच असायची. त्यामुळे गावातील काही मंडळींनी पोटापाण्यासाठी मुंबई गाठली. त्यांची तिसरी पिढीदेखील तिथेच राबते. मात्र, दरवर्षी गणेश जयंतीच्या महाप्रसादासह सणवाराला ते आवर्जून गावी येतात. पुणे-मुंबईतील चाकरमान्यांची संख्या आता सुमारे चारशेच्या घरात आहे.२६ जानेवारीच्या ग्रामसभेत स्थानिक पुढारी मंडळींनी तिथीप्रमाणे मार्चमध्ये यात्रा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नोकरदार मंडळी आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यात्रा मे मध्ये व्हावी, अशी मुंबईकरांची मागणी आहे. मात्र, आठवड्यापूर्वीच्या गावसभेत दोन्ही बाजूची मंडळी आपापल्या मुद्द्यावरच अडून राहिल्यामुळे तोडगा निघाला नाही. दरम्यान, मुंबईकरांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानुसार प्रांतांनी दोन्ही बाजूच्या मंडळींना एकत्र बोलावून चर्चा केली. त्यावेळीही तारखेबाबत एकमत झाले नाही. त्यामुळेच त्यांनी मतदानाचा सल्ला दिला आहे. मात्र, प्रांतांच्या सल्ल्यालाही महिलांनी हरकत घेतल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील ज्येष्ठ मंडळींनीच पुढाकार घेऊन यात्रेबाबत एकमत घडवावे, अशी ‘इंचनाळ’करांसह पंचक्रोशीतील जनतेची मागणी आहे. भावनेचा आदर व्हावापेशवाईत जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन गणेश मंदिरामुळे ‘इंचनाळ’ची ख्याती सर्वदूर आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासह गावातील सार्वजनिक कामात मुंबईकरांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर व्हावा. गावातील आबालवृद्धांसह नोकरदार-चाकरमानी मंडळींनाही यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेवून सर्वांच्या सोयीच्या तारखा ठरवाव्यात.