शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भुदरगड तालुक्यातील रानमेव्यांना बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:12 IST

प्रक्रिया उद्योगांची गरज : कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासनस्तरावरून डोळेझाक

बाजीराव जठार --वाघापूर --भुदरगड तालुक्यातील डोंगराळ भागात करवंदे, जांभूळ, काजू, आंबा, फणस, आळू, चिकण्या, तोरण, नेर्ली यासारख्या रानमेव्यांना बहर आला आहे. रानमेव्याला हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत, या कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासन मात्र डोळेझाक करीत आहे. रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केल्यास यापासून लोणचे, मुरांबा, फणसपोळी, ज्युस, सुका मेवा यासारखे पदार्थ तयार करून ते बारमाही मिळण्याची सोय होईल; पण आज हा रानमेवा नाशवंत असल्याने व्यापारी व दलाल म्हणतील त्या भावाने द्यावा लागतो. दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून आणि काट्याकुट्यातून दिवसभर मेहनत घेऊन आणलेल्या या रानमेव्याचा कष्टकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा होतो. यासाठी शासनाने या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा केल्यास तालुक्यातील लोकांना रोजगार मिळेल. कच्च्या मालाच्या विक्रीतून ग्रामीण जनतेस थोडी कमाई होईल.रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी शासनाची मदत हवी. मोठमोठ्या उद्योगांना सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते; मात्र ग्रामीण भागातील उद्योगांकडे सोयिस्कर डोळेझाक करते. मग ग्रामीण जनता छोट्या-मोठ्या उद्योगाच्या प्रवाहात कशी येणार? असा प्रश्न तालुकावासीयांच्या मनात निर्माण होत आहे. भुदरगड तालुका संघाने रानमेव्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे तशी पूरक जागादेखील उपलब्ध आहे. तरी त्यांची मागणी असल्यास उद्योग उभारणीस सहकार व पणनच्या माध्यमातून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करू.- नाथाजी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष (भुदरगड) व संचालक, बाजार समिती, कोल्हापूर. खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीचा उद्योग उभा केल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांना फळ उद्योगातून अधिक पैसे व रोजगार उपलब्ध होईल.- एकनाथ जठार, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना.