शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

भुदरगड तालुक्यातील रानमेव्यांना बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:12 IST

प्रक्रिया उद्योगांची गरज : कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासनस्तरावरून डोळेझाक

बाजीराव जठार --वाघापूर --भुदरगड तालुक्यातील डोंगराळ भागात करवंदे, जांभूळ, काजू, आंबा, फणस, आळू, चिकण्या, तोरण, नेर्ली यासारख्या रानमेव्यांना बहर आला आहे. रानमेव्याला हक्काची बाजारपेठ मिळावी, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावेत, या कित्येक वर्षांच्या तालुकावासीयांच्या मागणीकडे शासन मात्र डोळेझाक करीत आहे. रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू केल्यास यापासून लोणचे, मुरांबा, फणसपोळी, ज्युस, सुका मेवा यासारखे पदार्थ तयार करून ते बारमाही मिळण्याची सोय होईल; पण आज हा रानमेवा नाशवंत असल्याने व्यापारी व दलाल म्हणतील त्या भावाने द्यावा लागतो. दऱ्याखोऱ्यातून, डोंगरातून आणि काट्याकुट्यातून दिवसभर मेहनत घेऊन आणलेल्या या रानमेव्याचा कष्टकऱ्यांपेक्षा दलालांनाच जास्त फायदा होतो. यासाठी शासनाने या रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभा केल्यास तालुक्यातील लोकांना रोजगार मिळेल. कच्च्या मालाच्या विक्रीतून ग्रामीण जनतेस थोडी कमाई होईल.रानमेव्यावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करण्यासाठी शासनाची मदत हवी. मोठमोठ्या उद्योगांना सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते; मात्र ग्रामीण भागातील उद्योगांकडे सोयिस्कर डोळेझाक करते. मग ग्रामीण जनता छोट्या-मोठ्या उद्योगाच्या प्रवाहात कशी येणार? असा प्रश्न तालुकावासीयांच्या मनात निर्माण होत आहे. भुदरगड तालुका संघाने रानमेव्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांच्याकडे तशी पूरक जागादेखील उपलब्ध आहे. तरी त्यांची मागणी असल्यास उद्योग उभारणीस सहकार व पणनच्या माध्यमातून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा करू.- नाथाजी पाटील, भाजप तालुका अध्यक्ष (भुदरगड) व संचालक, बाजार समिती, कोल्हापूर. खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यातील रानमेव्यावर प्रक्रिया उद्योग उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. अशा पद्धतीचा उद्योग उभा केल्यास तालुक्यातील शेतकरी बांधवांना फळ उद्योगातून अधिक पैसे व रोजगार उपलब्ध होईल.- एकनाथ जठार, जिल्हा सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना.