शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमसिंहराजेंचे विचार आयुष्यभर साथ देतील

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

समरजितसिंह घाटगे : कार्यक र्त्यांशी साधला संवाद

कागल : राजेसाहेबांच्या आकस्मिक निधनाने आमच्या कुटुंबीयांबरोबरच आपल्या सर्वांवर ‘आभाळ’ कोसळले. मी तर फार खचून गेलो होतो. दिवसभर माझ्यासमोर अंध:कार दाटला होता. अंत्यसंस्कार करून घरी परत आलो तेव्हा समजले की शाहू साखर कारखान्याचे कामगार विक्रमसिंहराजेंचा ‘शब्द’ पाळण्यासाठी याही परिस्थितीत कारखान्याचे काम बंद न करता अश्रू ढाळीत काम करीत आहेत. या घटनेने मला आत्मविश्वास मिळवून दिला की राजेसाहेब शरीररूपाने नसतील पण त्यांचे विचार मला आयुष्यभर साथ देतील, अशा शब्दांत नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राजे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. निमित्त होते कारखान्याच्या आसवाणी प्रकल्पातील बायोगॅस प्रकल्पाच्या उद्घाटनाचे. नूतन अध्यक्ष म्हणून कारखान्याचा पहिलाच कार्यक्रम असल्याने समरजितसिंहां- बरोबर त्यांचे चुलते श्रीमंत प्रविणसिंहराजे, भाऊ विरेंद्रसिंहही हजर होते. घाटगे म्हणाले, मी आज तुमच्याशी जाहीर संवाद साधायचा तर काय बोलायचे, हा विचार करण्यासाठी घरात राजेसाहेबांच्याच खोलीत काही काळ जाऊन बसलो. राजेंच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही. पण त्यांच्या विचारधारेंची पोकळी निर्माण होणार नाही. याची काळजी आपण घेऊया. त्यांच्या धोरणांची जपणूक करूया. बांधिलकी म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून शाहू आघाडीची जबाबदारी मी घेतलेली आहे. राजकारणात हे आपले वेगळे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवू. यावेळी आ. वीरकुमार पाटील, अमरसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)पवार आणि कागलचे राजकीय विद्यापीठआमदार वीरकुमार पाटील म्हणाले की, यापुढे ‘राजेगट’ म्हणून आमचा गट कार्यरत राहील. त्यांचे नेतृत्व समरजितसिंहराजे करतील. सीमाभागातील जनता तुमच्या पाठीशी कायम आहे. कागल तालुक्यात मात्र, जरा जपून पाऊल टाका, कारण एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात जर कोठे राजकीय विद्यापीठ स्थापन करायचे असेल तर ते मी कागललाच करेन.आठवड्यातील चार दिवस कागलमध्ये....समरजितसिंह घाटगे म्हणाले की, यापूर्वी माझा संपर्क कमी पडला असेल पण आता मी संपर्क वाढविणार आहे. आठवड्यातील चार दिवस शाहू साखर कारखाना आणि दूध संघावर थांबणार आहे. दोन दिवस कोल्हापुरात असेन. कोणीही कोठेही भेटा. पिढी बदलली आहे. चेहरा बदलला आहे पण राजेंच्या विचारांचे धोरण कायम आहे. माझे चुकले असे वाटले तर माझे चुलते प्रविणसिंहराजेंना सांगा, ते माझा कान पकडतील.