शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

By admin | Updated: September 29, 2014 01:16 IST

चौरंगी लढतीने रंगत : अनेकांना लागणार अनपेक्षित लॉटरी

विश्वास पाटील / कोल्हापूर प्रत्येक मतदारसंघातील मतदान सरासरी तीन लाखांपर्यंत आहे. निवडणुकीत चुरस असल्याने सरासरी ७५ टक्के मतदान होईल, असे गृहीत धरले तरी ज्या उमेदवारांकडे ५० हजार मतांचे पॉकेट आहे, त्याला विजयाची संधी जास्त असल्याचे चित्र विधानसभा निवडणूक १९९९ च्या आकडेवारीच्या आधारे पुढे आले आहे. बहुतांश मतदारसंघांत चौरंगी लढतीचे चित्र दिसते आहे. आतापर्यंत काहींची निवडणूक सोपी होती, ती आता मतविभागणीमुळे अवघड बनली आहे व ज्यांना एकास एक लढतीत विजयासाठी जिवाचे रान करावे लागले असते, ते आता काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत. राज्यात १९९९ ला काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला व ते विधानसभा निवडणुकीस स्वबळावर सामोरे गेले. त्यावेळी शिवसेना-भाजप युती मात्र एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेली; परंतु या निवडणुकीत मात्र दोन्ही काँगे्रसच्या वाटा वेगळ्या झाल्या; तर शिवसेना-भाजपचाही घटस्फोट झाला. मनसेही रिंगणात उतरली. काही भागांत प्रादेक्षिक पक्षांचे अस्तित्व दखल घेण्यासारखे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यातही सहानुभूतीची हवा आहे. शिवसेनाही कधी नव्हे तेवढी आक्रमक बनली. त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. विधानसभेच्या १९९९ च्या लढतीत सर्वाधिक मतदान सांगरूळमधून होऊन संपतराव पवार यांना ६८ हजार ५७६ मते मिळाली होती; तर सर्वांत कमी मतदान कोल्हापूर शहरात होऊन शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना ३५ हजार ३०५ इतकी मते मिळाली होती. सर्वांत कमी मताधिक्क्य कागलमधून हसन मुश्रीफ यांचे २ हजार ८८१ इतके होते. दीड ते दोन लाखांपर्यंत मतदारसंख्या असलेले आठ मतदारसंघ होते. आता या निवडणुकीत नव्याने मतदान करणाऱ्या व तरुण मतदारांचा भरणा जास्त आहे. या वेळी कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ३ लाख ८ हजार ४९५ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार २ लाख ६८ हजार ५८६ इचलकरंजी मतदारसंघात आहेत. रिंगणातील उमेदवारांची संख्या वाढली की उलटेसुलटे व अंदाज चुकविणारे निकाल लागू शकतात. १९९९ च्या लढतीत कोल्हापूर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुरेश साळोखे यांना अवघी ३५ हजार मते मिळाली तरी ते ७ हजार २३७ मतांनी विजयी झाले; कारण त्यावेळी काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, शेकापचे प्रा. विष्णुपंत इंगवले आणि राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्यात मतविभागणी झाली. विरोधातील चौघांच्या मतांची बेरीज ७२ हजार होते. विजयी झालेल्या उमेदवारांना सरासरी ५८ हजार मते मिळाली. आता मतदारसंख्या वाढली. त्यावेळी राज्यात पाच वर्षे शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते व त्यांच्या भ्रष्ट कारभाराने जनता वैतागली होती. आता दोन्ही काँग्रेसबद्दल, त्यातही राष्ट्रवादीबद्दल लोकांच्या मनात जास्त राग आहे. संभाव्य मतविभागणीचा विचार करता, ज्याच्याकडे किमान ५० हजार मतांचे पॉकेट आहे, तो विजयाचा भक्कम दावेदार ठरू शकेल, अशी स्थिती नव्या राजकीय समीकरणामुळे तयार झाली आहे.