शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विजयाचा ‘शुअर शॉट’ ५० हजारांत...!

By admin | Updated: September 29, 2014 01:16 IST

चौरंगी लढतीने रंगत : अनेकांना लागणार अनपेक्षित लॉटरी

विश्वास पाटील / कोल्हापूर प्रत्येक मतदारसंघातील मतदान सरासरी तीन लाखांपर्यंत आहे. निवडणुकीत चुरस असल्याने सरासरी ७५ टक्के मतदान होईल, असे गृहीत धरले तरी ज्या उमेदवारांकडे ५० हजार मतांचे पॉकेट आहे, त्याला विजयाची संधी जास्त असल्याचे चित्र विधानसभा निवडणूक १९९९ च्या आकडेवारीच्या आधारे पुढे आले आहे. बहुतांश मतदारसंघांत चौरंगी लढतीचे चित्र दिसते आहे. आतापर्यंत काहींची निवडणूक सोपी होती, ती आता मतविभागणीमुळे अवघड बनली आहे व ज्यांना एकास एक लढतीत विजयासाठी जिवाचे रान करावे लागले असते, ते आता काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत. राज्यात १९९९ ला काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीचा जन्म झाला व ते विधानसभा निवडणुकीस स्वबळावर सामोरे गेले. त्यावेळी शिवसेना-भाजप युती मात्र एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेली; परंतु या निवडणुकीत मात्र दोन्ही काँगे्रसच्या वाटा वेगळ्या झाल्या; तर शिवसेना-भाजपचाही घटस्फोट झाला. मनसेही रिंगणात उतरली. काही भागांत प्रादेक्षिक पक्षांचे अस्तित्व दखल घेण्यासारखे आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून राज्यातही सहानुभूतीची हवा आहे. शिवसेनाही कधी नव्हे तेवढी आक्रमक बनली. त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. विधानसभेच्या १९९९ च्या लढतीत सर्वाधिक मतदान सांगरूळमधून होऊन संपतराव पवार यांना ६८ हजार ५७६ मते मिळाली होती; तर सर्वांत कमी मतदान कोल्हापूर शहरात होऊन शिवसेनेच्या सुरेश साळोखे यांना ३५ हजार ३०५ इतकी मते मिळाली होती. सर्वांत कमी मताधिक्क्य कागलमधून हसन मुश्रीफ यांचे २ हजार ८८१ इतके होते. दीड ते दोन लाखांपर्यंत मतदारसंख्या असलेले आठ मतदारसंघ होते. आता या निवडणुकीत नव्याने मतदान करणाऱ्या व तरुण मतदारांचा भरणा जास्त आहे. या वेळी कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ३ लाख ८ हजार ४९५ मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार २ लाख ६८ हजार ५८६ इचलकरंजी मतदारसंघात आहेत. रिंगणातील उमेदवारांची संख्या वाढली की उलटेसुलटे व अंदाज चुकविणारे निकाल लागू शकतात. १९९९ च्या लढतीत कोल्हापूर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार सुरेश साळोखे यांना अवघी ३५ हजार मते मिळाली तरी ते ७ हजार २३७ मतांनी विजयी झाले; कारण त्यावेळी काँग्रेसचे महादेवराव आडगुळे, शेकापचे प्रा. विष्णुपंत इंगवले आणि राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्यात मतविभागणी झाली. विरोधातील चौघांच्या मतांची बेरीज ७२ हजार होते. विजयी झालेल्या उमेदवारांना सरासरी ५८ हजार मते मिळाली. आता मतदारसंख्या वाढली. त्यावेळी राज्यात पाच वर्षे शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते व त्यांच्या भ्रष्ट कारभाराने जनता वैतागली होती. आता दोन्ही काँग्रेसबद्दल, त्यातही राष्ट्रवादीबद्दल लोकांच्या मनात जास्त राग आहे. संभाव्य मतविभागणीचा विचार करता, ज्याच्याकडे किमान ५० हजार मतांचे पॉकेट आहे, तो विजयाचा भक्कम दावेदार ठरू शकेल, अशी स्थिती नव्या राजकीय समीकरणामुळे तयार झाली आहे.