शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

विजय जाधव यांची कोडोली ते मंत्रालय अस्थिकलश यात्रा

By admin | Updated: May 6, 2017 19:23 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करणार : भोगी सरकारविरोधात ‘योगी’ सरकारकडे दाद मागणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : ज् शेतकरी आत्महत्येची चेष्टा करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील शेतकरी संघटनेचे विजय जाधव शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले.

या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. कोडोली (ता. पन्हाळा ) येथील शेतकरी विलास शितापे यांच्या अस्थी घेऊन यात्रेला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते सुरुवात केली.

सांगलीहून जिथे-जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत जाऊन तेथील रक्षा घेऊन मंत्रालयापर्यंत विजय जाधव धडक देणार आहेत. यात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील भाजपचे भोगी सरकारचा थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन योगी सरकारसमोर वाभाडे काढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अ‍ॅड. अजित पाटील, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

अंत्ययात्रेनंतर आता अस्थिकलश

विजय जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा मंत्रालयापर्यंत काढली होती. त्यानंतर आता रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दुचाकीवरून अस्थिकलश यात्रा सुरू केली आहे. दबाव आणाल तर याद राखा अस्थिकलश यात्रा निघू नये, यासाठी पोलिसांचा मोठा दबाव आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, तरीही अस्थिकलश यात्रा होऊ नये म्हणून कोणी दबाव आणत असेल तर याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांंत जाधव यांनी पोलिस यंत्रणेला इशारा दिला.