शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

विजय जाधव यांची कोडोली ते मंत्रालय अस्थिकलश यात्रा

By admin | Updated: May 6, 2017 19:23 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करणार : भोगी सरकारविरोधात ‘योगी’ सरकारकडे दाद मागणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : ज् शेतकरी आत्महत्येची चेष्टा करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील शेतकरी संघटनेचे विजय जाधव शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले.

या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. कोडोली (ता. पन्हाळा ) येथील शेतकरी विलास शितापे यांच्या अस्थी घेऊन यात्रेला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते सुरुवात केली.

सांगलीहून जिथे-जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत जाऊन तेथील रक्षा घेऊन मंत्रालयापर्यंत विजय जाधव धडक देणार आहेत. यात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील भाजपचे भोगी सरकारचा थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन योगी सरकारसमोर वाभाडे काढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अ‍ॅड. अजित पाटील, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

अंत्ययात्रेनंतर आता अस्थिकलश

विजय जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा मंत्रालयापर्यंत काढली होती. त्यानंतर आता रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दुचाकीवरून अस्थिकलश यात्रा सुरू केली आहे. दबाव आणाल तर याद राखा अस्थिकलश यात्रा निघू नये, यासाठी पोलिसांचा मोठा दबाव आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, तरीही अस्थिकलश यात्रा होऊ नये म्हणून कोणी दबाव आणत असेल तर याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांंत जाधव यांनी पोलिस यंत्रणेला इशारा दिला.