शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

विजय जाधव यांची कोडोली ते मंत्रालय अस्थिकलश यात्रा

By admin | Updated: May 6, 2017 19:23 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करणार : भोगी सरकारविरोधात ‘योगी’ सरकारकडे दाद मागणार

 आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : ज् शेतकरी आत्महत्येची चेष्टा करणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश दर्शनयात्रा घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील शेतकरी संघटनेचे विजय जाधव शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले.

या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला आहे. कोडोली (ता. पन्हाळा ) येथील शेतकरी विलास शितापे यांच्या अस्थी घेऊन यात्रेला शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते सुरुवात केली.

सांगलीहून जिथे-जिथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या ठिकाणच्या स्मशानभूमीत जाऊन तेथील रक्षा घेऊन मंत्रालयापर्यंत विजय जाधव धडक देणार आहेत. यात्रा पूर्ण होईपर्यंत सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील भाजपचे भोगी सरकारचा थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन योगी सरकारसमोर वाभाडे काढणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील, अ‍ॅड. माणिक शिंदे, अ‍ॅड. अजित पाटील, दादूमामा कामिरे, गुणाजी शेलार आदी उपस्थित होते.

अंत्ययात्रेनंतर आता अस्थिकलश

विजय जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा मंत्रालयापर्यंत काढली होती. त्यानंतर आता रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने दुचाकीवरून अस्थिकलश यात्रा सुरू केली आहे. दबाव आणाल तर याद राखा अस्थिकलश यात्रा निघू नये, यासाठी पोलिसांचा मोठा दबाव आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले तर आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, तरीही अस्थिकलश यात्रा होऊ नये म्हणून कोणी दबाव आणत असेल तर याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांंत जाधव यांनी पोलिस यंत्रणेला इशारा दिला.