शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संचालकांच्या प्रवास भत्त्यावर जोरदार चर्चा

By admin | Updated: September 18, 2016 00:35 IST

शेतकरी संघाची सभा : बदनामीबद्दल ‘गोकुळ’चा निषेध; बैल छाप मिश्रखत, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर : संचालक बैठक भत्त्यात तब्बल तीन लाख पाच हजारांची वाढ झाल्याचे निदर्शनास आणून देत नेमका भत्ता देता किती? अशी विचारणा करीत काही सभासदांनी हा विषय ताणून धरल्याने त्यावर जोरदार चर्चा झाली. शेतकरी संघाची बदनामी करणाऱ्या ‘गोकुळ’ प्रशासनाचा निषेध करीत, ‘गोकुळ’च्या संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणूनच आकांडतांडव सुरू असल्याचा आरोप जयसिंग हिर्डेकर यांनी केला. शेतकरी संघाची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी शाहू स्मारक भवनात झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष युवराज पाटील होते. गतवर्षी संचालक बैठक व प्रवास भत्त्यांवर तीन लाख ८२ हजार खर्च झाले. या वेळेला सहा लाख ८७ हजार रुपये कसा झाला? प्रत्येक संचालकाला किती भत्ता देता? अशी विचारणा आकाराम पाटील (पाडळी खुर्द) यांनी केली. जिल्हा उपनिबंधकांच्या परवानगीने ३७५ रुपये भत्ता देत असल्याचे सचिव आप्पासाहेब निर्मळ यांनी सांगितले. यावर हरकत घेत, सत्तारूढ मंडळींनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भत्ता घेणार नसल्याचे अभिवचन दिले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करीत पाटील यांनी संचालकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. संचालकांची संख्या वाढल्याने भत्त्यात वाढ झाल्याचे निर्मळ यांनी सांगितले. एक कोटी नफा कमविणार तर त्याचा आराखडा काय? अशी विचारणा संभाजी जगदाळे (कोल्हापूर) यांनी केली. संघाच्या जागा भाड्याने दिल्या आहेत, नवीन शाखा सुरू करणार असल्याने कोटीपेक्षा अधिक नफा होईल, असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केला. बाजार समित्यांच्या जोखडातून शेतकरी बाहेर पडला आहे, भाजीपाला खरेदी-विक्रीत संघाने उतरावे, अशी मागणी शिवाजीराव पोवार यांनी केली. गोडावून भाड्याने देताना जागरूकपणे करार करा, बैल छाप मिश्रखत सुरू करा, औषध दुकान, पेट्रोल पंप सुरू करण्याची मागणी सभासदांनी केली. ‘गोकुळ’च्या सभेत संघाची बदनामी केल्याचे निदर्शनास आणून देत, ‘संघ चालवावा तर शेतकरी संघ’ असा कारभार करण्याचे आवाहन भैया माने (कागल) यांनी केले. संचालकांची चरण्याची कुरणे बंद होणार म्हणून कारभाऱ्यांचे आकांडतांडव सुरू असल्याची टीका हिर्डेकर (बाजारभोगाव) यांनी केली. दिलीप खाडे (सांगरूळ), किरण पास्ते, नामदेव चांदणे (पिरळ) यांनी चर्चेत भाग घेतला. (प्रतिनिधी)नवखा आहे...: भुयेकरांकडून चिमटा व्यासपीठावरील संचालकांची नावे घेताना शशिकांत पाटील-चुयेकर यांचा उल्लेख करीत आनंदरावांचा चिरंजीव नवखा आहे; पण थोडा इकडे-तिकडे भरकटतोय, अशा शब्दांत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी चिमटा काढला.