शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शाहूंच्या जिल्ह्यात ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’

By admin | Updated: March 3, 2015 00:43 IST

शाहूवाडी तालुक्यातील शाळा : नावांतूनच जातीचे बीजारोहण

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा असलेल्या जिल्ह्णातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ या नावाने शाळा आहे. ‘हरिजनवाडा’ नाव असल्यामुळे सवर्णाच्या बहुतांशी मुलांनी या शाळेकडे पाठ फिरविली आहे. शिक्षणाचे धडे गिरविण्यास सुरुवात करण्यापूर्वीच नावामुळे विशिष्ट असा समाज, जातीचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनात अप्रत्यक्षपणे रूजत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जात आडवी येऊ नये म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नावातूनच जात, समाज निदर्शनास येत असतानाही तालुका, जिल्हा पातळीवरील शिक्षण प्रशासनाने आजपर्यंत डोळेझाक केल्याचे दिसत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला जाती-पातीच्या अंताच्या संघर्षाचा इतिहास आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. शाहू महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्णाला वेगळे महत्त्व आहे. अशा जिल्ह्णात स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाल्यानंतरही विद्यामंदिरला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. शाळेच्या नावातूनच जात स्पष्ट होते. स्पष्ट होऊ नये म्हणून नाव बदलण्याची तसदी अजून तरी शिक्षण विभागाने घेतलेली नाही. दलित, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या एकाही संघटनेने शाळेच्या नावाबद्दल असा आक्षेप घेतलेला नाही. गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद सदस्य विकास कांबळे यांनी ‘हरिजनवाडा’ असे शाळेला नाव असल्यावर आक्षेप नोंदविला. त्यांनी ‘विद्यामंदिर शित्तूर वारुण’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. शाहूंच्या जिल्ह्णात शाळेला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे होऊन गेले तरी शाळेचे नाव बदलावे, असे शिक्षण विभागाला वाटलेले नाही ही खेदाची बाब आहे. अन्य प्राथमिक शाळा गावाच्या नावाने आहेत तेथे मात्र ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. शिक्षण प्रशासन त्या शाळेत जाणीवपूर्वक मागासवर्गीय शिक्षक देते, अशीही माहिती मिळाली आहे. संवर्णाच्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. हे अतिशय गंभीर आहे. - विकास कांबळे,जिल्हा परिषद सदस्य‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे शाळेचे नाव आहे. अनेक वर्षांपासून याच नावाने शाळा भरते. नाव बदलण्याची मागणी झाली. माझ्याकडे प्रभारी कार्यभार आहे. शाळेबद्दल अधिक माहिती नाही. - टी. एल. मोळे,प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारीशाहूंच्या जिल्ह्णात शाळेला ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे होऊन गेले तरी शाळेचे नाव बदलावे, असे शिक्षण विभागाला वाटलेले नाही ही खेदाची बाब आहे. अन्य प्राथमिक शाळा गावाच्या नावाने आहेत तेथे मात्र ‘हरिजनवाडा’ असे नाव आहे. शिक्षण प्रशासन त्या शाळेत जाणीवपूर्वक मागासवर्गीय शिक्षक देते, अशीही माहिती मिळाली आहे. संवर्णाच्या विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. हे अतिशय गंभीर आहे. - विकास कांबळे,जिल्हा परिषद सदस्य