शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हातकणंगलेमुळेच ‘सत्तारूढ’चा विजय

By admin | Updated: April 23, 2015 00:54 IST

राजाराम कारखाना : भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोलीत एकतर्फी मतदान

आयुब मुल्ला-खोची राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ गटाला आपली खुर्ची अबाधित ठेवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे, सावर्डे, नरंदे, टोप, शिरोली, पेठवडगाव या गावांनीच भरघोस मदत केली. एकतर्फी मतदान करीत भेंडवडे, सावर्डे, नरंदे हेच तर आघाडीचे मानकरी ठरले. इथे थोडी जरी विरोधकांनी सावध भूमिका घेतली असती, तर मात्र चित्र वेगळे पाहावयास मिळाले असते.  कारखान्याच्या १२ हजार ६२४ सभासदांपैकी ४ हजार ८०० सभासद हातकणंगले तालुक्यातील आहेत. उर्वरित सभासद इतर सहा तालुक्यांतील आहेत. या सहा तालुक्यांतील सभासदांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलला ७० टक्क्यांच्या आसपास मतदान केले. हातकणंगले तालुक्यातील काही गावांनी समान ठेवले, तर परिवर्तनला थोडे मताधिक्यही दिले. यामध्ये कुंभोज व कोल्हापूर, सांगली रस्त्याच्या उजव्या बाजूकडील गावांचा समावेश आहे. या गावांनी सत्तारूढ गटाला अनपेक्षितरीत्या धक्का दिला; परंतु वडगाव परिसरातील चार गावांनीच सत्तारूढची एकतर्फी सोबत केली. विशेष म्हणजे, भेंडवडे गावातील १८० मते सत्तारूढला, तर परिवर्तनला फक्त दहा मते मिळाली. सत्तारूढचे उमेदवार सर्जेराव माने यांच्या व्यूहरचनेचा व उमेदवारीचा विक्रमी मताधिक्य घेण्यास फायदा झाला. हेच सर्जेराव माने गतवेळेला सत्तेज पाटील यांच्या पॅनेलमधून उभे होते; परंतु या परिसरारतील इतर उमेदवारांच्या तुलनेत मात्र त्यांनी थोडी कमी मते मिळाली. सतेज पाटील यांचा स्वत:चा गट नसल्यामुळे भेंडवडे, सावर्डे, नरंदे या गावांत पॅनेलला फटका बसला. आमदार महाडिक गटाने मात्र याच गावांवर अधिक भर देत प्रचाराची सर्व यंत्रणा राबविली. या गटात महाडिक यांना मानणारा गटही प्रबळ आहे. याचा फायदा त्यांना झाला. अंतिम टप्प्यापर्यंत सतेज पाटील यांनीही प्रचारासाठी या गावात बांधणी करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाह