शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

सत्तेच्या साठमारीत शेतकऱ्यांचा बळी

By admin | Updated: November 22, 2014 00:04 IST

बाजार समिती : शासनाच्या निर्णयातील त्रुटींबाबत कारभाऱ्यांचे मौनच

प्रकाश पाटील- कोपार्डे -छत्रपती शाहू महाराजांनी गूळ उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक लूट थांबवावी, यासाठी बाजार समितीची स्थापना केली. शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देत हमीभाव व त्याच्या वसुलीला हमी मिळवून देत शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांपेक्षा स्वत:ची सत्ता अबाधित ठेवण्यासाठीच बाजार समितीचा वापर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मागील वर्षी शासनाने गुळावरचे नियमन रद्द करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदाच आणली. हे नियमन रद्द झाल्यामुळे गूळ विक्रीची शाहू महाराजांनी निर्माण केलेली साखळीच तुटल्याने शेतकऱ्यांच्या गुळाचा व्यापार पुन्हा व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे. अलीकडेच शासनाने गुऱ्हाळघरांसाठी अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेण्याची अट घातल्याने शेतकरी गर्भगळीत झाला आहे. एवढेच नाही, तर अडते हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा गूळ कुठे ठेवायचा? त्याशिवाय विक्रीपश्चात त्याचे पैसे व्यापाऱ्याकडून मिळायच्या हमीला ग्रहण लागले आहे. यावेळी बाजार समितीच्या कारभाऱ्यांनी वरील निर्णयातील त्रुटीबद्दल शासनाबरोबर दोन हात करायला हवे होते. वास्तविक आधुनिकतेची कास धरत बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असणाऱ्या गुळाबाबत नवनव्या योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे होते. यात गूळ क्लस्टर योजना, गूळ शितकरण केंद्र स्वच्छ व निर्धोक जागा उपलब्ध करून देण्यावर लक्ष दिले नाही. कारभारी मंडळींनी शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी, दलाल, अडते यांचेच हित सांभाळले आहे. (समाप्त)गूळ दर प्रश्नाबाबत आज बैठकगुळाच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी उद्या, शनिवारी पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा गुऱ्हाळमालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील-कोपार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली. गुळाचे नियमन रद्द झाल्याने दरावर परिणाम झाला आहे. गूळ मार्केटवरील नियंत्रण कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या उधारीबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत दोन अडत दुकानदार शेतकऱ्यांची लाखो रुपयांची उधारी बुडवून पसार झाले आहेत. या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनाही निमंत्रित केले आहे.