शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
4
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
5
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
6
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
7
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
8
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
9
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
10
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
11
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
12
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
13
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
14
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
15
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
16
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
17
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
18
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
19
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
20
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

अंधश्रद्धेनेच घेतला रमेश मिसाळ यांचा बळी

By admin | Updated: July 25, 2014 22:55 IST

भगतगिरीचा संशय : करणी करत असल्याच्या भीतीने वाडीने टाकला होता बहिष्कार

शिवाजी गोरे -दापोली ,साखरोळी नंबर १ येथील रमेश मिसाळ यांचे कुटुंब झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याने तालुक्यात खळबळ उडाली. अंधश्रद्धेमुळेच रमेश मिसाळ यांचा बळी गेला असल्याचे समोर येऊ लागले आहे. रमेश मिसाळ हे भगतगिरी करुन करणी करत असल्याचा वाडीतील ग्रामस्थांना संशय होता. त्यामुळे वाडीतील लोकांनी त्या कुटुंबावर अघोषित बहिष्कार टाकला होता.देवदेवस्की व प्रॉपर्टीच्या वादातून रमेश मिसाळ यांच्यावर तलवारी, कुऱ्हाड, कोयता व चॉपरने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला. मोठा मुलगा रुपेश, लहान मुलगा प्रफुल्ल व पत्नी ऋचिता डेरवण येथे उपचार घेत आहेत. या कुटुंबावर अमानूषपणे झालेला हल्ला माणूसकीला काळीमा फासणारा असून, त्यांच्या नातेवाईकाने पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला आहे. जमिनीचा वाद हे वरकरणी कारण दिसून येत असले तरी भगतगिरी करत असल्याचा संशयसुद्धा त्याच्यावर होता.रमेश मिसाळ हे गावातील बैठकीत, वाडीच्या बैठकीत, सार्वजनिक कार्यक्रमात अंगाऱ्याच्या पुड्या खिशात घेऊन येत असल्याचा अनेकांचा संशय होता. ते भगतगिरी करुन आपल्याला काहीतरी करतील, या भीतीने त्याच्यासह कुटुंबीयांशी कोणीही बोलत नव्हते किंवा त्याच्या वाटेला कोणीही जात नव्हते. ते भगतगिरी करत असल्याचा संशय असल्यानेच त्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला होता. अंगारा, लिंबू घेऊन ते करणी करतात, असा अनेकांचा संशय होता. त्यातच संतोष मिसाळ यांच्या मृत्यूलाही रमेश मिसाळची भगतगिरी कारणीभूत असल्याचा समज आहे. त्यामुळे संतोष मिसाळ यांची पत्नी, मुले यांचा रमेश मिसाळ यांच्या कुटुंबावर राग होता. जमिनीचा वाद हे कारण असले तरी भगतगिरी हेच मुख्य कारण आहे, हेसुद्धा चौकशीत निष्पन्न झाले आहे.रमेश मिसाळ यांनी करणी करुन अनेकांच्या कुटुंबात विघ्न आणले, असेही या गावातील लोक छातीठोकपणे सांगत आहेत. अशा व्यक्तीला समाजाने मदत करायची नाही, असे ग्रामस्थांनी अलिखित ठरवल्यानेच त्यांच्या घरात हल्ला होत असतानाही मदतीसाठी कोणीही पुढे झाले नाहीत.रमेश मिसाळ यांचा पाठलाग करुन अमानूषपणे हत्या करणारे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या संशयित आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. या प्रकरणातील हत्यारे जप्त करण्यात आली असून, आरोपीने फिर्यादीचा खून कशा प्रकारे व कोणत्या कारणासाठी केला, याचे संपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले आहेत. ज्या काजूची फांदी तोडण्यावरुन वाद झाला त्या जागेचे सर्व कागदपत्र महसूल विभाग तपासून पाहणार आहे. याआधी दहा वर्षांपूर्वीही रमेश मिसाळ यांच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तेव्हा घरात कोणीच नसल्याने अनर्थ ओढवला नाही. आता मात्र या साऱ्यामध्ये रमेश मिसाळ यांचा जीव गेला आहे.अंधश्रद्धेमुळे एखाद्याचा बळी जाऊ शकतो. कोणाच्या भगतगिरीने काहीही होत नाही. ती केवळ अंधश्रद्धा आहे. परंतु अंधश्रद्धेमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. - अनिश पटवर्धन, तालुकाध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मुलन समिती