शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा नदी प्रदूषणाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 17, 2017 00:10 IST

ग्रामस्थांतून संताप : कृष्णा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात; उपाययोजना राबविण्याची गरज

संतोष बामणे ल्ल उदगावगेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीला काळेकुट्ट मळीमिश्रित पाणी आल्याने जलचर प्राणी मृत पावले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा पडल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील गावांत आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेली व शिरोळ तालुक्याची जीवनदायी असणारी कृष्णा नदी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे गरजेनुसार पाणी वारणा व कोयना धरणातून सोडले जात आहे. सांगली जिल्ह्यातील दूषित पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळे शिरोळ तालुक्यातील गावांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे सांगली-कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागाने दुर्लक्ष केले आहे. शिरोळ तालुक्यातील सामाजिक संघटनांनी अनेकवेळा आंदोलने करूनही त्याकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना चालना मिळत आहे.गेल्या चार दिवसांपासून नदी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नदीत जलपर्णी येत असल्याने हिरवट व काळसर पाणी आले असून, पाण्याला उग्र वास येत आहे. काही ग्रामपंचायतीकडे जलशुद्धीकरण केंद्र नसल्यामुळे नदीतील थेट पाणी नळास येत असल्याने हे पाणी नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. तसेच नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. या गावांना धोकाशिरोळ तालुक्यातील कोथळी, उमळवाड, उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड, कुटवाड, कनवाड, हसूर, गणेशवाडी, कवठेगुलंद, शेडशाळ, नृसिंहवाडी, आलास, बुबनाळ, बस्तवाड यासह अनेक गावे कृष्णा काठावर वसलेली आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीबरोबरच आता कृष्णा काठावरील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.