शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडली

By admin | Updated: December 14, 2015 00:07 IST

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त : श्रेणी - २ केंद्रांमध्ये सेवेचा बोजवारा

रामचंद्र पाटील -- बांबवडे--शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा गाडा सुरळीत चालण्यास मदत होते; परंतु या पशुधनासाठी असणारी आरोग्य सुविधाच व्हेंटिलेटरवर असल्याने जनावरांना शाहूवाडी तालुक्यात वालीच उरला नसल्याचे चित्र आहे.शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेची १२ पशुवैद्यकीय केंद्रे आहेत. तर बांबवडे येथे महाराष्ट्र शासनाचे एक पशुवैद्यकीय केंद्र आहे. तालुक्यात श्रेणी-१ ची मलकापूर, विरळे, शित्तूर-वारुण, रेठरे, आंबा, मांजरे, सोनुर्ले, परळे निनाई या ठिकाणी केंद्रे आहेत.श्रेणी-१ केंद्रांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची सर्व पदे रिक्त आहेत. या केंद्रात पशुधन पर्यवेक्षक व परिचर यांचीही संख्या कमी आहे. या केंद्रात सर्व सुविधा असूनही अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. काही केंद्रे ही परिचरावरच अवलंबून असून, त्यांना काम करण्यासही मर्यादा आहेतच.श्रेणी-२ केंद्राची अवस्था थोडी बरी आहे. या केंद्रांमध्ये सर्व पदे भरलेली आहेत; परंतु केंद्रामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा अपुऱ्या आहेत. त्यामुळे ‘जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत, तर दात आहेत तेथे चणे नाहीत’, अशी या केंद्रांची अवस्था झाली आहे. यामध्ये जनावरांना सुविधा मात्र मिळू शकत नाहीत.महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २००४/५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात १७२ दवाखाने मंजूर झाले होते. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला सहा मिळाले. त्यापैकीच तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बांबवडे येथे आहे. यासाठी निधी मंजूर आहे. जागा मंजूर आहे; परंतु शासनाच्या उदासीनतेचा फटका बसल्याने दहा वर्षांचा कालावधी होऊनही येथे पशुवैद्यकीय दवाखाना पूर्ण क्षमतेने सुरू नाही.या सर्वांवर कळस म्हणजे या केंद्रात पाच पदे मंजूर असून एकही पद भरलेले नाही. या केंद्रात जनावरांवर उपचार करण्याच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असूनही एकही कर्मचारी येथे उपलब्ध नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून मोहरे येथील एक परिचर व पट्टणकोडोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यातून दोन दिवस येतात; परंतु त्यांच्यातही नियमितता नसल्याने या केंद्राकडे शेतकऱ्यांनी कायमचीच पाठ फिरविली आहे.पशुसंपदेची गैरसोय टाळावीशासन एम.पी.एस.सी.मार्फत या अधिकाऱ्यांची पदे भरते; परंतु जिल्ह्यात मोठ्या दोन दूध संस्था असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात अधिकारी येण्यासाठी राजी नसतात. यावर शासनाने उपाययोजना करून ही पदे भरून शेतकऱ्यांची पशुसंपदा तरी वाचवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.