शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाने बेवारस स्थितीत

By admin | Updated: December 19, 2014 23:31 IST

डॉक्टरांची पदे रिक्त : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड; शासकीय लसीकरण योजनांचा लाभ मिळेना

अतुल आंबी - इचलकरंजी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक दवाखाने धूळ खात बेवारसपणे पडून आहेत. परिणामी अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे, तर ज्या गावातील दवाखाने बंद आहेत, तेथील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून, शासनाकडून येणाऱ्या लसीकरणाच्या योजनांचा लाभही मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत.जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जिल्हा परिषद व राज्यस्तरीय असे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेकडे पशुधन विकास अधिकारी वर्ग-१ ची ९५ मंजूर पदे असून, ४३ पदे भरली आहेत व ५२ पदे रिक्त आहेत. सहायक अधिकारी वर्ग- ३ ची १५ पैकी १० पदे भरली असून, ५ रिक्त आहेत, तर पशुधन पर्यवेक्षक दोन पदे रिक्त आहेत. राज्यस्तरीय शासनाच्या पशुवैद्यकीय ३६ दवाखान्यांत एकूण ३६ अधिकारी, ३६ कर्मचारी पदे मंजूर असून, त्यातील चौदा पदे रिक्त आहेत. यामध्ये साजणी, माणगाव, चंदूर, कुंभोज, सावर्डे, पारगाव, दत्तवाड, दानोळी, यड्राव, हेरवाड, शिरढोण, जांभळी, आदी गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांना आपली जनावरे खासगी डॉक्टरांकडे तपासून घ्यावी लागतात. महागड्या औषधोपचारांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच शासकीय लसीकरण योजनांचा लाभही शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात.तसेच आता या आकडेवारीमध्ये वाढ झाली असल्याची शक्यता आहे. मात्र, पशुवैद्यकीय दवाखाने आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी घटली आहे. दूध उत्पादनात सधन मानल्या जाणाऱ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सरकारी दवाखान्यात आपल्या जनावरांचे उपचार करण्यासाठी धडपड करावी लागत आहे. काही दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नाहीत. काही ठिकाणी आठवड्यातून एक-दोन दिवस डॉक्टरांची उपस्थिती असते. त्यामुळे जनावरे दवाखान्यात आणून परत न्यावी लागतात. जनावरांची हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.जिल्ह्यातील आकडेवारी२००७ च्या पशुगणनेनुसार एकूण दोन लाख ५३ हजार ३४७ गायी, सहा लाख ४६ हजार २१७ म्हशी, एक लाख ९१ हजार ४५९ शेळ्या, एक लाख ६५ हजार ६६८ मेंढ्या, आठ लाख ६८ हजार ३१९ कोंबड्या, एक हजार ६९६ घोडे, १३६ गाढवे, चार हजार ५८६ डुकरे, असे २१ लाख ३१ हजार ४२८ जनावरे आहेत, तर पाळीव कुत्रे, ससे व अन्य जनावरांची नोंद नाही.