शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

घोटवडेच्या डोंगळे कुटुंबात ‘गोकुळ’वरून उभी फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:24 IST

सुनील चौगले, लोकमत न्यूज नेटवर्क आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’च्या राजकारणाचा पहिला भूकंप राधानगरी तालुक्यात झाला असून, गेली पन्नास वर्षे ...

सुनील चौगले, लोकमत न्यूज नेटवर्क

आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’च्या राजकारणाचा पहिला भूकंप राधानगरी तालुक्यात झाला असून, गेली पन्नास वर्षे एकसंध असणारे घोटवडे येथील डोंगळे कुटुंबात उभी फूट पडली आहे. या फुटीला अरुण डोंगळे यांचे बंड कारणीभूत असले तरी कुटुंबांतर्गत वादाची किनारही पाहावयास मिळते. यामुळे राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, शह काटशहाचे राजकारण म्हणून सत्तारूढ गटाकडून ‘गोकुळ’चे माजी संचालक स्वर्गीय विजयसिंह डोंगळे यांच्या पत्नी भारती डोंगळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

गेली पन्नास वर्षे रंगराव डोंगळे, विजयसिंह डोंगळे व अरुण डोंगळे यांच्या रूपाने ‘गोकुळ’मध्ये डोंगळे कुटुंबीय कार्यरत आहे. अरुण डोंगळे हे तब्बल तीस वर्षे संचालक मंडळात आहेत. विजयसिंह डोंगळे व अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’चे राजकारण ताकदीने केलेच, त्याचबरोबर ‘भोगावती’ साखर कारखान्यासह राधानगरी तालुक्याच्या राजकारणावर पकड निर्माण केली. अरुण डोंगळे हे ‘गोकुळ’मध्ये राहिले तर विजयसिंह डोंगळे यांनी सुपुत्र धीरज डोंगळे यांना ‘भोगावती’च्या राजकारणात आणून ताकद भक्कम करण्याचा प्रयत्न केला. विजयसिंह यांच्या निधनानंतर डोंगळे घराण्यातील अंतर्गत धूसफुस सुरू झाली आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अरुण डोंगळे यांनी त्यांचे सुपुत्र अभिषेक यांना राजकीय प्रवाहात सक्रिय केले आणि येथेच डोंगळे घराण्यातील संघर्षाची पहिली ठिणगी पडली.

अरुण डोंगळे यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा बऱ्याच वर्षांपासून होती. त्यातूनच २००४ ला सांगरूळ मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यानंतर २०१९ ला ‘राधानगरी’ मधून त्यांनी शड्डू ठोकला. ‘गोकुळ’च्या मल्टीस्टेटच्या मुद्यावरून डोंगळे यांनी उघड विरोध केला होता. यावरून डोंगळे यांना पंधरा हजार मतेही मिळणार नाहीत, अशी बोचरी टीका माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी केली होती. यानंतर डोंगळे व महाडीक यांच्यात दरी निर्माण झाली आणि येथेच सत्तारूढ गटापासून फारकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’ निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे सत्तारूढ गटातील घडामोडी वेगावल्या आणि त्यांच्या भावजय भारती विजयसिंह डोंगळे यांना रिंगणात उतरण्याची तयारी सत्तारूढ गटाने केली. भारती डोंगळे या स्वर्गीय महिपतराव बोंद्रे यांच्या कन्या तर आमदार पी. एन. पाटील यांच्या मेहुण्या आहेत.

राधानगरी तालुक्यातील ४५८ ठराव आहेत, यामध्ये अरुण डोंगळे यांना मानणारे सुमारे दीडशे आहेत तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना मानणारे १२५ ठराव आहेत. या दोन्ही नेत्यांकडे ६० टक्के ठराव असल्याने सत्तारुढ गटाची दमछाक होणार, हे निश्चित आहे.

चौकट

सत्तारुढ आघाडीतून चौगले की कौलवकर

राधानगरीतून विद्यमान संचालक पी. डी. धुंदरे व भारती डोंगळे यांची उमेदवारी निश्चत मानली जाते. तिसरी जागा घेऊन तिथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले की ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तिन्ही जागा ‘भोगावती’ काठावर दिल्या तर पॅनेलचा समतोल साधणार का? ही सत्तारूढ गटाची डोकेदुखी आहे.

दूध संकलन कमी व मतदारच जास्त!

करवीर पाठोपाठ राधानगरी तालुक्यात मतदार संख्या जास्त आहे. ४५९ मतदार संख्या असूनदेखील केवळ ६० हजार लिटर प्रतीदिन संकलन आहे. त्यामुळे दूध संकलन कमी व मतदार संख्या जास्त, असे चित्र आहे.

राष्ट्रवादीकडून ‘चौगले’, ‘फिरोजखान’ इच्छुक

विरोधी आघाडीकडून राधानगरी तालुक्यातून प्रा. किसन चौगले व माजी संचालक फिरोजखान पाटील इच्छुक आहेत. ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर करायचे असल्यास ताकदवान उमेदवार रिंगणात उतरवण्याची व्यूहरचना पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांची आहे. त्यातूनच ए. वाय. पाटील किंवा त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा प्रयत्न असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही त्यासाठी दबाव वाढत आहे; मात्र ‘ए. वाय.’ यांची उमेदवारीबाबत मानसिकता दिसत नाही.

कोट

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. अनेक ठिकाणी अनेकांच्या घरात वाद हा असतोच, त्यामुळे आमच्या घरातील फुटीवर जास्त काहीच बोलणार नाही.

- अरुण डोंगळे

मी आमदार पी. एन. पाटील यांचे नेतृत्व मानून काम करणारा कार्यकर्ता आहे. जर अरुण डोंगळे हे आमदार पाटील यांचे नेतृत्व मानून काम करणार असतील तर आमच्यात फूट होण्याचे कारण नाही. त्यांनी वेगळा विचार केला असेल तर तो आपणास मान्य नाही.

- धीरज डोंगळे.