शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:39 IST

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या ...

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या के.एम.टी.च्या बसेसवर तुफान दगडफेक केली.त्यानंतर शेजारील दैनिक ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर दगडफेक करीत हा जमाव व्हीनस कॉर्नर परिसरातील चौकात आला. या ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक्टर अडविण्यात आला. त्यानंतर हाच जमाव पुढे स्टेशन रोडवर आला. त्या ठिकाणी लावण्यात आलेली चारचाकी वाहने व पी. एन. जी., जुन्या उषा टॉकीजवर व अन्य बंद असलेल्या दुकानांवर तुफान दगडफेक केली. हाच जमाव शाहूपुरी व्यापारी पेठ, पुढे वामन गेस्ट हाऊस, हॉटेल अ‍ॅम्बॅसडर, राधाकृष्ण तरुण मंडळ, गृहिणी, पार्श्वनाथ बँक, आदींच्या दारांत दिसेल त्या चारचाकी व दुचाकींवर दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचे पडसाद म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्ते व ज्यांची वाहने फोडली असे सर्वजण एकत्रित येत वाहने फोडणाºया कार्यकर्त्यांवर तुटून पडले. त्यात दगडफेक करून पळून जाणाºया दोघांना गोकुळ हॉटेलच्या पाठीमागे पकडले. त्यातून दोघेही निसटले. मात्र, त्यांची दुचाकी कार्यकर्त्यांच्या हाती सापडली. संतप्त कार्यकर्त्यांनी ती दुचाकी पेटविली. काही काळानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन परिस्थिती काबूत आणली व अग्निशमन दलाने आग विझविली.दरम्यान, एक वाजता काही आंदोलकांनी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या घरासमोरील गाड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त झालेले चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते स्टेशन रोडवर येऊन ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्यांची समजूत काढत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तोडफोड केलेल्या गाड्यांची पाहणी केली व गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही चव्हाण यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्हीनस कॉर्नर चौकात एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली.पर्यटकांच्या गाड्यांवर तुफान दगडफेकपर्यटनासाठी आलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, आदी ठिकाणांचे पर्यटक जेवण करण्यासाठी शाहूपुरीतील वामन गेस्ट हाऊस, अ‍ॅम्बॅसडर हॉटेल, आदी ठिकाणी आले होते. त्यांच्या पार्किंग केलेल्या चारचाकींवर आंदोलक कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. झालेल्या नुकसानीला कुणाला जबाबदार धरायचे, असा सवाल माध्यम प्रतिनिधींसमोर केला.शाहूपुरी पहिली गल्ली, दुसरी गल्ली या दोन गल्ल्यांमध्ये दिसेल त्या वाहनांवर कार्यकर्ते आक्रमक होत काठी, लोखंडी रॉड व मोठे दगड घेऊन अक्षरश: तुटून पडत होते. त्यातून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थितीत संपूर्ण स्टेशन रोडवर होती. उषा टॉकीज ते दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलक दिसेल त्या वाहनांच्या व बंद असलेल्या दुकानांच्या काचा फोडत सुटले होते. प्रक्षुब्ध झालेला जमाव दगडफेक करीत वरपर्यंत गेला व पुन्हा खाली दसरा चौकाकडे आला. दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या मार्गांवरील वाहतूक तुरळक होती.व्हीनस कॉर्नर चौकात सौम्य लाठीमारबुधवारी दुपारच्या सुमारास दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे आला. त्यावेळी जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावावर सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगविले. त्यामुळे वातावरण काहीवेळ थंड झाले; पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा चौकात आला. त्यांनी थेट या चौकातील दोन मोठ्या दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविली व स्टेशन रोडवर ठिय्या मारला. पोलिसांना पाहताच तेथून शाहूपुरी पहिल्या गल्लीत जमाव गेला. तेथे असणाºया चारचाकी, रिक्षा व दुचाकी वाहनांची तोडफोड करीत हा जमाव पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे व्हीनस कॉर्नर चौकात तणावपूर्ण वातावरण होते.केएमटीचेही नुकसानभीमसैनिकांनी दिलेल्या ‘बंद’च्या हाकेमुळे दसरा चौकातील मैदानात के.एम.टी. बसेस पार्किंग करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत बसेस फोडल्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या बसेस बंदिस्त सुभाष स्टोअर्स अथवा बुद्ध गार्डनमध्ये पार्क केल्या असत्या तर त्यांचे नुकसान झाले नसते. याबाबतचा निर्णय अधिकाºयांनी का घेतला नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात होता.