शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

शाहूपुरी परिसरात दिसेल ती गाडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:39 IST

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या ...

कोल्हापूर : कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सकाळपासूनच भीमसैनिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ला उत्तम प्रतिसाद लाभला होता; तरीही काही तरुणांनी प्रथम गुजरी येथील बंद सराफी दुकानांवर दगडफेक करीत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हाच जमाव पुढे दसरा चौक येथे आला. या ठिकाणी काही काळ घोषणाबाजी करीत दसरा चौकातील मैदानात पार्किंग केलेल्या के.एम.टी.च्या बसेसवर तुफान दगडफेक केली.त्यानंतर शेजारील दैनिक ‘तरुण भारत’च्या कार्यालयावर दगडफेक करीत हा जमाव व्हीनस कॉर्नर परिसरातील चौकात आला. या ठिकाणी उसाने भरलेला ट्रॅक्टर अडविण्यात आला. त्यानंतर हाच जमाव पुढे स्टेशन रोडवर आला. त्या ठिकाणी लावण्यात आलेली चारचाकी वाहने व पी. एन. जी., जुन्या उषा टॉकीजवर व अन्य बंद असलेल्या दुकानांवर तुफान दगडफेक केली. हाच जमाव शाहूपुरी व्यापारी पेठ, पुढे वामन गेस्ट हाऊस, हॉटेल अ‍ॅम्बॅसडर, राधाकृष्ण तरुण मंडळ, गृहिणी, पार्श्वनाथ बँक, आदींच्या दारांत दिसेल त्या चारचाकी व दुचाकींवर दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला चढविला. त्यात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याचे पडसाद म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्ते व ज्यांची वाहने फोडली असे सर्वजण एकत्रित येत वाहने फोडणाºया कार्यकर्त्यांवर तुटून पडले. त्यात दगडफेक करून पळून जाणाºया दोघांना गोकुळ हॉटेलच्या पाठीमागे पकडले. त्यातून दोघेही निसटले. मात्र, त्यांची दुचाकी कार्यकर्त्यांच्या हाती सापडली. संतप्त कार्यकर्त्यांनी ती दुचाकी पेटविली. काही काळानंतर पोलिसांनी या ठिकाणी येऊन परिस्थिती काबूत आणली व अग्निशमन दलाने आग विझविली.दरम्यान, एक वाजता काही आंदोलकांनी नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या घरासमोरील गाड्या फोडल्या. त्यामुळे संतप्त झालेले चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते स्टेशन रोडवर येऊन ‘रास्ता रोको’ करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी त्यांची समजूत काढत शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी तोडफोड केलेल्या गाड्यांची पाहणी केली व गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही चव्हाण यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्हीनस कॉर्नर चौकात एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली.पर्यटकांच्या गाड्यांवर तुफान दगडफेकपर्यटनासाठी आलेल्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, आदी ठिकाणांचे पर्यटक जेवण करण्यासाठी शाहूपुरीतील वामन गेस्ट हाऊस, अ‍ॅम्बॅसडर हॉटेल, आदी ठिकाणी आले होते. त्यांच्या पार्किंग केलेल्या चारचाकींवर आंदोलक कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. झालेल्या नुकसानीला कुणाला जबाबदार धरायचे, असा सवाल माध्यम प्रतिनिधींसमोर केला.शाहूपुरी पहिली गल्ली, दुसरी गल्ली या दोन गल्ल्यांमध्ये दिसेल त्या वाहनांवर कार्यकर्ते आक्रमक होत काठी, लोखंडी रॉड व मोठे दगड घेऊन अक्षरश: तुटून पडत होते. त्यातून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थितीत संपूर्ण स्टेशन रोडवर होती. उषा टॉकीज ते दाभोळकर कॉर्नर परिसरात आंदोलक दिसेल त्या वाहनांच्या व बंद असलेल्या दुकानांच्या काचा फोडत सुटले होते. प्रक्षुब्ध झालेला जमाव दगडफेक करीत वरपर्यंत गेला व पुन्हा खाली दसरा चौकाकडे आला. दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत या मार्गांवरील वाहतूक तुरळक होती.व्हीनस कॉर्नर चौकात सौम्य लाठीमारबुधवारी दुपारच्या सुमारास दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर चौकाकडे आला. त्यावेळी जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; पण जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावावर सौम्य लाठीमार करीत जमावाला पांगविले. त्यामुळे वातावरण काहीवेळ थंड झाले; पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव पुन्हा चौकात आला. त्यांनी थेट या चौकातील दोन मोठ्या दुकानांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी जमावाने उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली थांबविली व स्टेशन रोडवर ठिय्या मारला. पोलिसांना पाहताच तेथून शाहूपुरी पहिल्या गल्लीत जमाव गेला. तेथे असणाºया चारचाकी, रिक्षा व दुचाकी वाहनांची तोडफोड करीत हा जमाव पुढे मार्गस्थ झाला. त्यामुळे व्हीनस कॉर्नर चौकात तणावपूर्ण वातावरण होते.केएमटीचेही नुकसानभीमसैनिकांनी दिलेल्या ‘बंद’च्या हाकेमुळे दसरा चौकातील मैदानात के.एम.टी. बसेस पार्किंग करून ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करीत बसेस फोडल्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या बसेस बंदिस्त सुभाष स्टोअर्स अथवा बुद्ध गार्डनमध्ये पार्क केल्या असत्या तर त्यांचे नुकसान झाले नसते. याबाबतचा निर्णय अधिकाºयांनी का घेतला नाही, असा सवाल नागरिकांतून विचारला जात होता.