शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

जिल्ह्यात चार माणसांमागे एक वाहन

By admin | Updated: January 19, 2015 00:31 IST

वाहने झाली उदंड : वर्षाला ५० हजार वाहने रस्त्यावर; दोन वाहने असलेली कुटुंबे अधिक

अंजर अथणीकर - सांगली जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वर्षाला किमान ५० हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. आज जिल्ह्यामध्ये ६ लाख ६८ हजार ४२२ वाहने आहेत. याचे जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण काढले असता, तब्बल चार माणसामागे एक इतके प्रमाण वाढले आहे. कुटुंबामध्ये किमान दोन वाहने, अशी संख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात वाहनांच्या विक्रीचा वेग वाढला आहे. वाहन विक्रेत्यांची सुलभ कर्ज पध्दती व गरज म्हणूनही वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. विशेषत: कार आणि दुचाकींची संख्या वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे तीस लाख असून, वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ४२२ इतकी आहे. त्यामुळे याचे माणसी प्रमाण जवळपास साडेचार लोकांमागे एक वाहन असे झाले आहे. वर्षाला ५० ते ५५ हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत आहेत. प्रौढ लोकसंख्येचा विचार केला, तर तीन माणसांमागे एक वाहन असे प्रमाण होते.वाहनांची संख्या भरमसाट वाढल्याने विशेषत: शहरी भागात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक कुटुंबांना आता रात्रीच्या वेळी वाहन लावण्याची समस्या सतावत आहे. बहुतांशी अपार्टमेंटमध्ये पार्किंग व्यवस्था नसल्याने त्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढत असून हे अपघात बहुतांशी वेळा मानवी चुकांमुळेच घडत आहेत. वाहन चालविताना सदैव वाहतूक नियमांचे पालन करण्याची दक्षता प्रत्येकानेच घेणे, आज काळाची गरज आहे. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वाहनचालक व नागरिक यांच्यामध्ये जागृतीसाठी ११ ते २५ जानेवारी या कालावधित रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. दुचाकी, कारची संख्या वाढलीजिल्ह्यामध्ये दुचाकी आणि कारची संख्या वेगाने वाढत आहे. महिन्याला सुमारे चार हजार वाहने नव्याने रस्त्यावर येत असताना, यामध्ये दुचाकींची संख्या ही जवळपास तीन हजार आहे. त्यानंतर जीप, कार यांची संख्याही पाचशेहून अधिक आहे. मालवाहतुकीच्या छोट्या वाहनांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण वाहनांच्या संख्येमध्ये दुचाकी ९.४६ टक्के, कार १२.२२ टक्के, जीप १२ टक्के, तर ट्रकच्या संख्येत ३.८२ टक्के वाढ झाली आहे. वर्षात तीनशे जणांचा अपघाती बळीएकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ३०० जण अपघातांमुळे दगावले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे. अपंगत्व आलेल्यांची संख्याही हजारहून अधिक आहे. सुमारे दीड हजार अपघातांची वर्षभरात नोंद झाली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, मानवी चुका, त्याचबरोबर वाहन व रस्ते खराब आदी कारणे अपघात वाढण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापरही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.१९८० मध्ये होते दहा हजार लोकांमागे एक वाहन गेल्या दहा वर्षात वाहनांची संख्या वेगाने वाढली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये १९८० मध्ये दहा हजार लोकांमागे केवळ एक वाहन होते. इतकी अल्प वाहनांची संख्या होती. आता साडेचार लोकांमागे एक वाहन झाले आहे. २००० पासून वाहनांचा वेग वाढला आहे. जिल्ह्यातील सध्याची वाहनांची संख्यादुचाकी : ५,0९,३५०कार : ५१,९८९जीप : १९,५६८ट्रक : ९०,0२१टँकर : ६८७डिलिव्हरी व्हॅन : २०,८८०ट्रॅक्टर : २५,३७२ट्रेलर : १८,0९८जेसीबी, क्रेन : १,0१०रिक्षा : ८,७०४४एकूण : ६,६८,४२२