शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:10 IST

अडत धोरणाचा निषेध : खरेदीदार उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात

कोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांचे आंदोलन चांगलेच चिघळले असून, कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही, यावर ते ठाम राहिले आहेत. सरकारच्या अडत धोरणाविरोधात उद्या, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसण्याचा निर्णय खरेदीदार संघटनेने घेतला आहे. गेले चार दिवस सहा टक्के अडतीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भाजीविक्रेत्यांची भूमिका ही शेतकरीविरोधी नसून दलालांच्या विरोधात आहे. आंदोलन शांततेत व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था न बिघडविता सुरू आहे. उलट भाजी मंडईत शेतकऱ्यांना बसण्यास खरेदीदार सहकार्यच करीत आहेत; पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बाजार समिती वारंवार काहीही कारण नसताना भाजी विक्रेत्यांच्या आंदोलनाला चिथावणी देऊन हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हीही विक्रेते या कोल्हापुरातीलच आहोत. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवतो, असा इशारा संघटनेने पत्रकातून दिला आहे. ‘स्वाभिमानी’ला जशास तसे उत्तर देऊआमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे व्यापाऱ्यांना दमदाटी करीत आहेत; पण त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. वळंजूंना खरेदीदारांबद्दल पोटशूळनंदकुमार वळंजू यांना गोरगरीब खरेदीदारांबद्दल पोटशूळ असल्याने ते आमच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. खरेदीदारांनी घेतली मुश्रीफ यांची भेट खरेदीदारांनी शनिवारी दुपारी आमदार हसन मुश्रीफ यांची जिल्हा बॅँकेत भेट घेतली. मुश्रीफ यांनी सभापती पाटील यांना बोलावून घेऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी खरेदीदार अडत न देण्यावर ठाम राहिल्याने काहीच मार्ग निघाला नाही. बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटकाकोल्हापूर : भाजीपाला मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदी बंदमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटका बसत आहे. नियमित उलाढालीपेक्षा २५ ते ३० लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर झाला आहे.बाजार समितीत स्थानिक भाजीपाल्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक असते. भाजी मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदीदार माल उचलतात. एकूण माल आवकेच्या तुलनेत ३० ते ४० टक्के माल स्थानिक व्यापारी खरेदी करतात. उर्वरित माल कोकण, गोव्याला पाठविला जातो; पण अडतीवरून व्यापारी व अडते यांच्यात वाद सुरू झाला आहे. बुधवारपासून शहर व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे मार्केटमधील आवक कमी झाली आहेच; पण उठावही घटला आहे. नियमित आवकेपेक्षा किमान ४० टक्के मालाची आवक कमी झाली आहे. भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवर समितीला १ टक्का कर मिळतो. साधारणत: रोज २५ लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या २५ हजार उत्पन्नात घट झाली आहे. त्याशिवाय समितीत येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारला जातो. त्याच्यापोटी किमान पाच हजार रुपये असे रोज ३० हजारांचे नुकसान सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजीपाल्याचा टेम्पो फोडलाबाजार समितीतून भाजीपाला भरून तो कोकणात घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री सोन्यामारुती चौकात अज्ञात व्यक्तींनी फोडला. याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आमचा या फोडाफोडीशी संबंध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. पोलिस बंदोबस्तात लक्ष्मीपुरी बाजार सुरू राहणार भाजीपाला अडतीवरून गेले चार दिवस निर्माण झालेल्या पेचाबाबत बाजार समिती संचालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. आज, रविवारी लक्ष्मीपुरी बाजार बंद पाडण्याची खरेदीदारांनी धमकी दिल्याचे सांगत पोलिस बंदोबस्तात बाजार सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी डॉ. सैनी यांच्याकडे केली. शनिवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन अडतीबाबतची वस्तुस्थिती सांगितली. कोणत्याही परिस्थितीत लक्ष्मीपुरी बाजार बंद राहणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासन घेईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची भेट घेतली. तांबडे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना रविवारी आठवडी बाजारात पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या.