शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

‘भाजीपाला अडत’ आंदोलन चिघळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:10 IST

अडत धोरणाचा निषेध : खरेदीदार उद्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात

कोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांचे आंदोलन चांगलेच चिघळले असून, कोणत्याही परिस्थितीत अडत देणार नाही, यावर ते ठाम राहिले आहेत. सरकारच्या अडत धोरणाविरोधात उद्या, सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषणाला बसण्याचा निर्णय खरेदीदार संघटनेने घेतला आहे. गेले चार दिवस सहा टक्के अडतीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. भाजीविक्रेत्यांची भूमिका ही शेतकरीविरोधी नसून दलालांच्या विरोधात आहे. आंदोलन शांततेत व कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था न बिघडविता सुरू आहे. उलट भाजी मंडईत शेतकऱ्यांना बसण्यास खरेदीदार सहकार्यच करीत आहेत; पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, बाजार समिती वारंवार काहीही कारण नसताना भाजी विक्रेत्यांच्या आंदोलनाला चिथावणी देऊन हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हीही विक्रेते या कोल्हापुरातीलच आहोत. आम्ही बोलण्यापेक्षा करून दाखवतो, असा इशारा संघटनेने पत्रकातून दिला आहे. ‘स्वाभिमानी’ला जशास तसे उत्तर देऊआमचे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे हे व्यापाऱ्यांना दमदाटी करीत आहेत; पण त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राजू जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. वळंजूंना खरेदीदारांबद्दल पोटशूळनंदकुमार वळंजू यांना गोरगरीब खरेदीदारांबद्दल पोटशूळ असल्याने ते आमच्या विरोधात बोलत असल्याचा आरोपही जाधव यांनी केला. खरेदीदारांनी घेतली मुश्रीफ यांची भेट खरेदीदारांनी शनिवारी दुपारी आमदार हसन मुश्रीफ यांची जिल्हा बॅँकेत भेट घेतली. मुश्रीफ यांनी सभापती पाटील यांना बोलावून घेऊन परिस्थिती जाणून घेतली. यावेळी खरेदीदार अडत न देण्यावर ठाम राहिल्याने काहीच मार्ग निघाला नाही. बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटकाकोल्हापूर : भाजीपाला मार्केटमधील किरकोळ व्यापाऱ्यांच्या खरेदी बंदमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला रोज ३० हजारांचा फटका बसत आहे. नियमित उलाढालीपेक्षा २५ ते ३० लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर झाला आहे.बाजार समितीत स्थानिक भाजीपाल्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. साधारणत: रोज दोन हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक असते. भाजी मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील भाजीपाला खरेदीदार माल उचलतात. एकूण माल आवकेच्या तुलनेत ३० ते ४० टक्के माल स्थानिक व्यापारी खरेदी करतात. उर्वरित माल कोकण, गोव्याला पाठविला जातो; पण अडतीवरून व्यापारी व अडते यांच्यात वाद सुरू झाला आहे. बुधवारपासून शहर व ग्रामीण भागातील किरकोळ व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे मार्केटमधील आवक कमी झाली आहेच; पण उठावही घटला आहे. नियमित आवकेपेक्षा किमान ४० टक्के मालाची आवक कमी झाली आहे. भाजीपाला मार्केटमधील उलाढालीवर समितीला १ टक्का कर मिळतो. साधारणत: रोज २५ लाखांनी उलाढाल कमी झाल्याने त्यापोटी मिळणाऱ्या २५ हजार उत्पन्नात घट झाली आहे. त्याशिवाय समितीत येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारला जातो. त्याच्यापोटी किमान पाच हजार रुपये असे रोज ३० हजारांचे नुकसान सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजीपाल्याचा टेम्पो फोडलाबाजार समितीतून भाजीपाला भरून तो कोकणात घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री सोन्यामारुती चौकात अज्ञात व्यक्तींनी फोडला. याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, आमचा या फोडाफोडीशी संबंध नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. पोलिस बंदोबस्तात लक्ष्मीपुरी बाजार सुरू राहणार भाजीपाला अडतीवरून गेले चार दिवस निर्माण झालेल्या पेचाबाबत बाजार समिती संचालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन चर्चा केली. आज, रविवारी लक्ष्मीपुरी बाजार बंद पाडण्याची खरेदीदारांनी धमकी दिल्याचे सांगत पोलिस बंदोबस्तात बाजार सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी डॉ. सैनी यांच्याकडे केली. शनिवारी दुपारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन अडतीबाबतची वस्तुस्थिती सांगितली. कोणत्याही परिस्थितीत लक्ष्मीपुरी बाजार बंद राहणार नाही, याची दक्षता पोलिस प्रशासन घेईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची भेट घेतली. तांबडे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना रविवारी आठवडी बाजारात पोलिस बंदोबस्त लावण्याच्या सूचना दिल्या.