शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

आजपासून भाजीमंडई बंद होणार : घरपोच सेवा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांची बाजारपेठेत होत असलेली गर्दी पाहता महानगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने, शहरातील सर्व ...

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांची बाजारपेठेत होत असलेली गर्दी पाहता महानगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने, शहरातील सर्व भाजीमंडई गुरुवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याऐवजी जीवनावश्यक सर्व वस्तू नागरिकांना घरपोच देण्याची व्यवस्था दुकानदार, भाजी विक्रेत्यांना करावी लागणार आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली घराबाहेर पडतात. महापालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणारी दुकानेही सील केली. अशा अनावश्यक गर्दीमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू नये, त्याचबरोबर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजीपाला, फळे, किराणा माल, दूध इत्यादी जीवनावश्यक साहित्य नागरिकांपर्यंत घरपोच कसे देता येईल यावर नोडल अधिकाऱ्यांची स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

नागरिकांना जीवनावश्यक साहित्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. नोडल अधिकाऱ्यांनी सर्व मार्केटमधील भाजी विक्रेत्यांशी चर्चा करून घरपोच भाजी विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व भाजी विक्रेत्यांनी गाडीद्वारे भाजी विक्री करण्यास सहमती दर्शविली आहे. महापालिका ॲपद्वारे प्रभागातील भाजी, फळे, किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स यांचे नंबर्स जाहीर करणार आहे. नागरिकांना याचा वापर करून घरी राहून घराजवळील दुकानातून साहित्य मागविता येईल.

नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी न करता घरी राहून या सेवेचा लाभ घ्यावा. स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक दुकाने सोडून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, उपशहर अभियंता नारायण भोसले, हर्षजित घाटगे, एन.एस. पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.