शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आजपासून भाजीमंडई बंद होणार : घरपोच सेवा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांची बाजारपेठेत होत असलेली गर्दी पाहता महानगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने, शहरातील सर्व ...

कोल्हापूर : जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली नागरिकांची बाजारपेठेत होत असलेली गर्दी पाहता महानगरपालिका प्रशासनाने बाजारपेठेतील दुकाने, शहरातील सर्व भाजीमंडई गुरुवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याऐवजी जीवनावश्यक सर्व वस्तू नागरिकांना घरपोच देण्याची व्यवस्था दुकानदार, भाजी विक्रेत्यांना करावी लागणार आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्याच्या नावाखाली घराबाहेर पडतात. महापालिकेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणारी दुकानेही सील केली. अशा अनावश्यक गर्दीमुळे शहरात रुग्णांची संख्या वाढू नये, त्याचबरोबर कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून भाजीपाला, फळे, किराणा माल, दूध इत्यादी जीवनावश्यक साहित्य नागरिकांपर्यंत घरपोच कसे देता येईल यावर नोडल अधिकाऱ्यांची स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

नागरिकांना जीवनावश्यक साहित्य त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. नोडल अधिकाऱ्यांनी सर्व मार्केटमधील भाजी विक्रेत्यांशी चर्चा करून घरपोच भाजी विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व भाजी विक्रेत्यांनी गाडीद्वारे भाजी विक्री करण्यास सहमती दर्शविली आहे. महापालिका ॲपद्वारे प्रभागातील भाजी, फळे, किराणा स्टोअर्स, मेडिकल स्टोअर्स यांचे नंबर्स जाहीर करणार आहे. नागरिकांना याचा वापर करून घरी राहून घराजवळील दुकानातून साहित्य मागविता येईल.

नागरिकांनी रस्त्यावर अनावश्यक गर्दी न करता घरी राहून या सेवेचा लाभ घ्यावा. स्वत:ला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे अवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अत्यावश्यक दुकाने सोडून नियमांचे उल्लंघन करणारी दुकाने सील करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा. आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, उपशहर अभियंता नारायण भोसले, हर्षजित घाटगे, एन.एस. पाटील, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते.