शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

By admin | Updated: March 2, 2017 00:22 IST

अडत विरोधात खरेदीदार आक्रमक : ज्याला अडत देणे शक्य त्यांनीच खरेदी करावी यावर प्रशासन ठाम

कोल्हापूर : अडत देण्यास विरोध कायम ठेवत शहरातील अकरा भाजी मंडई ‘बेमुदत बंद’ ठेवण्याचा निर्णय खरेदीदारांनी आज, बुधवारी घेतला. यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याला अडत देण्यास परवडते त्यांनीच खरेदी करावी, अशी भूमिका घेत आज, गुरुवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लायसन्स’ (खरेदी परवाना) असणाऱ्यांनाच यापुढे भाजीपाला खरेदीस परवानगी राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजीपाल्यावर ६ टक्के अडत घेण्यास खरेदीदारांचा विरोध असून, त्यांनी बुधवारी सौदे बंद पाडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडते, खरेदीदार व समिती प्रतिनिधींची बैठक झाली. किरकोळ भाजीपाला विक्रेते संघटनेचे राजू जाधव यांनी अडत देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. येथे येणारा ९० टक्के माल हा परजिल्ह्यांतून येतो, शेतकऱ्यांचा अडतीला विरोध नसताना वसुली का करता? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला येतो, त्यांच्या स्पर्धेत अडत देऊन टिकू शकत नसल्याचे राजेंद्र लायकर यांनी सांगितले. कायद्यानेच आम्ही अडत घेत असून, जर खरेदीदारांना द्यायची नसेल तर ती कोणाकडून घ्यायची, अशी विचारणा अडते जमीर बागवान यांनी केली. भगवान काटे म्हणाले, तुमची झुंडशाही खपवून घेणार नाही, समितीत शेतकऱ्यांना कोणी पुन्हा अडविण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देऊ. यावर हरकत घेत विलास मेढे म्हणाले, येथे सर्व माल शेतकऱ्यांचा येत नाही. अडत्यांनी बाहेरून मागविलेल्या मालाला अडत का घेता? फळ मार्केटमध्ये कोणाकडून अडत घेता? सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी समितीत जागा उपलब्ध करून दिली आहे; पण आमच्या उघड व पारदर्शक सौदा प्रक्रियेमुळे शेतकरी आमच्याकडेच येतात. तुम्हाला जसे परवडते, तसा माल मागून घ्या, असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. सौदे सुरू करण्याचे आवाहन सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. खरेदीदारांची पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये अडतीवर ते ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली. आज, गुरुवारपासून शहरातील अकरा भाजी मंडई बंद ठेवून सहाव्या दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिला. तुम्ही खरेदी करू नका; पण सौद्यात कोणी त्रास दिला तर खपवून घेणार नसल्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला. यावेळी शहर उपनिबंधक संभाजी निकम, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विलास साठे, कृष्णात पाटील, उदय पाटील, बाबा लाड, मोहन सालपे यांनी चर्चेत भाग घेतला.भाजीपाला खरेदीदारांनी पाडले सौदे बंद आजपासून सौदे सुरू करण्याचा समितीचा निर्णय गाड्यांची हवा सोडली; ४० लाखांचा माल पडूनकोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांनी अडतीला विरोध करीत बुधवारी सौदे बंद पाडले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडून जोरदार गोंधळ केल्याने समितीतील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खरेदीदारांनी नमती भूमिका घेतली; पण दिवसभर समितीत सुमारे ४० लाखांचा भाजीपाला पडून राहिला. भाजीपाल्यावर खरेदीदारांकडून आकारल्या जात असलेल्या सहा टक्के अडतीवरून हा गोंधळ सुरू आहे. बुधवारी पहाटे अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केले. समितीमध्ये पहाटेपासून भाजीपाल्याची आवक-जावक सुरू असते. कोकणात पहाटेच माल पाठविला जातो. तो रोखून सकाळी सौदे काढू दिले नाहीत. बाहेरून भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही या खरेदीदारांनी रोखले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे उपसचिव मोहन सालपे, भगवान काटे यांनी खरेदीदारांना समजावून समितीच्या आवाराबाहेर घालविले. तरीही काही खरेदीदारांनी गोंधळ करण्यास सुरू केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान, समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दोन हजार क्विंटल आवक झाली होती. त्याचा सौदा निघाला नाहीच; पण मालही समितीत दिवसभर पडून होता. अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केल्याने सुमारे ४० लाखांचा माल पडून राहिला.भाजीपाल्याची नुकसानभरपाई खरेदीदारांनी अचानक सौदे बंद पाडल्याने भाजीपाला पडून राहिला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी जमीर बागवान व नंदकुमार वळंजू यांनी केली.परवडत असेल तर घ्या...ज्यांना अडत देणे परवडते त्यांनीच माल खरेदी करावा. तुमच्याशिवाय माल खपणार नाही, असे कोणी समजू नये, अशा शब्दांत नंदकुमार वळंजू यांनी खरेदीदारांना सुनावले. जाधव-लायकर खडाजंगीभाजी मंडई बंद ठेवण्यावर एकमत झाले; पण मंडईत शेतकरी विक्री करण्यास आले तर त्यांना परवानगी देण्यावरून संघटनेचे राजू जाधव व राजेंद्र लायकर यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तर मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी गुरगुरले तर त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा भगवान काटे यांनी दिला.