शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

By admin | Updated: March 2, 2017 00:22 IST

अडत विरोधात खरेदीदार आक्रमक : ज्याला अडत देणे शक्य त्यांनीच खरेदी करावी यावर प्रशासन ठाम

कोल्हापूर : अडत देण्यास विरोध कायम ठेवत शहरातील अकरा भाजी मंडई ‘बेमुदत बंद’ ठेवण्याचा निर्णय खरेदीदारांनी आज, बुधवारी घेतला. यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याला अडत देण्यास परवडते त्यांनीच खरेदी करावी, अशी भूमिका घेत आज, गुरुवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लायसन्स’ (खरेदी परवाना) असणाऱ्यांनाच यापुढे भाजीपाला खरेदीस परवानगी राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजीपाल्यावर ६ टक्के अडत घेण्यास खरेदीदारांचा विरोध असून, त्यांनी बुधवारी सौदे बंद पाडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडते, खरेदीदार व समिती प्रतिनिधींची बैठक झाली. किरकोळ भाजीपाला विक्रेते संघटनेचे राजू जाधव यांनी अडत देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. येथे येणारा ९० टक्के माल हा परजिल्ह्यांतून येतो, शेतकऱ्यांचा अडतीला विरोध नसताना वसुली का करता? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला येतो, त्यांच्या स्पर्धेत अडत देऊन टिकू शकत नसल्याचे राजेंद्र लायकर यांनी सांगितले. कायद्यानेच आम्ही अडत घेत असून, जर खरेदीदारांना द्यायची नसेल तर ती कोणाकडून घ्यायची, अशी विचारणा अडते जमीर बागवान यांनी केली. भगवान काटे म्हणाले, तुमची झुंडशाही खपवून घेणार नाही, समितीत शेतकऱ्यांना कोणी पुन्हा अडविण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देऊ. यावर हरकत घेत विलास मेढे म्हणाले, येथे सर्व माल शेतकऱ्यांचा येत नाही. अडत्यांनी बाहेरून मागविलेल्या मालाला अडत का घेता? फळ मार्केटमध्ये कोणाकडून अडत घेता? सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी समितीत जागा उपलब्ध करून दिली आहे; पण आमच्या उघड व पारदर्शक सौदा प्रक्रियेमुळे शेतकरी आमच्याकडेच येतात. तुम्हाला जसे परवडते, तसा माल मागून घ्या, असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. सौदे सुरू करण्याचे आवाहन सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. खरेदीदारांची पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये अडतीवर ते ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली. आज, गुरुवारपासून शहरातील अकरा भाजी मंडई बंद ठेवून सहाव्या दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिला. तुम्ही खरेदी करू नका; पण सौद्यात कोणी त्रास दिला तर खपवून घेणार नसल्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला. यावेळी शहर उपनिबंधक संभाजी निकम, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विलास साठे, कृष्णात पाटील, उदय पाटील, बाबा लाड, मोहन सालपे यांनी चर्चेत भाग घेतला.भाजीपाला खरेदीदारांनी पाडले सौदे बंद आजपासून सौदे सुरू करण्याचा समितीचा निर्णय गाड्यांची हवा सोडली; ४० लाखांचा माल पडूनकोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांनी अडतीला विरोध करीत बुधवारी सौदे बंद पाडले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडून जोरदार गोंधळ केल्याने समितीतील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खरेदीदारांनी नमती भूमिका घेतली; पण दिवसभर समितीत सुमारे ४० लाखांचा भाजीपाला पडून राहिला. भाजीपाल्यावर खरेदीदारांकडून आकारल्या जात असलेल्या सहा टक्के अडतीवरून हा गोंधळ सुरू आहे. बुधवारी पहाटे अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केले. समितीमध्ये पहाटेपासून भाजीपाल्याची आवक-जावक सुरू असते. कोकणात पहाटेच माल पाठविला जातो. तो रोखून सकाळी सौदे काढू दिले नाहीत. बाहेरून भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही या खरेदीदारांनी रोखले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे उपसचिव मोहन सालपे, भगवान काटे यांनी खरेदीदारांना समजावून समितीच्या आवाराबाहेर घालविले. तरीही काही खरेदीदारांनी गोंधळ करण्यास सुरू केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान, समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दोन हजार क्विंटल आवक झाली होती. त्याचा सौदा निघाला नाहीच; पण मालही समितीत दिवसभर पडून होता. अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केल्याने सुमारे ४० लाखांचा माल पडून राहिला.भाजीपाल्याची नुकसानभरपाई खरेदीदारांनी अचानक सौदे बंद पाडल्याने भाजीपाला पडून राहिला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी जमीर बागवान व नंदकुमार वळंजू यांनी केली.परवडत असेल तर घ्या...ज्यांना अडत देणे परवडते त्यांनीच माल खरेदी करावा. तुमच्याशिवाय माल खपणार नाही, असे कोणी समजू नये, अशा शब्दांत नंदकुमार वळंजू यांनी खरेदीदारांना सुनावले. जाधव-लायकर खडाजंगीभाजी मंडई बंद ठेवण्यावर एकमत झाले; पण मंडईत शेतकरी विक्री करण्यास आले तर त्यांना परवानगी देण्यावरून संघटनेचे राजू जाधव व राजेंद्र लायकर यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तर मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी गुरगुरले तर त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा भगवान काटे यांनी दिला.