शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शहरातील भाजी मंडई बेमुदत बंद

By admin | Updated: March 2, 2017 00:22 IST

अडत विरोधात खरेदीदार आक्रमक : ज्याला अडत देणे शक्य त्यांनीच खरेदी करावी यावर प्रशासन ठाम

कोल्हापूर : अडत देण्यास विरोध कायम ठेवत शहरातील अकरा भाजी मंडई ‘बेमुदत बंद’ ठेवण्याचा निर्णय खरेदीदारांनी आज, बुधवारी घेतला. यामुळे बाजार समिती प्रशासनाने ज्याला अडत देण्यास परवडते त्यांनीच खरेदी करावी, अशी भूमिका घेत आज, गुरुवारपासून सौदे सुरू करण्याचा निर्णय घेतला. ‘लायसन्स’ (खरेदी परवाना) असणाऱ्यांनाच यापुढे भाजीपाला खरेदीस परवानगी राहील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. भाजीपाल्यावर ६ टक्के अडत घेण्यास खरेदीदारांचा विरोध असून, त्यांनी बुधवारी सौदे बंद पाडून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अडते, खरेदीदार व समिती प्रतिनिधींची बैठक झाली. किरकोळ भाजीपाला विक्रेते संघटनेचे राजू जाधव यांनी अडत देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. येथे येणारा ९० टक्के माल हा परजिल्ह्यांतून येतो, शेतकऱ्यांचा अडतीला विरोध नसताना वसुली का करता? कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात बाजारात भाजीपाला येतो, त्यांच्या स्पर्धेत अडत देऊन टिकू शकत नसल्याचे राजेंद्र लायकर यांनी सांगितले. कायद्यानेच आम्ही अडत घेत असून, जर खरेदीदारांना द्यायची नसेल तर ती कोणाकडून घ्यायची, अशी विचारणा अडते जमीर बागवान यांनी केली. भगवान काटे म्हणाले, तुमची झुंडशाही खपवून घेणार नाही, समितीत शेतकऱ्यांना कोणी पुन्हा अडविण्याचा प्रयत्न केला तर जशाच तसे उत्तर देऊ. यावर हरकत घेत विलास मेढे म्हणाले, येथे सर्व माल शेतकऱ्यांचा येत नाही. अडत्यांनी बाहेरून मागविलेल्या मालाला अडत का घेता? फळ मार्केटमध्ये कोणाकडून अडत घेता? सहा महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करण्यासाठी समितीत जागा उपलब्ध करून दिली आहे; पण आमच्या उघड व पारदर्शक सौदा प्रक्रियेमुळे शेतकरी आमच्याकडेच येतात. तुम्हाला जसे परवडते, तसा माल मागून घ्या, असे नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. सौदे सुरू करण्याचे आवाहन सभापती सर्जेराव पाटील यांनी केले. खरेदीदारांची पुन्हा बैठक झाली. त्यामध्ये अडतीवर ते ठाम राहिल्याने चर्चा फिस्कटली. आज, गुरुवारपासून शहरातील अकरा भाजी मंडई बंद ठेवून सहाव्या दिवसांपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिला. तुम्ही खरेदी करू नका; पण सौद्यात कोणी त्रास दिला तर खपवून घेणार नसल्याचा इशारा सभापती पाटील यांनी दिला. यावेळी शहर उपनिबंधक संभाजी निकम, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विलास साठे, कृष्णात पाटील, उदय पाटील, बाबा लाड, मोहन सालपे यांनी चर्चेत भाग घेतला.भाजीपाला खरेदीदारांनी पाडले सौदे बंद आजपासून सौदे सुरू करण्याचा समितीचा निर्णय गाड्यांची हवा सोडली; ४० लाखांचा माल पडूनकोल्हापूर : बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदारांनी अडतीला विरोध करीत बुधवारी सौदे बंद पाडले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडून जोरदार गोंधळ केल्याने समितीतील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर खरेदीदारांनी नमती भूमिका घेतली; पण दिवसभर समितीत सुमारे ४० लाखांचा भाजीपाला पडून राहिला. भाजीपाल्यावर खरेदीदारांकडून आकारल्या जात असलेल्या सहा टक्के अडतीवरून हा गोंधळ सुरू आहे. बुधवारी पहाटे अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केले. समितीमध्ये पहाटेपासून भाजीपाल्याची आवक-जावक सुरू असते. कोकणात पहाटेच माल पाठविला जातो. तो रोखून सकाळी सौदे काढू दिले नाहीत. बाहेरून भाजी खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांनाही या खरेदीदारांनी रोखले. भाजीपाला घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांतील हवा सोडल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे उपसचिव मोहन सालपे, भगवान काटे यांनी खरेदीदारांना समजावून समितीच्या आवाराबाहेर घालविले. तरीही काही खरेदीदारांनी गोंधळ करण्यास सुरू केल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण शांत झाले. दरम्यान, समितीत नेहमीप्रमाणे भाजीपाल्याची दोन हजार क्विंटल आवक झाली होती. त्याचा सौदा निघाला नाहीच; पण मालही समितीत दिवसभर पडून होता. अचानक खरेदीदारांनी सौदे बंद केल्याने सुमारे ४० लाखांचा माल पडून राहिला.भाजीपाल्याची नुकसानभरपाई खरेदीदारांनी अचानक सौदे बंद पाडल्याने भाजीपाला पडून राहिला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई बाजार समितीने द्यावी, अशी मागणी जमीर बागवान व नंदकुमार वळंजू यांनी केली.परवडत असेल तर घ्या...ज्यांना अडत देणे परवडते त्यांनीच माल खरेदी करावा. तुमच्याशिवाय माल खपणार नाही, असे कोणी समजू नये, अशा शब्दांत नंदकुमार वळंजू यांनी खरेदीदारांना सुनावले. जाधव-लायकर खडाजंगीभाजी मंडई बंद ठेवण्यावर एकमत झाले; पण मंडईत शेतकरी विक्री करण्यास आले तर त्यांना परवानगी देण्यावरून संघटनेचे राजू जाधव व राजेंद्र लायकर यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. तर मंडईत येणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणी गुरगुरले तर त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा भगवान काटे यांनी दिला.