शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीचा फणस बाजारात; भाज्या कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:54 IST

कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.

ठळक मुद्देभाजीचा फणस बाजारात; भाज्या कडाडल्याहुताशनी पौेर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बाजारात भाजीचा फणस दाखल झाल्याने तो घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे; तर या आठवड्यात बहुतांश भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा दरांवर परिणाम झाला आहे. वांगी, गवार, कारली, दोडका, आदी भाज्यांचे दर कडाडले आहेत. दुसरीकडे, हुताशनी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हरभराडाळ, पोळीच्या आट्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. हरभराडाळ ६८ रुपये, तर पोळीचा आटा ३२ रुपये प्रतिकिलो असा दर होता.गेल्या आठवड्यात बाजारात भाज्यांची आवक जास्त होती; त्यामुळे भाज्यांचे दर कमी होते; पण या आठवड्यात वांगी, ढबू मिरची, ओला वाटाणा, कारली, दोडका, मेथीच्या दरात वाढ झाली. घाऊक बाजारात वांगी ३० रुपये, ढबू मिरची ३५ रुपये तर किरकोळ बाजारात गवार १२० रुपये, ओला वाटाणा ३० रुपये, कारली ४० रुपये, दोडका ४२ रुपये किलो होता. मात्र कोबी, ओली मिरची, घेवडा, भेंडी, वरणा, फ्लॉवरचे दर स्थिर होते.

पोकळ्याचा दर कमी झाला होता. तो पाच रुपये झाला होता. यंदा भाजीचा फणस हा २० रुपयांपासून ६० रुपयांच्या घरात होता; तर मोठा कापा फणस सुमारे १२० रुपये असा दर होता. याचबरोबर कांदा, लसूण व बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे.

घाऊक बाजारात १० किलो कांद्याचा दर ५० रुपये, बटाटा १२० रुपये; तर लसूण २५० रुपये होते. फळबाजारामध्ये द्राक्षे, अननसांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात द्राक्षे ३५ रुपयांनी होती. अननस ४० रुपये होते. तसेच आंबा हापूस पेटी दीड हजार रुपये, बॉक्स ४०० रुपये होता.तसेच तांदूळ, गव्हाचे दर स्थिर आहेत; पण तूरडाळीच्या दरात चार रुपयांनी प्रतिकिलो वाढ होऊन ती ८८ रुपये झाली. सूर्यफुलाचे तेल ९५ वरून १०५ रुपये असे झाले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्चच्या महिन्यात चटणीच्या मसाल्याला ग्राहकांकडून मागणी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोथिंबिरीची पेंढी कमी दरानेघाऊक बाजारात कोथिंबिरीच्या पेंढीचा दर २५० रुपये शेकडा आहे; त्यामुळे किरकोळ बाजारात कोथिंबिरीची पेंढी साधारणत: तीन ते पाच रुपये होती. ती घेण्यासाठी बाजारात गर्दी होती.

कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारभोगाव, करंजफेण परिसरातून भाजीचा फणस येतो. यंदा फणसाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे.-अनुसया मरगळ, फणस विके्रत्या, कोल्हापूर. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर