शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

भाजीपाला, फळ मार्केट तेजीत

By admin | Updated: July 28, 2014 00:04 IST

शाबू कडाडला : श्रावणामुळे उलाढाल वाढली

कोल्हापूर : श्रावण महिना सुरू झाल्याने शाबू, नारळासह भाजीपाला व फळांच्या दरात वाढ झाली आहे. शाबूच्या दरात किलोमागे तब्बल आठ रुपयांची, तर नारळाच्या दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. गेला महिनाभर शांतता असलेल्या कडधान्य मार्केटमध्ये थोडी रेलचेल सुरू झाली आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने उपवासामुळे मार्केटमधील उलाढाल वाढली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये मागणी वाढल्याने या आठवड्यात थोडी तेजी दिसू लागली आहे. येत्या महिन्याभरात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. वांगी, टोमॅटो, गवार, कारली, भेंडीच्या दरात वाढ झालेली आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपूच्या दरात वाढ झाली आहे. पेंढीमागे सरासरी तीन ते पाच रुपयांची वाढ झाली आहे. श्रावण महिन्यास आजपासून सुरुवात झाल्याने त्याचा परिणाम फळ मार्केटवर दिसू लागला आहे. पावसाळ्यामुळे शांत असलेल्या फळ मार्केटने आज बऱ्यापैकी गती घेतली. मोसंबीच्या दरात चुमड्यामागे दोनशे रुपयांची वाढ झालेली आहे. उद्या श्रावणातील पहिला सोमवार असल्याने फळांच्या मागणीत आज वाढ झाली. रविवारी लक्ष्मीपुरी आठवडी बाजारात भाज्यांसह फळांची मागणी जोरात होती. परिणामी संत्री, चिक्कू, पेरू, सफरचंद, डाळींब, सीताफळ, अननसच्या दरातही वाढ झाली आहे. केळीची आवक वाढल्याने दरात वाढ दिसत नाही. किरकोळ बाजारात साठ रुपये किलोच्या डाळींबाचा दर ८० रुपयांवर गेला आहे. शाबूचा दर ७२ वरून ८० रुपयांवर गेला आहे. उपवासाला शाबू लागत असल्याने दरातही वाढ झालेली आहे. शाबू, नारळ, तूरडाळ याप्रमाणे सरकी तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)