शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

देवी रेणुकेच्या सांत्वनाला कोल्हापूरकरांची भाजी भाकरी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 6, 2024 15:18 IST

आंबिल यात्रा उत्साहात : भाविकांची अलोट गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : माता श्री रेणुका देवीला पौर्णिमेला वैधव्य आले.. आपल्या सांत्वनाने तिचे दु:ख थोडे हलके व्हावे, तिने या आघातातून सावरून भाविकांवर कृपा दृष्टी ठेवावी, पुन्हा जगदोद्धाराचे कार्य करावे..ही विनंती व देवीची साथ द्यायला आलेल्या कोल्हापुरकरांच्या अलोट गर्दीत शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा पार पडली.

मार्गशीर्ष पौर्णिमेला जमदग्नी ऋषींचा मृत्यू झाला, त्यादिवशी सौंदत्ती येथे झालेल्या यात्रेनंतर कोल्हापुरात ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा होते. एखाद्या कुटुंबात सांत्वनासाठी जाताना भाजी भाकरी, आंबील नेण्याची पद्धत आहे. इथे देवी रेणुकेच्या वाट्याला आलेल्या दु:खातून तिला सावरण्यासाठी कोल्हापुरात ही यात्रा होते. यानिमित्त पहाटे देवीचा अभिषेक व आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासूनच देवीचे दर्शन सुरु झाले. सकाळी ६ वाजल्यापासून नैवेद्य देण्यास सुरुवात झाली. वरणंवांग, मेथीची भाजी, बेसनाच्या वड्या, दही भात, आंबील, भाकरी, कांद्याची पात, लिंबू, गाजर हा या दिवसाचा खास नैवेद्य. नैवेद्यांने भरलेल्या बुट्ट्या घेऊन मंदिराच्या दिशेने येत होते.

सकाळी अकरा वाजल्यापासून तर महिला व पुरुष भाविकांच्या रांगा ओसंडून वाहत होत्या. रस्त्यावर दुतर्फा खेळणी, इमिटेशन ज्वेलरी, घरगुती साहित्यांचे स्टाॅल मांडले होते. समोरील मोकळ्या मैदानात लावलेल्या पाळण्यांसह अन्य खेळांचा आनंद बच्चे कंपनी घेत होती.

सहकुटूंब भोजनाचा आस्वाद

देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर तिच्या सानिध्यात चार घास खाण्याची पद्धत कोल्हापूरकर अजूनही सांभाळतात. त्यामुळेच नैवेद्याबरोबर भाविकांनी सहकुटूंब जेवणाचा लाभ घेतला. मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कुटूंबांची पंगत सुरू होती.

नैवेद्य, नारळाचे योग्य नियोजनभाविकांनी आणलेल्या नैवेद्याची नासाडी होऊ नये यासाठी यात्रा समितीने चोख नियोजन केले होते. भाविक रांगेत असतानाच नैवेद्य स्विकारले जात होते. तर मागील बाजूस नैवेद्य दुसऱ्या भाविकाला दिला जातो. त्यामुळे अन्नाची नासाडी झाली नाही. नारळ फोडण्यासाठी स्वतंत्र मांडव उभारला होता. कापूर व अगरबत्ती लावण्याची सोय ही तेथेच करण्यात आली.