शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे हवीत : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:34 IST

कुरुंदवाड : बदलत्या काळात सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे संपुष्टात येत आहेत. या व्यासपीठांची जागा आता जातीवर आधारित चळवळी घेत आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होत असून, भविष्यातील जाती-जातींमधील दंगलीच्या धोक्याची ही घंटाच आहे. समाजातील अशा गढूळ वातावरणातही सुरेश शिपूरकर यांचे कार्य व समाजाला दिशा देणारी त्यांची चळवळ दीपस्तंभासारखी आहे, असे ...

कुरुंदवाड : बदलत्या काळात सामाजिक प्रश्न मांडणारी व्यासपीठे संपुष्टात येत आहेत. या व्यासपीठांची जागा आता जातीवर आधारित चळवळी घेत आहेत. त्यामुळे जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होत असून, भविष्यातील जाती-जातींमधील दंगलीच्या धोक्याची ही घंटाच आहे. समाजातील अशा गढूळ वातावरणातही सुरेश शिपूरकर यांचे कार्य व समाजाला दिशा देणारी त्यांची चळवळ दीपस्तंभासारखी आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले.येथील साधना मंडळ, राष्ट्र सेवा दल व स्व. सुरेंद्र आलासे परिवार यांच्यावतीने कै. साथी सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांना संपादक भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते. नगराध्यक्ष जयराम पाटील प्रमुख उपस्थित होते.भोसले म्हणाले, विज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले असले, तरी आजूबाजूचा परिसर, समस्या अधिक गुंतागुंतीच्या बनल्या आहेत. पूर्वीची शेती स्वयंपूर्ण होती. मात्र, आता परावलंबी बनली आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. शिक्षणाचे खासगीकरण झाले; मात्र दर्जाहीन शिक्षणामुळे बेकारी वाढत आहे. तरुणांना दिशा देणारे, मार्गदर्शन करणारे व्यासपीठ काळाच्या ओघात संपुष्टात येत आहे. राजकीय स्वार्थातून ती जागा जातीय व्यासपीठाने घेतली आहे. कोणत्याही समाजाचे प्रश्न केवळ आरक्षणाने सुटणार नाहीत, तर तरुणांनी स्वत:चे कौशल्य व बुद्धिमत्ता सिद्ध करणारे शिक्षण घेतल्यास आरक्षणाची गरजच भासणार नाही. अशा परिस्थितीतही साधना मंडळाने शिपूरकरांसारख्या चळवळीतील कार्यकर्त्याचा गौरव करून त्यांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो, हे कौतुकास्पद आहे.माजी आमदार शिंदे म्हणाले, शिपूरकरांचे कार्य आदर्शवत आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा पुरस्काराची उंची वाढविणारा आहे. त्यांची चळवळ व विचार नव्या पिढीने पुढे चालविण्याची गरज आहे. सत्काराला उत्तर देताना शिपूरकर म्हणाले, माणसाची उंची वयाने नाही तर बुद्धीने मोजली जाते. माझा सत्कार एका विचारवंत व ज्ञानी संपादकांच्या हस्ते होत असल्याचा मला अभिमान आहे. पुरस्कारातून मिळालेला निधी सामाजिक चळवळ करणाऱ्या संस्थांना देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी स्वागत केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष स. ग. सुभेदार, जयपाल बलवान, अब्बास पाथरवट, अ. शा. दानवाडे, अ‍ॅड. देवराज मगदूम, भूपाल दिवटे, माणिक नागावे, राजेंद्र आलासे, रवींद्र आलासे, शशिकांत पाटील उपस्थित होते. वैभव उगळे यांनी आभार मानले.े