शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

वेळुकर यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली

By admin | Updated: February 19, 2015 23:46 IST

भालचंद्र मुणगेकर : कुडाळ येथील सत्कार समारंभात व्यक्त केली खंत

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी असलेल्या डॉ. राजन वेळुकर यांची नियुक्ती ही निवड झाल्यापासूनच वादग्रस्त ठरली असल्याने वेळुकरांनी यापूर्वीच राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांना आदेश द्यावे लागेपर्यंत त्या पदावर थांबलेल्या डॉ. राजन वेळुकरांनी कुलगुरू पदाची प्रतिष्ठा निश्चितपणे कमी केली असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी कुडाळ येथील गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच कुलगुरू निवड करणाऱ्या कमिटीने यापुढे जबाबदारीने काम करावे, असा सल्लाही निवड समितीला दिला. वादग्रस्त ठरलेल्या मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू डॉ. राजन वेळुकर यांना राज्यपालांनी कुलगुरू पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. यासंदर्भात बोलताना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणाले, डॉ. राजन वेळुकरांची या पदी निवड होण्याअगोदर मे २००० ते २००४ या कालावधीत या विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो. मात्र, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी माझी निवड देशाच्या योजना सदस्य आयोगावर केल्याने मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मी गेल्यानंतर या पदावर डॉ. राजन वेळुकरांची निवड कुलगुरू पदावर केली. मात्र, त्यांच्या या निवडीनंतर दहा वर्षांच्या कालावधीत अनेक घटना मुंबई विद्यापीठात घडल्या. त्यातील जास्तीत जास्त घटना वादग्रस्त होत्या. त्यांची निवड झाल्यापासून डॉ. वेळुकर यांची या पदी निवड हीच वादग्रस्त ठरली होती, असा खुलासाही यावेळी खासदार मुणगेकर यांनी केला. (प्रतिनिधी)निवड समितीवर ताशेरेच : भालचंद्र मुणगेकरमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली नियुक्ती कुलपतीने ज्याअर्थी रद्द केली, ते पाहता एका अर्थाने निवड समितीच्या कार्यपद्धतीवर कुलपतींनी ओढलेले ताशेरेच आहेत, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले. एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू होणे अशी शिक्षण क्षेत्रातील व्यक्त ींची इच्छा असल्यास त्यात काही गैर नाही. परंतु विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची प्रतिष्ठा समाजातील स्थान लक्षात घेता आपण कुलगुरू व्हावे, इतकीच इच्छा कमी नाही, तर आपण या पदासाठी लायक आहोत का, याचा सुध्दा विचार प्रत्येक व्यक्तीने अंतर्मुख होऊन करणे महत्त्वाचे आहे, असे मत खासदार मुणगेकर यांनी व्यक्त केले.निवड समितीने जबाबदारीने वागावेडॉ. वेळुकरांच्या नियुक्तीवरून ज्या प्रकारची वादग्रस्त परिस्थिती उद्भवली, ती लक्षात घेता यापुढे फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभर कुलगुरूंची निवड करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने यापुढे अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे.