शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वारणा योजना दानोळीतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार ...

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार आहे. याबाबत दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले.शासकीय विश्रामगृह येथे वारणा पाणी योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार अशोक जांभळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संगीता आलासे, मुख्याधिकारी दीपक पाटील आदींची होती.इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सुरुवातीला दानोळीतून या योजनेला मंजुरी मिळाली आहे; परंतु या ठिकाणी विरोध होऊ लागल्याने कोथळी येथे पर्याय निवडून सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली; परंतु त्या ठिकाणीही विरोध होऊ लागला. आठ महिने झाले तरी कोणताही निर्णय होत नाही. प्रत्येक जण आपापले घोडे दामटत आहे.शहराची वस्ती चार लाखांवर गेली आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरात आठवड्याने पाणी येत आहे. त्यामुळे ही योजना लवकर झाल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा नागरिक आम्हाला बसू देणार नाहीत, अशा भावना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.यावर पालकमंत्र्यांनी पूर्वी मंजूर असलेल्या दानोळीतूनच ही योजना सुरू करावी, तसेच याची दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करुन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.यावेळी ताराराणी आघाडी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, नगरसेविका गीता भोसले, नगरसेवक युवराज माळी, अजित जाधव, रवींद्र माने आदी उपस्थित होते.योजना कदापि होऊ देणार नाही : धनवडेइचलकरंजीच्या राजकारण्यांना जनतेला शुद्ध पाणी द्यायचे नाही, फक्त शुद्ध पाण्याच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यांसोबतच ही योजना दानोळीतून रद्द करण्यात आली होती. आणि यासाठी पुन्हा दानोळीचे नाव पालकमंत्री घेत आहेत. हा निवडणुकीचा फंडा असून बाकी काही नाही. निवडणुका तोंडावर आल्याने योजनेच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. या योजनेचा निधी गेला आहे, कसलीही प्रशासकीय मंजुरी नाही, यापुढे या योजनेसाठी दानोळीचे नाव घेऊ नये, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे महादेव धनवडे यांनी दिला.महादेव धनवडेअध्यक्ष, वारणा बचाव कृती समिती दानोळी