शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वारणा योजना दानोळीतूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार ...

कोल्हापूर : राज्य शासनाच्या अमृत योजनेतून इचलकरंजी शहरासाठी पाणीपुरवठ्याकरीता मंजूर झालेली वारणा पाणी योजना दानोळी (ता. शिरोळ) येथूनच होणार आहे. याबाबत दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले.शासकीय विश्रामगृह येथे वारणा पाणी योजनेसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख उपस्थिती आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, माजी आमदार अशोक जांभळे, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संगीता आलासे, मुख्याधिकारी दीपक पाटील आदींची होती.इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सुरुवातीला दानोळीतून या योजनेला मंजुरी मिळाली आहे; परंतु या ठिकाणी विरोध होऊ लागल्याने कोथळी येथे पर्याय निवडून सर्व्हेच्या कामाला सुरुवात झाली; परंतु त्या ठिकाणीही विरोध होऊ लागला. आठ महिने झाले तरी कोणताही निर्णय होत नाही. प्रत्येक जण आपापले घोडे दामटत आहे.शहराची वस्ती चार लाखांवर गेली आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरात आठवड्याने पाणी येत आहे. त्यामुळे ही योजना लवकर झाल्याशिवाय पर्याय नाही; अन्यथा नागरिक आम्हाला बसू देणार नाहीत, अशा भावना पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.यावर पालकमंत्र्यांनी पूर्वी मंजूर असलेल्या दानोळीतूनच ही योजना सुरू करावी, तसेच याची दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला दिले. त्यानुसार दोन दिवसांत ई-निविदा प्रसिद्ध करुन पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.यावेळी ताराराणी आघाडी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, नगरसेविका गीता भोसले, नगरसेवक युवराज माळी, अजित जाधव, रवींद्र माने आदी उपस्थित होते.योजना कदापि होऊ देणार नाही : धनवडेइचलकरंजीच्या राजकारण्यांना जनतेला शुद्ध पाणी द्यायचे नाही, फक्त शुद्ध पाण्याच्या नावावर राजकारण करायचे आहे. यापूर्वी मंत्रालयामध्ये पालकमंत्र्यांसोबतच ही योजना दानोळीतून रद्द करण्यात आली होती. आणि यासाठी पुन्हा दानोळीचे नाव पालकमंत्री घेत आहेत. हा निवडणुकीचा फंडा असून बाकी काही नाही. निवडणुका तोंडावर आल्याने योजनेच्या नावावर आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. या योजनेचा निधी गेला आहे, कसलीही प्रशासकीय मंजुरी नाही, यापुढे या योजनेसाठी दानोळीचे नाव घेऊ नये, असा इशारा वारणा बचाव कृती समितीचे महादेव धनवडे यांनी दिला.महादेव धनवडेअध्यक्ष, वारणा बचाव कृती समिती दानोळी