शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

वैशाख पेटला, उष्म्याने हैराण

By admin | Updated: April 23, 2015 00:55 IST

कमाल ३६ अंश : रुग्णांच् या संख्येत वाढ

कोल्हापूर : वैशाख महिन्यात सरासरी कमाल तापमानाने ३६ अंशांची पातळी गाठली आहे़ यामुळे सकाळपासूनच अंगातून घामाच्या धारा वाहत असून, कोल्हापूरकरांना ‘अंगी वणवा पेटला’ची प्रचिती आली़ उन्हाच्या असह्य झळांमुळे थंडी-ताप, तसेच मूत्रविकारांनी त्रस्त रुग्णांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली़ रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी संधी मिळताच त्यांनी शहरातील उद्याने आणि शीतपेयगृहे गाठली़ घर, कार्यालये, मॉल्स येथील पंख्यांची पाती वेग घेत होती़ एसी, कूलर अव्याहतपणे सुरू होते़ रस्त्यावरील फेरीवाले, भाजीविक्रेते, हमाल यांना घामाच्या धारा गाळतच दिवस काढावा लागला़ उन्हामुळे पाणपोई, शीतपेयगृहांमध्ये कोरड पडलेल्या घशांना दिलासा देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली़ उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर रुमाल टाकून, शक्य असलेल्या ठिकाणी छत्रीचा आसरा फळ आणि भाजीविक्रेत्यांनी घेतला़ खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिला स्कार्फ परिधान करूनच घराबाहेर पडल्या़ कधी छत्रीचा, तर कधी वृक्षांच्या सावलीचा आधार घेत रणरणत्या उन्हापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला़ दुपारी बाराच्या सुमारास तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेल्यामुळे नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले़ त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सर्वांना ग्राहकांची वाट पाहावी लागली़ (प्रतिनिधी)रिक्षावाल्यांनी घेतला ‘सावली स्टॉप’चा आधारअनेक रिक्षांना फायबरचेकवच आहे़ उन्हात हे कवच जास्त तापत असल्यामुळे रिक्षातील प्रवाशांना दाटीवाटीबरोबरच उकाड्याचा त्रास सहन करावा लागला़ दुपारी बारानंतर रिक्षावाल्यांनीही सावली बघूनच रिक्षा थांबवत उन्हापासून मुक्त होण्याचा प्रयत्न केला़ बागेचा अन् शीतपेयगृहांचा आसरा रणरणत्या उन्हामुळे आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शहरातील बागांमध्ये विसावा घेतला़ वाऱ्याची झुळुक अनुभवण्यासाठी नागरिकांनी टाउन हॉल, गंगावेश, महावीर गार्डन येथील बागांमध्ये पहुडणे पसंत केले़ घशाला पडलेली कोरड शमविण्यासाठी नागरिकांनी शीतपेयगृहांत एकच गर्दी केली़ त्यामुळे शहरातील राजारामपुरी, भाऊसिंगजी रोड, गंगावेश, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील शीतपेयगृहे फुल्ल झाली होती़