शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वैश्य समाजाने उद्योग-व्यापाराकडे वळावे

By admin | Updated: February 16, 2015 00:02 IST

नारायण राणेंचे कौतुक

दीपक केसरकर : वधू-वर सूचक मेळावा; दोन तपांपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असल्याने एकाच घरात चार पदे : महाडिक कोल्हापूर : वैश्यवाणी समाजाला उन्नत व श्रीमंत समाज म्हणून ओळखले जात होते, पण सध्या ८० टक्के समाज दारिद्र्यरेषेखाली आहे. गतवैभव मिळवून देण्यासाठी समाजाने उद्योग व व्यापाराकडे वळावे, असे आवाहन ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. वैश्य वाणी समाज, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित वधू-वर सूचक मेळावा व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. दीपक केसरकर म्हणाले, वैश्य वाणी समाज हा प्रेमळ आहे. या बळावरच अल्पसंख्याक असतानाही राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहे. लग्न करताना नोकरदार मुलगा ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वधू व वरांची पसंती करताना सौंदर्य न पाहता संस्कार व कर्तृत्व पाहावे, तरच संसाराचा गाडा सुरळीत चालतो. वैश्य समाजाच्या बोर्डिंगसाठी निधी दिला जाईल, त्यासाठी केंद्राच्या पैशांची गरज भासणार नाही. महाडिक कुटुंब तेवढे सक्षम आहे. दोन तपांपासून महाडिक कुटुंबीयांनी समाजकामातून कोल्हापूरकरांचा विश्वास संपादन केल्याने एकाच घरात दोन आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्य आहेत. नारायण राणे यांच्यावर टीका करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी दीपक केसरकर यांचे कौतुक केले. वैश्य बोर्डिंगसाठी २० लाखांची मदत जाहीर केली. पोपट ढवण यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वळंजू, पांडुरंग पारकर, जयवंत वळंजू यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक ढवण यांनी आभार मानले. आमदार वैभव नाईक, मुंबई महापालिकेच्या महिला-बालकल्याण सभापती पूजा महाडेश्वर, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, माधुरी नकाते, विभासू खातू, राजाभाऊ बेंडके, सुरेश कोरगावकर उपस्थित होते.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतीलअनेक वक्त्यांनी केसरकर यांना मुख्यमंत्री व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. हाच धागा पकडत केसरकर म्हणाले, एक ना एक दिवस शिवसेनेचे स्वबळावर राज्य येईल, त्यावेळी मी नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. सध्या भाजप मोठा पक्ष असला, तरी आम्ही प्रेमाने जग जिंकणारी माणसे आहोत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.नारायण राणेंचे कौतुकसिंधुदुर्गमधील उद्योजिका व कोल्हापूरची कन्या साक्षी वंजारी यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. त्यांच्यामुळेच उद्योग उभारणीस मदत झाल्याचे सांगितले. हाच धागा पकडत हे राजकीय व्यासपीठ नाही, काम करून निवृत्त झालेल्यांबद्दल आपण वाईट बोलत नसल्याचा टोला दीपक केसरकर यांनी साक्षी यांना हाणला.१२ गुण आणि अंगठीअलीकडे कुंडली पाहूनच लग्ने ठरविली जातात. आपल्याही लग्नात वडिलांनी कुंडली पाहिली, पण १२ गुण झाल्याने कुंडली जुळली नाही. कुंडली पाहणाऱ्याला सोन्याची अंगठी दिल्यानंतर १२ चे ३६ गुण झाले आणि अरुंधतीशी लग्न झाले. आमचा सोन्यासारखा संसार आहे. त्यामुळे कुंडली पाहू नका, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.