शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

वैश्य समाजाने उद्योग-व्यापाराकडे वळावे

By admin | Updated: February 16, 2015 00:02 IST

नारायण राणेंचे कौतुक

दीपक केसरकर : वधू-वर सूचक मेळावा; दोन तपांपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असल्याने एकाच घरात चार पदे : महाडिक कोल्हापूर : वैश्यवाणी समाजाला उन्नत व श्रीमंत समाज म्हणून ओळखले जात होते, पण सध्या ८० टक्के समाज दारिद्र्यरेषेखाली आहे. गतवैभव मिळवून देण्यासाठी समाजाने उद्योग व व्यापाराकडे वळावे, असे आवाहन ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. वैश्य वाणी समाज, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित वधू-वर सूचक मेळावा व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. दीपक केसरकर म्हणाले, वैश्य वाणी समाज हा प्रेमळ आहे. या बळावरच अल्पसंख्याक असतानाही राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहे. लग्न करताना नोकरदार मुलगा ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वधू व वरांची पसंती करताना सौंदर्य न पाहता संस्कार व कर्तृत्व पाहावे, तरच संसाराचा गाडा सुरळीत चालतो. वैश्य समाजाच्या बोर्डिंगसाठी निधी दिला जाईल, त्यासाठी केंद्राच्या पैशांची गरज भासणार नाही. महाडिक कुटुंब तेवढे सक्षम आहे. दोन तपांपासून महाडिक कुटुंबीयांनी समाजकामातून कोल्हापूरकरांचा विश्वास संपादन केल्याने एकाच घरात दोन आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्य आहेत. नारायण राणे यांच्यावर टीका करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी दीपक केसरकर यांचे कौतुक केले. वैश्य बोर्डिंगसाठी २० लाखांची मदत जाहीर केली. पोपट ढवण यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वळंजू, पांडुरंग पारकर, जयवंत वळंजू यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक ढवण यांनी आभार मानले. आमदार वैभव नाईक, मुंबई महापालिकेच्या महिला-बालकल्याण सभापती पूजा महाडेश्वर, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, माधुरी नकाते, विभासू खातू, राजाभाऊ बेंडके, सुरेश कोरगावकर उपस्थित होते.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतीलअनेक वक्त्यांनी केसरकर यांना मुख्यमंत्री व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. हाच धागा पकडत केसरकर म्हणाले, एक ना एक दिवस शिवसेनेचे स्वबळावर राज्य येईल, त्यावेळी मी नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. सध्या भाजप मोठा पक्ष असला, तरी आम्ही प्रेमाने जग जिंकणारी माणसे आहोत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.नारायण राणेंचे कौतुकसिंधुदुर्गमधील उद्योजिका व कोल्हापूरची कन्या साक्षी वंजारी यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. त्यांच्यामुळेच उद्योग उभारणीस मदत झाल्याचे सांगितले. हाच धागा पकडत हे राजकीय व्यासपीठ नाही, काम करून निवृत्त झालेल्यांबद्दल आपण वाईट बोलत नसल्याचा टोला दीपक केसरकर यांनी साक्षी यांना हाणला.१२ गुण आणि अंगठीअलीकडे कुंडली पाहूनच लग्ने ठरविली जातात. आपल्याही लग्नात वडिलांनी कुंडली पाहिली, पण १२ गुण झाल्याने कुंडली जुळली नाही. कुंडली पाहणाऱ्याला सोन्याची अंगठी दिल्यानंतर १२ चे ३६ गुण झाले आणि अरुंधतीशी लग्न झाले. आमचा सोन्यासारखा संसार आहे. त्यामुळे कुंडली पाहू नका, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.