शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

वडूज : उरमोडीचे पाणी सांगली जिल्ह्याला पळविणाऱ्यांचा निषेध

By admin | Updated: August 20, 2014 00:28 IST

पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा

वडूज : सांगलीच्या मंत्र्यांनी उरमोडी योजनेचे पाणी त्यांच्या जिल्ह्यातील गावांना घेऊन जाण्याचा डाव केला आहे. या योजनेचे भूमिपूजनही ढाणेवाडी गावात झाले. या प्रकाराबाबत जलसंपदामंंत्री शशिकांत शिंदे व माणचे आ. जयकुमार गोरे या दोघांनी कागदोपत्री पत्रकबाजी करण्याऐवजी कॅबिनेटमध्ये योजनेस विरोध करावा,’ अशी मागणी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली. ‘उरमोडी उपसा सिंंचन योजनेचे पाणी सांगलीला नेण्याचा निर्णय रद्द करा,’ या मागणीसाठी खटाव-माण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सुरेंद्र गुदगे म्हणाले, ‘खटाव-माणची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना दिशाभूलीचे राजकारण करत पाणी सांगलीकडे पळविले जात आहे. ही एकप्रकारे येथील जनतेची चेष्टा शासनकर्ते करीत आहेत. आम्ही मोर्चा काढला म्हणून आमच्यावर टीका करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. सांगलीकरांचे गोडवे गाणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.’ दत्ता जगदाळे म्हणाले, ‘मोठे आंदोलने करून व मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही औंधसह सोळा गावांना द्यायला शासनाकडे पाणी नाही. परंतु, सांगली जिल्ह्याला द्यायला पाणी आले कोठून, अशा प्रकारे आमचा अंत बघणाऱ्यांना आगामी काळात धडा शिकविला जाईल.’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते संजय भगत, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल भोसले, दिलीप तुपे, तानाजी देशमुख, राजाभाऊ देशमुख, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांची भाषणे झाली. यावेळी प्रा. बंडा गोडसे, ‘रिपाई’चे किशोर सोनवणे, सतीश शेटे, शिवाजी पवार, सदाशिव खाडे, सोमनाथ माळी, प्रशांत गोडसे, सुरेश राऊत, हेमंत जाधव, रणजित घाडगे, दिगंबर शिंगाडे, संतोष जाधव ,अंजनकुमार घाडगे, सचिन मोरे, पंढरीनाथ तुपे, विकास जाधव, प्रशांत कणसे आदिंसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)