शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

वडाप वाहतूक एस.टी.च्या मुळावर

By admin | Updated: November 15, 2015 23:45 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : चंदगड आगाराला रोज ५० हजारांचा तोटा; वडापचा ४३ वा बळी

चंदगड : चंदगड ते नागवे रस्त्यावर शनिवारी खासगी वडाप करणाऱ्या ट्रॅक्सवरून पडून येथील तुकाराम गुरव या शेतकरी युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चंदगड तालुक्यातील वडापची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वडापच्या लहान-मोठ्या अपघातांचा विचार केला तर गेल्या दहा-बारा वर्षांत तालुक्यात ४३ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यात अवैध धंदे, वडाप सर्वच बंद आहे, असा डंका वाजविला जात आहे. मग रस्त्या-रस्त्यांवर दिसणारी वडाप वाहने पाहिली की, यांना पोलिसांचा आशीर्वाद आहे काय? अशी चर्चा सुरू आहे. तालुक्यात सध्या चंदगड-बेळगाव, हलकर्णी-पाटणे फाटा-बेळगाव, कोवाड-बेळगाव, ढोलगरवाडी-कोवाड, कोवाड-नेसरी, तुडीये-बेळगाव, चंदगड-नागवे, चंदगड-पाटणे, चंदगड-कानुर, चंदगड-अडकूर, आदींसह तालुक्यातील अनेक मार्गांवर खुली जोरदार वाहतूक सुरू आहे. वडाप करणाऱ्यांमध्ये ५५ मिनिबस, ३० कु्रझर गाड्या, १७२ टॅक्स, आदी वाहनांद्वारे तालुक्यातील प्रवाशांची वाहतूक केली जाते. प्रवासी मिळविण्यासाठी वाहने भरधाव वेगाने पळविणे, प्रवाशांना दाटीवाटीने बसवून वाहनात क्षमतेपेक्षा अधिक लोक बसविणं, आदी प्रकार वडापवाल्यांकडून केले जातात. प्रवासी मिळविताना झालेल्या अपघातांमध्ये दाटे गावाजवळ एस. टी. - टेम्पो अपघातामध्ये नऊजण जागीच ठार झाले होते. त्यानंतर तेथेच सहा महिन्यांनंतर प्र्रा. चित्तवाडगीसह दोघेजण अपघातामध्ये मरण पावले होते. बेळेभोट येतील वळणावर नागनवाडी पेट्रोलपंपावर शिनोळी गावाजवळ अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. वडापवाले वडाप करताना आर. टी. ओ.चे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोपणे वडाप करीत आहेत. सुपेनजीक असलेल्या आर. टी. ओ. नाक्यावर अशा अवैध धंद्यांच्या वाहनांवर एकही गुन्हा दाखल केल्याची नोंद नाही; तर चंदगड पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी शासकीय मोटारसायकल घेऊन सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिनोळी येथील एका सांस्कृतिक क्लबसमोर गाडी लावून थांबलेले असतात. परंतु त्यांनी या बेकायदेशीर वाहनांवर काय कारवाई केली, हा संशोधनाचाच विषय आहे. मात्र, सामान्य लोकांची मोटारसायकल अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते व त्यातील त्रुटींवर बोट ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. वडाप वाहतुकीबाबत एस. टी. डेपोच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी वडापमुळे कमी गर्दीच्या हंगामात सुमारे ५० हजार, तर जास्त गर्दीच्या हंगामामध्ये दररोज अंदाजे एक लाखापेक्षा अधिक आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले. या गंभीर समस्येकडे एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांकडे वडापची माहिती लेखी-तोंडी स्वरूपात दिली आहे. मात्र, पोलिसांकडून यावर काहीही हालचाल न झाल्यामुळे एस. टी. मंडळाने तालुक्यातील वडाप करणाऱ्या वाहनांची नागनवाडी, चंदगड, कोवाड, अडकूर, आदी मार्गावर गणती सुरू केली असून, त्याचा अहवाल दररोज एस. टी. महामंडळ व शासनाकडे पाठविला जात आहे. चंदगड येथील जुन्या एस. टी. स्टँडवर थांब्यापासून सुमारे १०० मीटर मागे एस. टी. बसेस थांबविण्याची सूचना पोलिसांनी दिलेली आहे. याची एस. टी. प्रशासनाकडून तंतोतंत अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, वडापच्या वाहनांना या थांब्यावरच गाड्या उभ्या करण्यासाठी जागा दिल्याची चर्चा होत आहे. खराब रस्ते पोलिसांच्या पथ्यावरतालुक्याची भौगोलिक रचना पाहिली तर अजूनही काही गावांना रस्ते नाहीत. आहेत ते खराब आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये अद्यापही एस.टी. पोहोचलेली नाही. त्यामुळे अशा गावांतील नागरिकांना वडापवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे येथील वडाप चालकांकडून पोलीस चिरीमिरी घेतात. त्याच चिरीमिरीमधून महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा पोलिसांपर्यंत पोहोचला जातो, याची उघड चर्चा आहे.