शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

‘ब्रुसेला’ रोगामुळे जनावरांना लसीकरण

By admin | Updated: July 18, 2014 23:25 IST

खबरदारीचा उपाय सुरु

उचगाव : उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी (ता. करवीर) येथील जनावरांना ‘ब्रुसेला’ रोगाची लागण रोखण्याकरिता लसीकरणास सुरुवात झाली आहे. गाई-म्हशी व्याल्यानंतर त्यांच्यापासून जंतूसंसर्ग व जनावरांना ताप, लाळ गाळणे, अशक्तपणा जाणवत आहे. काही जनावरे चारा खात नाहीत. यामुळे गाई-म्हशी, रेडकं, वासरू, बैल यांचे लसीकरण सुरू झाले आहे. पशुधन वाचविण्यासाठी पशुवैद्यक प्रयत्न करीत आहेत. ज्या जनावरांना लसीकरण झाले आहे, त्यांची काळजी घेताना इंजेक्शन केलेल्या भागाला शेतकऱ्यांनी हात लावू नये, जनावरांच्या गोठ्यात जाताना तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून डोळ्यावर गॉगल घालावा. तसेच जंतूसंसर्ग रोखण्यासाठी गोठ्याची स्वच्छता करावी. गाभ व प्रसूतीजन्य जनावरांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. रोगामुळे जंतूसंसर्ग झाला असेल, तर हातांना ग्लोज वापरावे, अथवा प्लास्टिकची पिशवी हाताला घालून शेण व मलमूत्र काढावे. यामुळे स्वत:ला या रोगाची लागण होणार नाही. लाखमोलाच्या जनावरांना वाचविण्यासाठी शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे हेलपाटे मारीत आहेत, तर दूध संघातर्फे गावातच लसीकरण शिबिर घेतले जात आहे.