शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रिक्त पदांमुळे आजऱ्यातील आरोग्य सेवा सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST

सदाशिव मोरे । आजरा : आजरा तालुक्यातील आरोग्य सेवा रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व ...

सदाशिव मोरे । आजरा

: आजरा तालुक्यातील आरोग्य सेवा रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांना दुप्पट कामे करावी लागत आहेत. वाढलेल्या कोरोनाच्या संसर्गाबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

आजरा तालुका मागास व डोंगराळ भागात विखुरलेला आहे. अद्यापही अनेक गावे व वाड्या-वस्त्यांवर दळणवळणाच्या साधनांअभावी आरोग्यसेवा पोहोचली नाही. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक व सेविका ग्रामीण भाग असल्यामुळे याठिकाणी काम करण्यास इच्छुक नसतात. भरलेली पदे ही पदोन्नतीवर शहरी भागात जातात. मंजूर ११९ पदांपैकी तब्बल ४६ पदे रिक्त आहेत.

वाटंगी व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राला एकच वैद्यकीय अधिकारी आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांना २४ तासांची सेवा पार पाडावी लागत आहे. त्यातच कोरोनामुळे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे.

तालुक्यात २ वैद्यकीय अधिकारी, १ औषध निर्माण अधिकारी, ४ आरोग्य सहायक, २४ आरोग्यसेवक व सेविका, २ कनिष्ठ सहायक, ४ वाहनचालक, ९ परिचर अशी एकूण ४६ पदे रिक्त आहेत. तालुक्यातील १ लाख २० हजार लोकांचे आरोग्य फक्त ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हातात आहे.

तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २७ उपकेंद्रे आहेत. उपकेंद्रांतील २७ पैकी ४ पदे अद्यापही रिक्त आहेत.

उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावातील सर्व्हे करणे, कोरोनाबाबत प्रबोधन करणे, कोरोनाची लस घेण्याबाबत विनंती करणे, सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार करणे, गरोदर महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाणे व उपचार करणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. कोरोनाच्या काळात सर्व कामे जीव धोक्यात घालून करावी लागत आहेत. आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरल्यास रुग्णांवर वेळेवर उपचार करणे शक्य आहे.

--

* तालुक्यात ३८ दिवसांत ३१ जणांचा मृत्यू

आजरा तालुक्यात १ एप्रिलपासून कोविड केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात आजपर्यंत २४८५ पैकी १५६३ जण निगेटिव्ह, तर ९२२ पॉझिटिव्ह आले आहेत. ३१ जणांचा कोविड सेंटर व खासगी दवाखान्यात मृत्यू झाला आहे. अजूनही ४९७ जणांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. गेल्यावर्षी वर्षभरात ४८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत नागरिकांनी दक्षता न घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचा आकडा वाढत आहे.