शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

सांडपाण्याचा वापर शेतीसाठी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:44 IST

कोल्हापूर : ओढ्या-नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी व झाडांसाठी वापरता येऊ शकते, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन याचे काम आठवडाभरात सुरू करावे, याकरिता लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.वनविभाग, सामाजिक वनीकरण ...

कोल्हापूर : ओढ्या-नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी व झाडांसाठी वापरता येऊ शकते, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन याचे काम आठवडाभरात सुरू करावे, याकरिता लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागातर्फे यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेचा प्रारंभ शेंडा पार्क येथे करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा नदीप्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नाले व ओढ्यांमधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण कमी झाले तर हा प्रश्न बºयापैकी संपू शकतो. यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी तसेच झाडांकरिता वापरावे, असे केल्यास झाडांना व शेतीला लागणाºया पाण्याचाही प्रश्न सुटेल.पालकमंत्री पाटील म्हणाले, तज्ज्ञांच्या मते पर्यावरण संतुलनासाठी राज्यात किमान ४०० कोटी झाडे लावणे गरजेचे आहे. शासनाने पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून या वृक्षांच्या संवर्धनासाठी संपूर्ण समाजाने सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. राज्यात पहिल्या वर्षी १ कोटी, दुसºया वर्षी २ कोटी, तिसºया वर्षी ४ कोटी आणि यंदा १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे.कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करातालुक्यात शेतकºयांनी कृषी उत्पादन वाढीबरोबरच कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करावी, त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही देत गावातील पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्पही उभारण्यात शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.१५ जून ते ३०सप्टेंबरपर्यंत ‘वनमहोत्सव’वन विभागातर्फे जिल्ह्यात १ कोटी २८ लाख रोपे तयार असून, ती १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करून जनतेला सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जातील.१० जुलैपर्यंत ‘रोपे आपल्या दारी’ या योजनेतून शहरात ४ स्टॉल रोपे विक्रीसाठी सज्ज केल्याचेही अरविंद पाटील यांनी सांगितले.यंदा २८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजनजिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात२८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगून लावण्यात येणारी झाडे ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत जिवंत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.झाडांच्या संगोपनासाठी पाणी अन् ठिबकशेंडा पार्क येथील झाडांचे संगोपन, पाणी आणि ठिबक यासाठी कृषी महाविद्यालयाने सविस्तर योजना तयार करावी, त्यांना शासन योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.