शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

सांडपाण्याचा वापर शेतीसाठी : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:44 IST

कोल्हापूर : ओढ्या-नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी व झाडांसाठी वापरता येऊ शकते, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन याचे काम आठवडाभरात सुरू करावे, याकरिता लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.वनविभाग, सामाजिक वनीकरण ...

कोल्हापूर : ओढ्या-नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी व झाडांसाठी वापरता येऊ शकते, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन याचे काम आठवडाभरात सुरू करावे, याकरिता लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागातर्फे यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेचा प्रारंभ शेंडा पार्क येथे करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा नदीप्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नाले व ओढ्यांमधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण कमी झाले तर हा प्रश्न बºयापैकी संपू शकतो. यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी तसेच झाडांकरिता वापरावे, असे केल्यास झाडांना व शेतीला लागणाºया पाण्याचाही प्रश्न सुटेल.पालकमंत्री पाटील म्हणाले, तज्ज्ञांच्या मते पर्यावरण संतुलनासाठी राज्यात किमान ४०० कोटी झाडे लावणे गरजेचे आहे. शासनाने पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून या वृक्षांच्या संवर्धनासाठी संपूर्ण समाजाने सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. राज्यात पहिल्या वर्षी १ कोटी, दुसºया वर्षी २ कोटी, तिसºया वर्षी ४ कोटी आणि यंदा १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे.कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करातालुक्यात शेतकºयांनी कृषी उत्पादन वाढीबरोबरच कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करावी, त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल,अशी ग्वाही देत गावातील पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्पही उभारण्यात शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.१५ जून ते ३०सप्टेंबरपर्यंत ‘वनमहोत्सव’वन विभागातर्फे जिल्ह्यात १ कोटी २८ लाख रोपे तयार असून, ती १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करून जनतेला सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जातील.१० जुलैपर्यंत ‘रोपे आपल्या दारी’ या योजनेतून शहरात ४ स्टॉल रोपे विक्रीसाठी सज्ज केल्याचेही अरविंद पाटील यांनी सांगितले.यंदा २८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजनजिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात२८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगून लावण्यात येणारी झाडे ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत जिवंत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.झाडांच्या संगोपनासाठी पाणी अन् ठिबकशेंडा पार्क येथील झाडांचे संगोपन, पाणी आणि ठिबक यासाठी कृषी महाविद्यालयाने सविस्तर योजना तयार करावी, त्यांना शासन योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.