शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

सत्तेसाठी धर्माचा वापर चुकीचा

By admin | Updated: December 22, 2015 00:59 IST

कुमार सप्तर्षी : शहाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र परिषदेच्या अधिवेशनाला प्रारंभ

कोल्हापूर : हिंदू धर्माच्या नावाखाली चार हजार संप्रदाय आहेत. आपल्या देशाच्या बोलीभाषेत धर्माला एकही ‘शब्द’ नाही. धर्माच्या नावाखाली विविध संप्रदाय लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. सत्ता हस्तगत करण्यासाठी धर्माचा वापर करणे हे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी येथे केले.येथील शहाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि राज्यशास्त्र परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ. के. के. कावळेकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब भोसले होते.सप्तर्षी म्हणाले, हिंदुत्व हे राजकीय सत्ताप्राप्तीचे साधन बनले आहे. मात्र, हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. धर्माचे स्वरूप हे वैयक्तिक आहे. एक व्यक्ती एकापेक्षा अधिक धर्माचे आचरण करू शकते. आपल्या देशवासीयांमध्ये एकत्रित राहण्याची मोठी कला असून, यात ते निष्णात आहेत. जगभरातील अभ्यासकांसाठी आपला देश मोठी प्रयोगशाळा आहे. दरम्यान, या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. के. पाटील होते. कार्यक्रमात प्रा. आर. आर. गायकवाड, विनायक पाटील यांचा सत्कार आणि ‘राजमुद्रा’ अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर पाटील, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भारती पाटील, नेहरू अभ्यास केंद्राच्या समन्वयक प्रा. वासंती रासम प्रमुख उपस्थित होत्या. डॉ. एच. एस. वनमोरे यांनी प्रास्ताविक तर प्रा. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. चांगल्या विचारांची गरजअणुबॉम्ब तयार करणे हे मतिमंदपणाचे लक्षण आहे. पाकिस्तानची केवळ चार मोठी शहर आहेत. मात्र, भारताची ८५ शहरे मोठी असून, त्यांना अणुबॉम्बचा धोका आहे. अणुबॉम्बपेक्षा चांगले विचार आणि ज्ञानाची आवश्यकता आहे, असे मत डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केले.कायद्याचे ज्ञान आवश्यककायदा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या ज्ञानाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी केले. ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात कायद्याचे ज्ञान देण्यात यावे. हे ज्ञान मिळाल्यास सक्षमपणे जीवन जगता येईल. ते लक्षात घेऊन प्रत्येकाने कायद्याचे ज्ञान संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.