शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

फळे, भाजीपाल्यांचा रोजच्या आहारात वापर करा; निसर्गमित्र परिवाराची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकल्पनेचे परिवाराकडून स्वागत करण्यात आले असून, निरोगी जीवनशैलीसाठी विस्मरणात गेलेली फळे व भाज्यांचे गुणधर्म लक्षात ...

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकल्पनेचे परिवाराकडून स्वागत करण्यात आले असून, निरोगी जीवनशैलीसाठी विस्मरणात गेलेली फळे व भाज्यांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचा आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी निसर्गमित्र परिवाराकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी निसर्गमित्र परिवाराशी २८२३/४८, बी वार्ड, महालक्ष्मी नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर आणि कार्यवाह अनिल चौगुले यांनी केले आहे.

असे आहेत उपक्रम

शहरी शेती या नवसंकल्पनेला अनुसरून अंगण, टेरेस, बाल्कनी अशा उपलब्ध जागेत उपयुक्त वनस्पती लागवडीसाठी कार्यशाळा व मार्गदर्शन, प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी फळ व भाजीपाल्याच्या शेतावर शिवार भेट, स्थानिक फळे व भाजीपाला यांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करणे, तसेच रोजच्या आहारात हंगामानुसार फळे, कच्च्या भाज्या, सॅलड यांचा वापर करणे, कोणत्याही कार्यक्रमात, समारंभात फुलांचा गुच्छ देण्याऐवजी फळझाडांचे रोप भेट देणे, विविध रानफळे, रानभाज्यांचे महोेत्सव घेणे व प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणे, पारंपरिक शेती पद्धतीत नवीन सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन व पीक पोषण, संरक्षण, गुणवत्ता, यावर चर्चासत्र घेणे व शेती तसेच जैवविविधतेचे महत्त्व यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करणे, सौरऊर्जा वाळवणी यंत्राच्या साहाय्याने नाशवंत फळे, भाजीपाला यावर प्रक्रिया करून उपपदार्थ करणे, ते टिकविण्यासाठी कार्यशाळा घेणे, औषधी फळे व भाजीपाला, वनस्पतींच्या राेपवाटिका प्रशिक्षण कार्यशाळा आयाेजित करणे असे उपक्रम घेण्यात येणार आहेत.

(संदीप आडनाईक)