शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होतो हे तर जगजाहीर!

By admin | Updated: September 20, 2016 23:57 IST

पालकमंत्री शिवतारेंचे वक्तव्य; ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या आचारसंहितेचे केले कौतुक

सातारा : ‘जो अ‍ॅट्रॉसिटी कायदा मागासवर्गीय बांधवांच्या संरक्षणासाठी तयार केला, त्याचाच गैरवापर काही मागासवर्गीय आणि काही राजकीय नेत्यांकडून होत असून, त्याला आता पायबंद घालणे आवश्यक बनले आहे,’ अशी परखड भूमिका साताऱ्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मांडली. दरम्यान, मी सातारा किंवा पुणे येथील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नाही, असे सांगत या मोर्चामध्ये मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने जी आचारसंहिता तयार केली आहे, त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे मंगळवारी साताऱ्यात होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजित देशमुख, साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री शिवतारे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर न्यायालयीन प्रक्रियेमुळे भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, मराठा क्रांती मोर्चा आणि मागासवर्गीयांचे प्रतिमोर्चे काढण्याचे आवाहन त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा होत असलेला गैरवापर यावर विवेचन केले. ते म्हणाले, ‘मराठा क्रांती मोर्चामध्ये होत असलेली गर्दी आणि त्यांनी स्वत:च तयार करून घेतलेली आचारसंहिता ही कौतुकास्पद आहे. २० ते २५ लाखांचे मोर्चे निघत असताना त्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडत नाही. असे कधी कुठेच घडल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले नाही. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, राणे समितीने जो निर्णय घेतला आता ती बाब न्यायालयात आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही जी काही कृती करू ती फार विचारपूर्वक करावी लागणार आहे.’‘मी मोर्चात सहभागी होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणार आहे. लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्याकडून काय अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शन येत आहेत याचा आढावा मी घेत आहे. मी स्वत: कानोसा घेतला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. आता त्या थांबायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या हक्काविषयी लढायचे आहे आणि ते आता रस्त्यावर उतरले आहेत. सरकार आणि सरकारमधील एक घटक म्हणून आम्ही वाटाघाटी करत आहे. आम्ही या विषयावर सतर्क आहेच. समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत आहे आणि यापुढेही त्या पोहोचवत राहणार आहे. त्यातून ठोस उपाययोजना आखता येणार आहेत. त्यामुळे आपल्यालाही सरकारची योग्य तीच कृती दिसणार आहे, असेही ते म्हणाले.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘भीम के नामपे खून बहता है तो बहने दो’ अशी भूमिका मांडत मागासवर्गीयांना प्रतिमोर्चे काढण्याचे केलेले आवाहन आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होत असल्यामुळे तो रद्दच करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या दोघांच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो आहे हे तर जगजाहीर आहे. तो कसा झाला आणि कसा होत आहे. हेदेखील तुमच्या माझ्यासह सर्वांनाच माहीत आहे. जो कायदा ज्यांच्या संरक्षणासाठी झाला त्यांच्याकडूनच या कायद्याचा गैरवापर झाला, ही बाबदेखील नाकारून चालणार नाही. काही ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस झाल्याच्याही घटना आहेत. त्याचा अनेकांना त्रास झाला आहे. त्यामुळे या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक बनले आहे.’