शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

वजनाच्या आडून युरिया अनुदानाला कात्रीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:30 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारने हळूहळू खतावरील अनुदान बंद करण्याचा घाट घातला असून, उरल्यासुरल्या युरिया खताच्या पिशवीचे वजन कमी करण्याचे आदेश कंपन्यांना दिले आहेत. खताचा डोस देण्याचा शेतकऱ्यांचा हिशोब वजनाऐवजी पोत्यावर आहे, त्यानुसार प्रत्येक पोत्यात पाच किलो खत कमी करून त्यातून अनुदानावरील खर्च कमी करण्याची सरकारची मखलाशी आहे. त्यानुसार सध्या बाजारात५० ऐवजी ४५ किलोंची युरियाची पोती उपलब्ध आहेत.सात-आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकार सर्वच रासायनिक खतांना अनुदान देत होते; त्यामुळे खतांचे दर शेतकºयांच्या आवाक्यात होते; पण खतांच्या अनुदानावर जादा खर्च होत असल्याचे सांगत केंद्र सरकारने हळूहळू खतांवरील अनुदान कमी करत आणले. मध्यंतरी युरिया वगळता सर्वच खते नियंत्रणमुक्त केली. परिणामी, खत कंपन्यांची मनमानी सुरू झाली आणि आज बहुतांशी खतांच्या किमती ११०० ते १२०० रुपये पोते (५० किलो) आहे. सगळ्यात स्वस्त खत युरिया आहे, २६५ ते २८० रुपयांपर्यंत पोत्याचा दर आहे. त्यातही विक्रेत्यांच्या मार्जिनमुळे शेतकºयांना ३०० ते ३१० रुपयांना पदरात पडतो. तरीही इतर खतांच्या तुलनेत युरियाचे खत तसे आवाक्यात आहे; पण सरकारला युरियावरील अनुदान कमी करायचे आहे; पण त्यांनी पळवाटा शोधल्या आहेत. शेतकरी कितीही प्रगत असला तरी रासायनिक खतांचा डोस पोत्यावरच देतो. सल्लागार कंपन्याही शेतकºयांना एकरी पोत्यावरच हिशेब सांगत असतात. त्यामुळे पाच, दहा, चाळीस किलोत कोणी खताचा डोस देत नाही.युरियाचा वापर शेतकºयांनी कमी करावा, यासाठी सरकार गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे; पण शेतकºयांच्या आवाक्यात असल्याने इतर खतांऐवजी युरियालाच अधिक पसंती राहते. थेट अनुदान कमी करता येत नाही; त्यामुळे पोत्याचे वजन कमी करायचे, त्यातून शेतकºयांचा वापर कमी होईल. एखादा शेतकरी दहा पोती युरिया वापरत असेल तर प्रत्येक पोत्यामागे पाच किलो युरिया कमी झाल्यास आपोआपच अनुदानाचा वापरही कमी होईल, असा सरकारचा प्रयत्न आहे.युरियाही नियंत्रणमुक्त करण्याच्या हालचालीयुरिया हे एकमेव खत शेतकºयांच्या आवाक्यात आहे. तेही नियंत्रणमुक्त करून पूर्णपणे अनुदानमुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, त्याची सुरुवात वजनातून अनुदान कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकºयांचे मत आहे.