शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगातील अनिश्चिततेचा फटका ऊसतोड मजुरांना

By admin | Updated: August 20, 2015 22:59 IST

कारखान्याचे हमीपत्र कमी रकमेचे : बैलगाडी चालकांना तर ५0 ऐवजी २0 हजार रुपयेच अ‍ॅडव्हान्स

आयुब मुल्ला-खोची ऊसतोडणी कंत्राटदारांना अनिश्चिततेमुळे आगामी हंगामासाठी दहा ते वीस टक्के कपातीने अ‍ॅडव्हान्स घेण्याची वेळ आली आहे. बैलगाडी चालकांना तर ५0 ऐवजी २0 हजार रुपयेच अ‍ॅडव्हान्स मिळू लागला आहे. यासाठी लागणारे हमीपत्र बँकांना देताना कारखान्यांनी ही भूमिका घेतली आहे. साखर उद्योगच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्याने ‘आर्थिकपती’ची कमतरता या निमित्ताने पुढे आली आहे.गतवर्षीच्या हंगामात ऊस तोडणीच्या, वाहतुकीच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे साखर कारखान्यांनी तोडणी, वाहतूक कंत्राटदार यांना साडेचार ते पाच लाखांचे हमीपत्र बँकासाठी दिले; परंतु ती परिस्थितीच कारखानदारांना अडचणीची ठरली आहे. शेतकऱ्यांना उसाची बिलेही एफआरपीप्रमाणे मिळालेली नाहीत. सरकारचे आगामी हंगामासाठीचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा फटका ऊसतोडणी मजूर, बैलगाडीवाले यांना बसला आहे. या सर्वांना करारबद्ध करून हंगामापूर्वी कंत्राटदारांना किमान तीन महिने अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. ही भूमिका वाहनचालकांना पार पाडावी लागते. वाहनाचीही दुरुस्ती करावी लागते. यासाठी वाहनचालक कारखान्याकडे हमीपत्र मागतो. ते बँकांनी दिले की कर्ज रूपाने बँका वाहनमालकांना पैसे देतात.परंतु, चालूवर्षी उसाच्या उत्पन्नात घटीची शक्यता आहे. मजुरांची लांबून इकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मजूरही अन्य कामाला प्राधान्य देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत जादा अ‍ॅडव्हान्सची हमी देणे कारखान्याच्यादृष्टीने अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांनी करारासही एक महिना उशिराच सुरुवात केली आहे. जून, जुलैमध्येच अ‍ॅडव्हान्स देण्याची प्रक्रिया होते. मात्र, यंदा अद्याप त्यास गती आलेली नाही. ट्रॅक्टर, ट्रकमालकांना फक्त दोन लाखांपर्यंत अ‍ॅडव्हान्स मिळू लागला आहे. बैलगाडींचे करारही उशिरा सुरू झाले आहेत. ही सर्व परिस्थिती साखर उद्योगासमोर अडचणीमुळे उद्भवली आहे. त्यामुळे अनेक कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने हंगाम सुरू करतील, असे सांगणे धाडसाचे आहे.स्वत:च्या ताकदीवर अ‍ॅडव्हान्स कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कारखान्याकडे ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांमध्ये स्थानिक जास्त आहेत. तरीही जिल्ह्यातील पन्नास हजार ते एक लाखाचे अ‍ॅडव्हान्स मिळेल, अशी स्थिती आहे. सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत पाच लाखांऐवजी तीन लाखांचे हमीपत्र दिले जाते, असे समजते. बारामती, अहमदनगर जिल्ह्यांत मोठे बागायतदारच वाहनमालक आहेत. ते स्वत:च्या ताकदीवर अ‍ॅडव्हान्स देतात.