शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साखर उद्योगातील अनिश्चिततेचा फटका ऊसतोड मजुरांना

By admin | Updated: August 20, 2015 22:59 IST

कारखान्याचे हमीपत्र कमी रकमेचे : बैलगाडी चालकांना तर ५0 ऐवजी २0 हजार रुपयेच अ‍ॅडव्हान्स

आयुब मुल्ला-खोची ऊसतोडणी कंत्राटदारांना अनिश्चिततेमुळे आगामी हंगामासाठी दहा ते वीस टक्के कपातीने अ‍ॅडव्हान्स घेण्याची वेळ आली आहे. बैलगाडी चालकांना तर ५0 ऐवजी २0 हजार रुपयेच अ‍ॅडव्हान्स मिळू लागला आहे. यासाठी लागणारे हमीपत्र बँकांना देताना कारखान्यांनी ही भूमिका घेतली आहे. साखर उद्योगच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडल्याने ‘आर्थिकपती’ची कमतरता या निमित्ताने पुढे आली आहे.गतवर्षीच्या हंगामात ऊस तोडणीच्या, वाहतुकीच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे साखर कारखान्यांनी तोडणी, वाहतूक कंत्राटदार यांना साडेचार ते पाच लाखांचे हमीपत्र बँकासाठी दिले; परंतु ती परिस्थितीच कारखानदारांना अडचणीची ठरली आहे. शेतकऱ्यांना उसाची बिलेही एफआरपीप्रमाणे मिळालेली नाहीत. सरकारचे आगामी हंगामासाठीचे धोरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा फटका ऊसतोडणी मजूर, बैलगाडीवाले यांना बसला आहे. या सर्वांना करारबद्ध करून हंगामापूर्वी कंत्राटदारांना किमान तीन महिने अ‍ॅडव्हान्स द्यावा लागतो. ही भूमिका वाहनचालकांना पार पाडावी लागते. वाहनाचीही दुरुस्ती करावी लागते. यासाठी वाहनचालक कारखान्याकडे हमीपत्र मागतो. ते बँकांनी दिले की कर्ज रूपाने बँका वाहनमालकांना पैसे देतात.परंतु, चालूवर्षी उसाच्या उत्पन्नात घटीची शक्यता आहे. मजुरांची लांबून इकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मजूरही अन्य कामाला प्राधान्य देऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत जादा अ‍ॅडव्हान्सची हमी देणे कारखान्याच्यादृष्टीने अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे त्यांनी करारासही एक महिना उशिराच सुरुवात केली आहे. जून, जुलैमध्येच अ‍ॅडव्हान्स देण्याची प्रक्रिया होते. मात्र, यंदा अद्याप त्यास गती आलेली नाही. ट्रॅक्टर, ट्रकमालकांना फक्त दोन लाखांपर्यंत अ‍ॅडव्हान्स मिळू लागला आहे. बैलगाडींचे करारही उशिरा सुरू झाले आहेत. ही सर्व परिस्थिती साखर उद्योगासमोर अडचणीमुळे उद्भवली आहे. त्यामुळे अनेक कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने हंगाम सुरू करतील, असे सांगणे धाडसाचे आहे.स्वत:च्या ताकदीवर अ‍ॅडव्हान्स कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कारखान्याकडे ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांमध्ये स्थानिक जास्त आहेत. तरीही जिल्ह्यातील पन्नास हजार ते एक लाखाचे अ‍ॅडव्हान्स मिळेल, अशी स्थिती आहे. सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांत पाच लाखांऐवजी तीन लाखांचे हमीपत्र दिले जाते, असे समजते. बारामती, अहमदनगर जिल्ह्यांत मोठे बागायतदारच वाहनमालक आहेत. ते स्वत:च्या ताकदीवर अ‍ॅडव्हान्स देतात.