शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘शाहू’ आघाडीकडे गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शाहू आघाडीसोबत आहे, म्हणून निरोप दिलेले नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून त्यांच्याशी आणखी काहीजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.

‘गोकुळ’ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी आघाड्यांमधील रंगत वाढत आहे. सत्तारूढ गटातील संचालक आपल्याकडे वळवत राजर्षी शाहू आघाडीने निवडणूक एकतर्फी असल्याची हवा तयार केली. मात्र, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आघाडीतील हवा काढण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार आपण शाहू आघाडीसोबत आहे, असा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निरोप देऊन गेलेले दोन नेते अस्वस्थ आहेत. त्यातील एका नेत्यासोबत आज, गुरुवारी सत्तारूढ गटाच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होत आहे. दुसऱ्या नेत्याने जिल्हा बँकेचे राजकारण सोडवून घेण्यासाठी अट घातल्याचे समजते. त्यानुसार तेथील दुसऱ्या गटाची सगळी ताकद बँकेच्या निवडणुकीत लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीसोबत असणाऱ्या एका माजी संचालकानेही सत्तारूढ गटाशी संपर्क साधला आहे.

विरोधी आघाडीला पाठिंबा देऊन माजी आमदार सत्यजित पाटील यांची गोची झाली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार विनय कोरे आघाडीसोबत आले, त्यात त्यांना शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड व पन्हाळ्यातून अमर यशवंत पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे. कोरे यांनी ‘गोकुळ’च्या उमेदवारीच्या आडून विधानसभेचे राजकारण भक्कम केल्याने सत्यजित पाटील अस्वस्थ आहेत. त्यांचे पदाधिकारी बैठका घेऊन त्यांच्यावर आघाडीतून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकत आहेत.

राजू आवळेंसह, मिणचेकर, स्वरूपा यड्रावकर इच्छुक

महाविकास आघाडीकडून अनुसूचित जाती गटातून आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे इच्छुक आहेत. महिला गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा पाटील-यड्रावकर यांचेही नाव पुढे येत आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू असून गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क असून विशेष म्हणजे ते सर्वाधिक मते असलेल्या करवीर तालुक्यातील आहेत.