शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

‘दौलत’बाबत अस्वस्थता

By admin | Updated: April 17, 2015 00:16 IST

भवितव्य अधांतरी : स्थानिक नेते गुंतलेत गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत

नंदकुमार ढेरे - चंदगड - २० एप्रिलचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काळजांचे ठोके वाढत चालले आहेत. थेटे पेपर्स प्रा.लि.,चा अडथळा दूर झाल्याने दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबतची निविदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १७ एप्रिल ही कोरी निविदा फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, तर टेंडर फ ॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे.या तारखेपर्यंत कोणतीच सक्षम कंपनी किंवा संस्था पुढे न आल्यास काय घडेल? बँक आपला परवाना वाचविण्यासाठी थेट दौलतचा लिलाव पुकारेल. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तर दौलतच्या विक्रीचीच भाषा करीत आहेत. कोणीच पुढे आले नाही, तर तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूक, कंत्राटदार, आदींनी एकत्र येऊन विविध मार्गांनी पैसे जमा करायचे आणि सहकारातच दौलत चालवायचा, अशी महत्त्वाकांक्षी योजना दौलत वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या भल्या माणसांनी जाहीर केली आहे. परंतु, ती प्रत्यक्षात येईल की स्वप्नरंजन ठरेल, हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी वेळही खूप लागेल; पण बँका आता फार काळ थांबणार नाहीत असेच चित्र आहे. त्यामुळे कोणीच टेंडर भरले नाही म्हणून लिलाव अटळ असल्याचे दाखवून बँक ‘दौलत’ची विक्री करेल. त्यातून दौलतवरील कर्जाच्या मुद्दल रकमांची फेड होऊ शकेल. बँक ते सहनही करील. पण, शेतकरी, कामगार पगार आणि व्यापारी देण्यांचे काय? सध्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच बडे नेते त्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सत्ता कशी मिळवता येईल, याची काळजी लागून राहिली आहे. दुसरा कोणताच विचार करायला त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दौलतबाबत ते अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत. मालमत्ता जप्त कराव्यातदौलतवर जो कर्ज व देणी यांचा प्रचंड मोठा बोजा निर्माण झाला. शेकडो कोटी रुपयांचा तोटा झाला. त्याबाबतचे लेखापरीक्षण होऊन जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, जबाबदार व्यक्तींच्या मालमत्ता जप्त कराव्यात. त्यातून प्रथम कर्जे व देणी फेडावित, असे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही, जबाबदाऱ्या निश्चित होत नाहीत आणि संबंधितांकडून वसुली होत नाही. तोपर्यंत दौलतचा लिलाव होऊ नये, अशी जनतेची मागणी आहे. त्यातल्या त्यात आशादाई बाब म्हणून माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. तर दौलत कारखाना सहकारातच राहावा, त्याचा लिलाव होऊ नये, अशी भावना तालुक्यात आता जोर धरू लागली आहे.