शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’बाबत अस्वस्थता

By admin | Updated: April 17, 2015 00:16 IST

भवितव्य अधांतरी : स्थानिक नेते गुंतलेत गोकुळ, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत

नंदकुमार ढेरे - चंदगड - २० एप्रिलचा दिवस जसजसा जवळ येत चालला आहे. तसतसे चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काळजांचे ठोके वाढत चालले आहेत. थेटे पेपर्स प्रा.लि.,चा अडथळा दूर झाल्याने दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबतची निविदा जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १७ एप्रिल ही कोरी निविदा फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे, तर टेंडर फ ॉर्म सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे.या तारखेपर्यंत कोणतीच सक्षम कंपनी किंवा संस्था पुढे न आल्यास काय घडेल? बँक आपला परवाना वाचविण्यासाठी थेट दौलतचा लिलाव पुकारेल. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे तर दौलतच्या विक्रीचीच भाषा करीत आहेत. कोणीच पुढे आले नाही, तर तालुक्यातील शेतकरी, कामगार, वाहतूक, कंत्राटदार, आदींनी एकत्र येऊन विविध मार्गांनी पैसे जमा करायचे आणि सहकारातच दौलत चालवायचा, अशी महत्त्वाकांक्षी योजना दौलत वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या भल्या माणसांनी जाहीर केली आहे. परंतु, ती प्रत्यक्षात येईल की स्वप्नरंजन ठरेल, हे सांगता येत नाही. मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी वेळही खूप लागेल; पण बँका आता फार काळ थांबणार नाहीत असेच चित्र आहे. त्यामुळे कोणीच टेंडर भरले नाही म्हणून लिलाव अटळ असल्याचे दाखवून बँक ‘दौलत’ची विक्री करेल. त्यातून दौलतवरील कर्जाच्या मुद्दल रकमांची फेड होऊ शकेल. बँक ते सहनही करील. पण, शेतकरी, कामगार पगार आणि व्यापारी देण्यांचे काय? सध्या गोकुळ व जिल्हा बँकेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सर्वच बडे नेते त्यामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सत्ता कशी मिळवता येईल, याची काळजी लागून राहिली आहे. दुसरा कोणताच विचार करायला त्यांना वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दौलतबाबत ते अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत. मालमत्ता जप्त कराव्यातदौलतवर जो कर्ज व देणी यांचा प्रचंड मोठा बोजा निर्माण झाला. शेकडो कोटी रुपयांचा तोटा झाला. त्याबाबतचे लेखापरीक्षण होऊन जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात, जबाबदार व्यक्तींच्या मालमत्ता जप्त कराव्यात. त्यातून प्रथम कर्जे व देणी फेडावित, असे लोक आता उघडपणे बोलू लागले आहेत. जोपर्यंत लेखापरीक्षण होत नाही, जबाबदाऱ्या निश्चित होत नाहीत आणि संबंधितांकडून वसुली होत नाही. तोपर्यंत दौलतचा लिलाव होऊ नये, अशी जनतेची मागणी आहे. त्यातल्या त्यात आशादाई बाब म्हणून माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दौलत भाडेतत्त्वावर चालवण्याची तयारी दर्शविली आहे. तर दौलत कारखाना सहकारातच राहावा, त्याचा लिलाव होऊ नये, अशी भावना तालुक्यात आता जोर धरू लागली आहे.