शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ कामकाजाला बसणार खीळ!

By admin | Updated: August 6, 2015 23:11 IST

घटक नाराज : अधिसभा, अधिकार मंडळांना मुदतवाढ नाही

कोल्हापूर : अधिसभा व अन्य अधिकार मंडळांना मुदतवाढ मिळणार नसल्याने शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि व्यवस्थापनाच्या पातळीवरील कामकाजाला खीळ बसण्याची भीती विद्यापीठाच्या घटकांकडून व्यक्त होत आहे. राज्य सरकारने संबंधित अधिकार मंडळांना मुदतवाढ न देण्याच्या निर्णयाचा परिणाम विद्यापीठावर होणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार विद्यापीठांबाबत नवा कायदा करणार आहे. त्यामुळे आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या विविध अधिकार मंडळांसाठीच्या निवडणुकांवर खर्च होऊ नये, यासाठी संबंधित निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे विधेयक विधानसभेत २९ जुलै रोजी मंजूर झाले. या विधेयकामुळे एक वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या अनुषंगाने विद्यापीठाशी निगडित काही संघटनांनी मुदतवाढीची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने ही मागणी मान्य केली नसल्याने विद्यापीठाच्या संबंधित अधिकार मंडळांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याचे विद्यापीठ घटकांकडून सांगितले जात आहे. शिवाजी विद्यापीठाची अधिसभा, व्यवस्थापन आणि विद्या परिषद, तक्रार निवारण अशा विविध अधिकार मंडळांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपणार आहे. मुदतवाढ मिळाली नसल्याने विद्यापीठातील कामकाजाला खीळ बसण्यासह लोकशाही पद्धत संपुष्टात येण्याची भीती प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)अधिसभेची निवडणूक पुढे ढकलली अथवा अधिकार मंडळांना मुदतवाढ देण्यात येऊ नये याबाबतचे कोणतीही लेखी सूचना वा आदेश विद्यापीठाला प्राप्त झालेले नाहीत. शासनाच्या सूचना, आदेशानुसार विद्यापीठाकडून कार्यवाही केली जाईल.- डॉ. डी. आर. मोरे, संचालक, बीसीयूडी, शिवाजी विद्यापीठविद्यापीठाच्या घटकांना याची भीतीलोकशाही पद्धतीने कामकाज होणार नाही.प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाची गती मंदावणार.विद्यापीठाच्या घटकांच्या तक्रारींच्या निवारणात पारदर्शकतेचा प्रश्न उद्भवणार.अधिकार मंडळांना मुदतवाढ मिळणार नसल्याने निर्णय कोणी घ्यायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. जरी याबाबतचे अधिकार मंडळांऐवजी अन्य कुणाकडे सोपविल्यास त्यांना एकावेळी या सर्वांचे काम करणे सोयीस्कर ठरणार नाही. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज लोकशाही पद्धतीने होण्यासाठी सध्याच्या अधिकार मंडळांना मुदतवाढ देण्याची गरज आहे.- डॉ. क्रांतिकुमार पाटील, अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन