शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ

By admin | Updated: March 15, 2016 00:26 IST

‘मनविसे’चा आरोप : फेरतपासणीत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

कोल्हापूर : सन २०१४ मध्ये शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे कामकाज भोंगळपणे झाले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी सोमवारी येथे केला. फेरतपासणीत ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने केली शिवाय याबाबतचे निवेदन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले.अभियांत्रिकी विभागाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सन २०१४ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीसाठी अर्ज केले. फेरतपासणीनंतर गुणांमध्ये तफावत दिसून आली. माहिती अधिकारातून विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीनुसार फेरतपासणीमध्ये अभियांत्रिकीच्या ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. अन्य विद्यापीठांच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्क्यांनी अधिक आहे. त्यात विशेष म्हणजे गणितमधील प्रत्येक वर्षासाठी असलेल्या सर्वांमध्ये ९५ टक्के बदल झाला आहे. अन्य विषयांतील गुणांत देखील बदल झाले आहेत. यावरून उत्तरपत्रिका तपासणीचे काम भोंगळपणे झाल्याचे दिसून येते. परीक्षा नियंत्रकांकडे देखील आम्ही उत्तरपत्रिका तपासणीचा मुद्दा मांडला. पण, त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. उत्तरपत्रिकांची योग्य पद्धतीने तपासणी न करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या प्रकरणाची योग्य ती माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात ‘मनसे’चे नगरसेवक राजू दिंडोर्ले, ‘मनविसे’चे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, प्रसाद साळोखे, अमोल कुंभार, उत्तम वंदुरे, अजित लोहार, रोहित शिंदे, संतोष खटावकर, किरण कोरे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)