शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

मास मेडिटेशनचा अनोखा विश्वविक्रम

By admin | Updated: February 25, 2016 01:42 IST

गांधी मैदानावर उपक्रम : ‘ब्रह्माकुमारी’ संस्थेकडून आयोजन; एशिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद

कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत मन:शांतीद्वारे विश्वशांती व समृद्धीसाठी येथील गांधी मैदानावर सुमारे वीस मिनिटे विश्वविक्रमी मास मेडिटेशन उपक्रम करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सुमारे २६ हजारांहून अधिक बंधू-भगिनींनी एकत्र येऊन हा मास मेडिटेशन कार्यक्रम केल्याने या विक्रमाची नोंद ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये झाल्याची घोषणा करण्यात आली. प्रजापिता ब्रह्माकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय कोल्हापूरच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त हा विश्वविक्रमी उपक्रम झाला. ब्रह्माकुमारीज (माऊंट अबू)च्या संयुक्त सहप्रशासिका डॉ. दादी रतनमोहिनीजी व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे यावेळी प्रमुख उपस्थित होते. गांधी मैदानावर हा मास मेडिटेशन उपक्रम झाला. यासाठी उपस्थित २६ हजार ४३६ बंधू-भगिनींना महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या क्षेत्रीय संचालिका संतोष दादीजी यांनी सुमारे २० मिनिटे ध्यानाची सामुदायिक आज्ञा दिली. त्यानंतर ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’चे मोहन जोशी यांनी विक्रमाची अधिकृत घोषणा केली. या विश्वविक्रमी उपक्रमासाठी सायंकाळी पाच वाजल्यानंतर गांधी मैदान भरण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी सवाद्य शोभायात्रेतून संयुक्त सहप्रशासिका डॉ. दादी रतनमोहिनीजी यांचे आगमन झाले. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर डॉ. दादी रतनमोहिनीजी, डॉ. डी. वाय. पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी सोनाली यांनी स्वागतनृत्य केले. संयोगीता पाटील ग्रुपच्यावतीने नृत्य कार्यक्रम झाला. प्रमुख वक्त्या संतोषदीदीजी म्हणाल्या, मानवात भेदभाव वाढत आहे प्रेम कमी होत आहे, मनुष्य आज स्वत:ला विसरत चालला आहे. त्यामुळे मनुष्याने मन, बुद्धी, संस्कारांचा राजा बनण्यासाठी राजयोगाद्वारे सुख-शांतीमय तणावमुक्त आनंदी जीवनाचा वारसा अवलंबला पाहिजे, असे उद्गार काढले. त्यानंतर त्यांनी उपस्थित बंधू-भगिनींना सुमारे वीस मिनिटे ध्यानाची सामुदायिक आज्ञा दिल्यानंतर खचाखच भरलेल्या मैदानातही नीरव शांतता पसरली होती. त्यानंतर ‘एशिया बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा मोहन जोशी यांनी केली. या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी ‘एशिया बुक रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र डॉ. डी. वाय. पाटील, मोहन जोशी यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी मनोरमा दीदीजी यांनी सूत्रसंचालन केले.